शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
4
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
5
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
6
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
7
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
9
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
11
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
12
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
13
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
14
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
15
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
16
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
17
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
18
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
19
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
20
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विभागीय शिक्षण मंडळ झाले पांगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:07 IST

नागपूर : कोरोनाच्या काळात दहावी, बारावीच्या निकालाची कसरत यशस्वीरीत्या पार पाडण्यात नागपूर विभागाची भूमिका अव्वल ठरली. नागपूर विभागाला कायमस्वरूपी ...

नागपूर : कोरोनाच्या काळात दहावी, बारावीच्या निकालाची कसरत यशस्वीरीत्या पार पाडण्यात नागपूर विभागाची भूमिका अव्वल ठरली. नागपूर विभागाला कायमस्वरूपी अध्यक्ष आणि सचिव नसल्याने ही सर्व जबाबदारी सहसचिव असलेल्या माधुरी सावरकर यांनी पार पाडली. निकाल घोषित झाल्यानंतर शुक्रवारी शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये सावरकर यांचीही बदली करण्यात आल्याने आता बोर्डाची कमान सांभाळणारे अधिकारीच नसल्याने बोर्ड पांगळे झाले आहे.

तसे २०१३ पासून नागपूर बोर्डाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळालेला नाही. २०१६ मध्ये संजय गणोरकर यांच्याकडे अध्यक्षपद आले, पण त्यांच्याकडे इतर विभागाचाही प्रभार होता. ते सेवानिवृत्त झाल्यानंतर बोर्डाचे अध्यक्ष अजूनही प्रभारीवरच आहेत. बोर्डाचे सचिव रविकांत देशपांडे हे २०२० मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त प्रभार होता. रविकांत देशपांडे निवृत्त झाल्यानंतर विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांच्याकडे बोर्डाच्या अध्यक्षाचा अतिरिक्त चार्ज सोपविण्यात आला, तर सचिवाचा चार्ज सहसचिव माधुरी सावरकर यांच्याकडे देण्यात आला; पण २०२१ मध्ये पारधीही सेवानिवृत्त झाले. पुन्हा त्यांचा प्रभार शिक्षण उपसंचालक डॉ. वैशाली जामदार यांच्याकडे आला; पण सावरकर यांनी बोर्डाच्या कामकाजाची धुरा सांभाळली.

२०२०-२१ हे सत्र शिक्षण क्षेत्रासाठीच आव्हानात्मक होते. परीक्षा झाल्या नव्हत्या. विद्यार्थ्यांचे निकाल लावायचे होते. शाळांकडून मूल्यांकनाचे काम करून घ्यायचे होते. अशात वेबसाइटच्या अडचणी भेडसावल्या. शिक्षकांचा संताप वाढला. निकालाच्या बाबतीत पालक विद्यार्थ्यांचा त्रागा झाला. शिक्षक संघटनांच्या निवेदनांचा खच बोर्डाकडे जमा झाला. या सर्व परिस्थितीवर मात करीत माधुरी सावरकर यांनी बोर्डाला सावरले; पण दहावी, बारावीचे निकाल लागल्यानंतर त्यांचीही गोंदियाला शिक्षणाधिकारी म्हणून बदली झाली. आता बोर्डाची धुरा सांभाळणारे अधिकारी सध्यातरी नाहीत.

- श्रीराम चव्हाण यांना दिली कळमेश्वर बीईओची जबाबदारी

नागपूर बोर्डाच्या कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असलेले श्रीराम चव्हाण यांची पदोन्नती झाली होती; परंतु नंतर शासनाने त्यांची पदोन्नती मागे घेतली. ते विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात शिक्षण उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी झालेल्या बदल्यांमध्ये त्यांची कळमेश्वरला बीईओ म्हणून बदली करण्यात आली.