शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

राज्यात मुंबई-पुण्यानंतर नागपूरच श्रीमंत, जिल्ह्याचा गरिबी निर्देशांक ६.७२ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 12:28 IST

राज्यात मुंबई-पुण्यानंतर आपला नागपूर जिल्हा हाच श्रीमंत असल्याची बाब नीति आयोगाच्या अहवालावरून दिसून येते. नीति आयोगाने जारी केलेल्या अहवालात नागपूर जिल्ह्याचा गरिबीचा निर्देशांक ६.७२ इतका आहे.

ठळक मुद्देनीति आयोगाचा अहवाल

नागपूर : मागील काही वर्षात नागपूर झपाट्याने बदलत आहे. अनेक मोठ-मोठे प्रकल्प नागपुरात होऊ घातले आहे. अनेक विकासाचे प्रकल्प सुरू आहे. त्याचा परिणाम येथील लोकांच्या राहणीमानावरही पडला आहे. राज्यात मुंबई-पुण्यानंतर आपला नागपूर जिल्हा हाच श्रीमंत असल्याची बाब नीति आयोगाच्या अहवालावरून दिसून येते. नीति आयोगाने जारी केलेल्या अहवालात जिल्ह्याचा गरिबीचा निर्देशांक ६.७२ इतका आहे. मुंबईचा ३.५९ टक्के, मुंबई उपनगरचा ४.६५ टक्के आणि पुण्याचा ५.२९ टक्के इतका गरिबी निर्देशांक आहे.

जिल्ह्यातील २०११ ची जनगणना आणि २०१९-२० मध्ये झालेल्या कुटुंब आरोग्य सर्वेक्षणावरून नीति आयोगाने देशभरातील गरिबीचा निर्देशांक नुकताच जाहीर केला आहे. यात दर्शविण्यात आलेली गरिबी ही केवळ दरडोई उत्पन्नावर आधारित नसून, उपलब्ध घरे, वीज जोडण्या, पाण्याची व्यवस्था, स्वयंपाकाच्या इंधनाची व्यवस्था, आरोग्याच्या सुविधा, शिक्षणाच्या सोयी, मृत्यूदर अशा विविध निकषांच्या आधारावर मल्टीडायमेन्शनल पॉव्हर्टी निर्देशांक निश्चित केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील नागरिकांना शासनाच्या विविध सोयी-सुविधांचा लाभ मिळाल्याने त्यांच्या राहणीमानात सुधारणा झाली आहे.

नीति आयोगाच्या ताज्या अहवालानुसार गेल्या दहा वर्षात बीपीएलमधील काही नागरिकांची संख्या कमी झाल्याचेही दिसून येत आहे. यासोबतच जिल्ह्यात शाळा, दवाखाने, घरकुल, पाणी पुरवठा अशा विविध सोयी-सुविधांबाबत शासकीय योजना अधिक प्रभावीपणे राबविली जात असल्याचे दिसून येते. परिणामी, अहवालानुसार जिल्ह्यातील गरिबी ही राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बरीच कमी आहे.

- राज्यात पहिल्या दहामध्ये कोण?

नंदूरबार : ५२.१२ टक्के

धुळे : ३३.२३ टक्के

जालना : २९.४१ टक्के

हिंगोली : २८.०५ टक्के

नांदेड : २७.४८ टक्के

यवतमाळ : २३.५४

परभणी : २३.३९ टक्के

बीड : २२.६६ टक्के

वाशिम : २२.५३ टक्के

गडचिरोली : २०.५८ टक्के

- अशी आहेत गरिबीची कारणे

आहार - ३४.६० टक्के

शौचालय -२७.७२ टक्के

घरे - २४.०२ टक्के

स्वयंपाकाची साधने - २३ टक्के

कौटुंबिक आरोग्य : ९.२१

मृत्यूदर - ०.९७ टक्के

मालमत्ता - ६.७२ - टक्के

बँक खाते - ६.४१ टक्के

शालेय हजेरी - १.२३ टक्के

पिण्याचे पाणी - ६.८८ टक्के

वीज - १.६५ टक्के

आरोग्य, शिक्षण व रोजगार यांचे योग्य नियोजन व्हावे

नागपूर शहर हे गरिबीत इतर जिल्ह्याच्या तुलनेत कमी दिसून येत असले तरी ६.७२ टक्के लोक गरीब आहेतच. ही संख्या कमी होत नाही. गरिबी कमी करायची असेल तर आरोग्य, शिक्षण व रोजगार याचे शासनाने योग्य नियोजन करण्याची गरज आहे. दिल्ली सरकारच्या धर्तीवर हे काम करता येऊ शकते. ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर शहरातही शहरी रोजगार योजना राबवावी, तसेच वर्षभर रोजगार उपलब्ध होईल, याची व्यवस्था करावी. रेशनचे धान्य गरीब लोकांनाच मिळेल, अशी यंत्रणा उभी करावी. तसेच शासकीय आरोग्य सुविधा बळकट करावी. शासकीय शिक्षणाची व्यवस्था सुधारावी.

विलास भोगांडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :GovernmentसरकारNIti Ayogनिती आयोग