शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

नागपूर विभाग टसर-रेशीम उत्पादनाचे हब

By admin | Updated: March 9, 2017 02:27 IST

नागपूर विभागामध्ये भंडारा, गडचिरोली, चंद्र्रपूर व गोंदिया जिल्ह्यात टसर उत्पादनाची सुमारे ३०० वर्षांची परंपरा आहे.

महिलांसाठी रोजगाराच्या संधी : पाच कोटी रेशीम कोशाचे उत्पादन नागपूर : नागपूर विभागामध्ये भंडारा, गडचिरोली, चंद्र्रपूर व गोंदिया जिल्ह्यात टसर उत्पादनाची सुमारे ३०० वर्षांची परंपरा आहे. देशात टसर उत्पादनामध्ये राज्याचा १० वा क्रमांक लागतो. विभागात महिलांनी पाच कोटी रेशीम कोश उत्पादन घेतले आहे. या टसर कोश उत्पादनासोबतच धागा तयार करणे आणि कापडापर्यंतची प्रक्रिया निर्माण झाल्यास शेतीनंतर सर्वाधिक रोजगाराच्या संधी या क्षेत्रात उपलब्ध होणार आहेत. नागपूर विभागात असलेल्या वनसंपदेच्या आधारावर १० कोटीपर्यंत रेशीम कोश उत्पादन घेणे शक्य होणार आहे. त्यासाठी भंडारा, आंधळगाव, किटाळी, खडसंगी आदी भागात सामूहिक टसर कोश प्रक्रिया केंद्र सुरू करण्याला चालना मिळणे आवश्यक आहे. केंद्रीय रेशीम बोर्ड तसेच राज्य हातमाग संचालनालयातर्फे प्रयत्न सुरू आहेत. राज्यात विशेषत: नागपूर विभागात सरासरी ३०० मेट्रिक टन टसर-रेशीम उत्पादन होत असून, संपूर्ण देशात २९ हजार मेट्रिक टन उत्पादन होत असल्यामुळे नागपूर व अमरावती विभागात शेतीसोबतच रेशीम व टसर उत्पादनाला भरपूर संधी उपलब्ध आहेत. या उत्पादन प्रक्रियेसाठी मुद्रा बँकेचाही सहभाग लाभल्यामुळे विविध भागात मोठ्या प्रमाणात प्रक्रिया केंद्र सुरू होण्यात मदतच होत आहे. रेशीम धाग्याला जगात सर्वाधिक मागणी आहे. या क्षेत्रात २८ हजार ५०० कोटीची निर्यात होत असून, कृषीनंतर सर्वाधिक रोजगार देणारा हा व्यवसाय आहे. पारंपरिक पद्धतीने मटका व पायावर १४ दिवसात केवळ एक किलो रेशीम धागा तयार करता येत असल्यामुळे दैनंदिन मजुरीसुद्धा अत्यल्प मिळत होती. बुनियादी या नवीन मशीनमुळे आता दर दिवशी २०० ग्रॅमपेक्षा जास्त धागा तयार करणे सुलभ होत असल्यामुळे २५० रुपयापेक्षा जास्त मजुरी मिळणार आहे. केंद्रीय वस्त्रोउद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या पुढाकाराने महिला विणकरांना हे यंत्र अत्यंत सवलतीच्या दरात उपलब्ध होत आहे. देशात १० ठिकाणी एकाचवेळी बुनियाद रिलिंग मशीन प्रायोगिक तत्त्वावर वितरित करण्यात आली आहेत. या उपक्रमामुळे या प्रत्येक गावात विणकरांचे एक क्लस्टर तयार होणार आहे. टसर कोश अथवा रेशीम कोश विक्रीसाठी बाहेर न पाठवता त्यावर प्रक्रिया करून कोसा सिल्क साड्यांसह विविध उत्पादन घेण्याला प्रोत्साहन मिळणार आहे. रेशीम व टसर उत्पादनाला विकसित तंत्रज्ञानाची जोड देऊन रोजगाराची विशेषत: महिलांसाठी प्रचंड क्षमता असलेल्या या उद्योगाला निश्चितच ‘अच्छे दिन’ येणार आहे. यातून मोठ्या प्रमाणावर रोजगारसुद्धा निर्माण होतील. (प्रतिनिधी)