शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विभागीय शिक्षण मंडळ झाले पांगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:07 IST

नागपूर : कोरोनाच्या काळात दहावी, बारावीच्या निकालाची कसरत यशस्वीरीत्या पार पाडण्यात नागपूर विभागाची भूमिका अव्वल ठरली. नागपूर विभागाला कायमस्वरूपी ...

नागपूर : कोरोनाच्या काळात दहावी, बारावीच्या निकालाची कसरत यशस्वीरीत्या पार पाडण्यात नागपूर विभागाची भूमिका अव्वल ठरली. नागपूर विभागाला कायमस्वरूपी अध्यक्ष आणि सचिव नसल्याने ही सर्व जबाबदारी सहसचिव असलेल्या माधुरी सावरकर यांनी पार पाडली. निकाल घोषित झाल्यानंतर शुक्रवारी शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये सावरकर यांचीही बदली करण्यात आल्याने आता बोर्डाची कमान सांभाळणारे अधिकारीच नसल्याने बोर्ड पांगळे झाले आहे.

तसे २०१३ पासून नागपूर बोर्डाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळालेला नाही. २०१६ मध्ये संजय गणोरकर यांच्याकडे अध्यक्षपद आले, पण त्यांच्याकडे इतर विभागाचाही प्रभार होता. ते सेवानिवृत्त झाल्यानंतर बोर्डाचे अध्यक्ष अजूनही प्रभारीवरच आहेत. बोर्डाचे सचिव रविकांत देशपांडे हे २०२० मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त प्रभार होता. रविकांत देशपांडे निवृत्त झाल्यानंतर विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांच्याकडे बोर्डाच्या अध्यक्षाचा अतिरिक्त चार्ज सोपविण्यात आला, तर सचिवाचा चार्ज सहसचिव माधुरी सावरकर यांच्याकडे देण्यात आला; पण २०२१ मध्ये पारधीही सेवानिवृत्त झाले. पुन्हा त्यांचा प्रभार शिक्षण उपसंचालक डॉ. वैशाली जामदार यांच्याकडे आला; पण सावरकर यांनी बोर्डाच्या कामकाजाची धुरा सांभाळली.

२०२०-२१ हे सत्र शिक्षण क्षेत्रासाठीच आव्हानात्मक होते. परीक्षा झाल्या नव्हत्या. विद्यार्थ्यांचे निकाल लावायचे होते. शाळांकडून मूल्यांकनाचे काम करून घ्यायचे होते. अशात वेबसाइटच्या अडचणी भेडसावल्या. शिक्षकांचा संताप वाढला. निकालाच्या बाबतीत पालक विद्यार्थ्यांचा त्रागा झाला. शिक्षक संघटनांच्या निवेदनांचा खच बोर्डाकडे जमा झाला. या सर्व परिस्थितीवर मात करीत माधुरी सावरकर यांनी बोर्डाला सावरले; पण दहावी, बारावीचे निकाल लागल्यानंतर त्यांचीही गोंदियाला शिक्षणाधिकारी म्हणून बदली झाली. आता बोर्डाची धुरा सांभाळणारे अधिकारी सध्यातरी नाहीत.

- श्रीराम चव्हाण यांना दिली कळमेश्वर बीईओची जबाबदारी

नागपूर बोर्डाच्या कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असलेले श्रीराम चव्हाण यांची पदोन्नती झाली होती; परंतु नंतर शासनाने त्यांची पदोन्नती मागे घेतली. ते विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात शिक्षण उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी झालेल्या बदल्यांमध्ये त्यांची कळमेश्वरला बीईओ म्हणून बदली करण्यात आली.