शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
4
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
5
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
6
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
7
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
8
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
9
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
10
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
11
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
12
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
13
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
14
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
15
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
16
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
17
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
18
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
19
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
20
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले

नागपूरच्या संस्थापकाची समाधी ढाळतेय भग्नावस्थेचे अश्रू ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:08 IST

प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘जन पळभर म्हणतील हाय हाय...’ सामान्य माणसांच्या अस्तित्वाचा अर्थ मांडणारी ही ...

प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ‘जन पळभर म्हणतील हाय हाय...’ सामान्य माणसांच्या अस्तित्वाचा अर्थ मांडणारी ही कविता. पण ते सामान्य नव्हते. उपराजधानी म्हणून गाैरव करताे त्या नागपूरच्या संस्थापक राजाची ही व्यथा आहे. भोसले-औरंगजेब-गोंडराजे यांच्यातील धुमश्चक्रीदरम्यान सुमारे ३०० वर्षापूर्वी नागपूरची उभारणी करणाऱ्या गोंडराजे बख्त बुलंद शहा व त्यांच्या वंशजांचे समाधीस्थळ भग्नावस्थेचे अश्रू ढाळत आहे. समाधी स्थळांना जागाेजागी खिंडार पडले आहे व संपूर्ण परिसर झाडेझुडपे-गवतांनी व्यापला आहे. वर्तमान राजकारणी, शासन-प्रशासन व नागरिकांच्याही उदासीनतेमुळे इतिहासच पुसला जाण्याची भीती आहे.

तिरंगा चौक ते सक्करदरा पोलीस ठाण्यादरम्यान उजव्या हाताला ही समाधी कोणाच्याही नजरेस पडत नाही, इतकी दयनीय अवस्था या स्थळाची आहे. इतिहासातील नोंदीनुसार या गोंड राजघाटाचे क्षेत्रफळ पाच एकर इतके होते. मात्र, कालांतराने या क्षेत्रावर अतिक्रमण होत गेले. तेथे घरे, दुकाने आदी बनले असून, त्यांची विधिवत रजिस्ट्रीही असल्याचे सांगितले जाते. आदिवासी जमीन हक्क कायद्यांतर्गत आदिवासींची जमीन बळकावता येत नाही. असे असतानाही झालेले कायदेशीर अतिक्रमण प्रशासनातील गौडबंगालाचा संशय निर्माण करते. विशेष म्हणजे, ऐतिहासिक वारसा असल्याचे भानही कुणाला राहिले नाही.

या स्थळावर सद्यस्थितीत गोंड राजघराण्यातील वंशजांच्या १९ समाधी अस्तित्त्वात आहेत. मात्र, झाडाझुडपे व गवतांनी व्यापल्या असल्याने नजरेस केवळ तीन-चारच पडतात.

-----------------

समाधीस्थळ विकासाचा प्रस्ताव पडून

या परिसराच्या विकासाचा प्रस्ताव नगरसेविका दिव्या धुरडे यांनी वर्षभरापूर्वी दिला होता. मात्र, मनपाच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली नाही. समाधीस्थळाला अतिक्रमणापासून संरक्षण देण्यासाठी संरक्षण भिंत, समाधीची डागडुजी, प्रवेश गेट, ई-म्युझियम व परिसरातील विकासकामे यासाठी १ कोटी ६८ लाख रुपयाचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, त्याला मंजुरीच मिळाली नाही, इतकी अनास्था ऐतिहासिक वारसा स्थळाविषयी मनपाची दिसून येते. दरम्यान ७ मार्च २०२१ रोजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी समाधीस्थळाची पाहणी केल्यावर डागडुजी व नुतनीकरणासंदर्भात हेरिटेज समितीकडे प्रस्ताव पाठवून समितीच्या निर्धारित वास्तू शिल्पकाराकडून प्रस्ताव तयार करून अर्थसंकल्पात तरतूद करण्याचे निर्देश दिले होते.

----------------

राजघाटाचा दर्जा द्या

गोंडराजा बख्त बुलंद शहा यांच्यासह त्यांच्या वंशजांच्या समाधी येथे आहेत. नागपूरची उभारणी करणारा हा राजा इतिहासातून असा वगळला जावा आणि त्याच राजघराण्याविषयी अनास्था व्यक्त व्हावी, इतकी कृतघ्नता शासन-प्रशासन व राज्यकर्त्यांकडून होत आहे. हा ऐतिहासिक वारसा आहे. त्याचे जतन व्हावे आणि गोंडराजांचा इतिहास मुलांना कळावा म्हणून तो शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा.

- दिनेश शेराम - अध्यक्ष, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नागपूर विभाग व सिनेट सदस्य, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ