शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

नागपूर विभागात दोन वर्षात नऊ सरपंच अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 11:06 IST

नागपूर विभागात गेल्या दोन वर्षात ५० सरपंचाविरोधात जि.प.ला तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यातून नऊ सरपंचांना अपात्र ठरविले आहे.

ठळक मुद्देगैरव्यवहार, जात वैधता प्रमाणपत्राबाबत तक्रारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासनाने ग्रा.पं.चे अधिकार वाढविले आहेत. शासनाच्या कुठल्याही योजनेचा निधी थेट ग्रा.पं.ला पोहचतो आहे. त्यामुळे ग्रा.पं.चा सर्वेसर्वा असलेल्या सरपंचाचेही अधिकार वाढले आहे. त्यातून भ्रष्टाचाराची, गैरव्यवहाराची प्रकरणे पुढे येत आहे. गेल्या दोन वर्षात ५० सरपंचाविरोधात जि.प.ला तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यातून नऊ सरपंचांना अपात्र ठरविले आहे.ज्या नऊ सरपंचांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे, त्यांच्यावर अतिक्रमण, गैरव्यवहार आणि जातवैधता प्रमाणपत्र याबाबतची कारणे पुढे आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल २०१७ पासून आॅक्टोबर २०१८ पर्यंत ५० सरपंचाच्या विरोधात तक्रारी जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त झाल्या. यातील बहुतांश तक्रार गैरव्यवहार संबंधात असल्याची माहिती आहे. त्याचप्रमाणे अतिक्रमण आणि जात वैधता प्रमाणपत्राबाबतही आहे. जिल्हा परिषद प्रशासनाकडून कारवाई संदर्भात सर्व प्रकरणे विभागीय आयुक्तांकडून पाठविण्यात आली. यातील १६ प्रकरणात विभागीय आयुक्तांनी निकाल दिला आहे. यात नऊ प्रकरणात सरपंचाचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय देण्यात आला आहे. तर पाच प्रकरणात निर्णय जिल्हा प्रशासनाच्या विरोधात दिला आहे. उर्वरित प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजी