शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
2
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
3
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
5
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
6
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
7
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
8
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
9
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
10
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
11
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
12
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
13
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
14
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
15
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
16
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
17
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
18
कढीपत्ता फोडणीतच; बायका, मुलं, भाऊ मैदानात..! कार्यकर्त्यांची सतरंज्या उचलण्याची भूमिका कधी संपणार?
19
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
20
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात मुंबई-पुण्यानंतर नागपूरच श्रीमंत, जिल्ह्याचा गरिबी निर्देशांक ६.७२ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 12:28 IST

राज्यात मुंबई-पुण्यानंतर आपला नागपूर जिल्हा हाच श्रीमंत असल्याची बाब नीति आयोगाच्या अहवालावरून दिसून येते. नीति आयोगाने जारी केलेल्या अहवालात नागपूर जिल्ह्याचा गरिबीचा निर्देशांक ६.७२ इतका आहे.

ठळक मुद्देनीति आयोगाचा अहवाल

नागपूर : मागील काही वर्षात नागपूर झपाट्याने बदलत आहे. अनेक मोठ-मोठे प्रकल्प नागपुरात होऊ घातले आहे. अनेक विकासाचे प्रकल्प सुरू आहे. त्याचा परिणाम येथील लोकांच्या राहणीमानावरही पडला आहे. राज्यात मुंबई-पुण्यानंतर आपला नागपूर जिल्हा हाच श्रीमंत असल्याची बाब नीति आयोगाच्या अहवालावरून दिसून येते. नीति आयोगाने जारी केलेल्या अहवालात जिल्ह्याचा गरिबीचा निर्देशांक ६.७२ इतका आहे. मुंबईचा ३.५९ टक्के, मुंबई उपनगरचा ४.६५ टक्के आणि पुण्याचा ५.२९ टक्के इतका गरिबी निर्देशांक आहे.

जिल्ह्यातील २०११ ची जनगणना आणि २०१९-२० मध्ये झालेल्या कुटुंब आरोग्य सर्वेक्षणावरून नीति आयोगाने देशभरातील गरिबीचा निर्देशांक नुकताच जाहीर केला आहे. यात दर्शविण्यात आलेली गरिबी ही केवळ दरडोई उत्पन्नावर आधारित नसून, उपलब्ध घरे, वीज जोडण्या, पाण्याची व्यवस्था, स्वयंपाकाच्या इंधनाची व्यवस्था, आरोग्याच्या सुविधा, शिक्षणाच्या सोयी, मृत्यूदर अशा विविध निकषांच्या आधारावर मल्टीडायमेन्शनल पॉव्हर्टी निर्देशांक निश्चित केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील नागरिकांना शासनाच्या विविध सोयी-सुविधांचा लाभ मिळाल्याने त्यांच्या राहणीमानात सुधारणा झाली आहे.

नीति आयोगाच्या ताज्या अहवालानुसार गेल्या दहा वर्षात बीपीएलमधील काही नागरिकांची संख्या कमी झाल्याचेही दिसून येत आहे. यासोबतच जिल्ह्यात शाळा, दवाखाने, घरकुल, पाणी पुरवठा अशा विविध सोयी-सुविधांबाबत शासकीय योजना अधिक प्रभावीपणे राबविली जात असल्याचे दिसून येते. परिणामी, अहवालानुसार जिल्ह्यातील गरिबी ही राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बरीच कमी आहे.

- राज्यात पहिल्या दहामध्ये कोण?

नंदूरबार : ५२.१२ टक्के

धुळे : ३३.२३ टक्के

जालना : २९.४१ टक्के

हिंगोली : २८.०५ टक्के

नांदेड : २७.४८ टक्के

यवतमाळ : २३.५४

परभणी : २३.३९ टक्के

बीड : २२.६६ टक्के

वाशिम : २२.५३ टक्के

गडचिरोली : २०.५८ टक्के

- अशी आहेत गरिबीची कारणे

आहार - ३४.६० टक्के

शौचालय -२७.७२ टक्के

घरे - २४.०२ टक्के

स्वयंपाकाची साधने - २३ टक्के

कौटुंबिक आरोग्य : ९.२१

मृत्यूदर - ०.९७ टक्के

मालमत्ता - ६.७२ - टक्के

बँक खाते - ६.४१ टक्के

शालेय हजेरी - १.२३ टक्के

पिण्याचे पाणी - ६.८८ टक्के

वीज - १.६५ टक्के

आरोग्य, शिक्षण व रोजगार यांचे योग्य नियोजन व्हावे

नागपूर शहर हे गरिबीत इतर जिल्ह्याच्या तुलनेत कमी दिसून येत असले तरी ६.७२ टक्के लोक गरीब आहेतच. ही संख्या कमी होत नाही. गरिबी कमी करायची असेल तर आरोग्य, शिक्षण व रोजगार याचे शासनाने योग्य नियोजन करण्याची गरज आहे. दिल्ली सरकारच्या धर्तीवर हे काम करता येऊ शकते. ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर शहरातही शहरी रोजगार योजना राबवावी, तसेच वर्षभर रोजगार उपलब्ध होईल, याची व्यवस्था करावी. रेशनचे धान्य गरीब लोकांनाच मिळेल, अशी यंत्रणा उभी करावी. तसेच शासकीय आरोग्य सुविधा बळकट करावी. शासकीय शिक्षणाची व्यवस्था सुधारावी.

विलास भोगांडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :GovernmentसरकारNIti Ayogनिती आयोग