शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

नागपूर विभागीय शिक्षण मंडळ झाले पांगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:07 IST

नागपूर : कोरोनाच्या काळात दहावी, बारावीच्या निकालाची कसरत यशस्वीरीत्या पार पाडण्यात नागपूर विभागाची भूमिका अव्वल ठरली. नागपूर विभागाला कायमस्वरूपी ...

नागपूर : कोरोनाच्या काळात दहावी, बारावीच्या निकालाची कसरत यशस्वीरीत्या पार पाडण्यात नागपूर विभागाची भूमिका अव्वल ठरली. नागपूर विभागाला कायमस्वरूपी अध्यक्ष आणि सचिव नसल्याने ही सर्व जबाबदारी सहसचिव असलेल्या माधुरी सावरकर यांनी पार पाडली. निकाल घोषित झाल्यानंतर शुक्रवारी शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये सावरकर यांचीही बदली करण्यात आल्याने आता बोर्डाची कमान सांभाळणारे अधिकारीच नसल्याने बोर्ड पांगळे झाले आहे.

तसे २०१३ पासून नागपूर बोर्डाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळालेला नाही. २०१६ मध्ये संजय गणोरकर यांच्याकडे अध्यक्षपद आले, पण त्यांच्याकडे इतर विभागाचाही प्रभार होता. ते सेवानिवृत्त झाल्यानंतर बोर्डाचे अध्यक्ष अजूनही प्रभारीवरच आहेत. बोर्डाचे सचिव रविकांत देशपांडे हे २०२० मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त प्रभार होता. रविकांत देशपांडे निवृत्त झाल्यानंतर विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांच्याकडे बोर्डाच्या अध्यक्षाचा अतिरिक्त चार्ज सोपविण्यात आला, तर सचिवाचा चार्ज सहसचिव माधुरी सावरकर यांच्याकडे देण्यात आला; पण २०२१ मध्ये पारधीही सेवानिवृत्त झाले. पुन्हा त्यांचा प्रभार शिक्षण उपसंचालक डॉ. वैशाली जामदार यांच्याकडे आला; पण सावरकर यांनी बोर्डाच्या कामकाजाची धुरा सांभाळली.

२०२०-२१ हे सत्र शिक्षण क्षेत्रासाठीच आव्हानात्मक होते. परीक्षा झाल्या नव्हत्या. विद्यार्थ्यांचे निकाल लावायचे होते. शाळांकडून मूल्यांकनाचे काम करून घ्यायचे होते. अशात वेबसाइटच्या अडचणी भेडसावल्या. शिक्षकांचा संताप वाढला. निकालाच्या बाबतीत पालक विद्यार्थ्यांचा त्रागा झाला. शिक्षक संघटनांच्या निवेदनांचा खच बोर्डाकडे जमा झाला. या सर्व परिस्थितीवर मात करीत माधुरी सावरकर यांनी बोर्डाला सावरले; पण दहावी, बारावीचे निकाल लागल्यानंतर त्यांचीही गोंदियाला शिक्षणाधिकारी म्हणून बदली झाली. आता बोर्डाची धुरा सांभाळणारे अधिकारी सध्यातरी नाहीत.

- श्रीराम चव्हाण यांना दिली कळमेश्वर बीईओची जबाबदारी

नागपूर बोर्डाच्या कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असलेले श्रीराम चव्हाण यांची पदोन्नती झाली होती; परंतु नंतर शासनाने त्यांची पदोन्नती मागे घेतली. ते विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात शिक्षण उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी झालेल्या बदल्यांमध्ये त्यांची कळमेश्वरला बीईओ म्हणून बदली करण्यात आली.