शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

राज्यात मुंबई-पुण्यानंतर नागपूरच श्रीमंत, जिल्ह्याचा गरिबी निर्देशांक ६.७२ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 12:28 IST

राज्यात मुंबई-पुण्यानंतर आपला नागपूर जिल्हा हाच श्रीमंत असल्याची बाब नीति आयोगाच्या अहवालावरून दिसून येते. नीति आयोगाने जारी केलेल्या अहवालात नागपूर जिल्ह्याचा गरिबीचा निर्देशांक ६.७२ इतका आहे.

ठळक मुद्देनीति आयोगाचा अहवाल

नागपूर : मागील काही वर्षात नागपूर झपाट्याने बदलत आहे. अनेक मोठ-मोठे प्रकल्प नागपुरात होऊ घातले आहे. अनेक विकासाचे प्रकल्प सुरू आहे. त्याचा परिणाम येथील लोकांच्या राहणीमानावरही पडला आहे. राज्यात मुंबई-पुण्यानंतर आपला नागपूर जिल्हा हाच श्रीमंत असल्याची बाब नीति आयोगाच्या अहवालावरून दिसून येते. नीति आयोगाने जारी केलेल्या अहवालात जिल्ह्याचा गरिबीचा निर्देशांक ६.७२ इतका आहे. मुंबईचा ३.५९ टक्के, मुंबई उपनगरचा ४.६५ टक्के आणि पुण्याचा ५.२९ टक्के इतका गरिबी निर्देशांक आहे.

जिल्ह्यातील २०११ ची जनगणना आणि २०१९-२० मध्ये झालेल्या कुटुंब आरोग्य सर्वेक्षणावरून नीति आयोगाने देशभरातील गरिबीचा निर्देशांक नुकताच जाहीर केला आहे. यात दर्शविण्यात आलेली गरिबी ही केवळ दरडोई उत्पन्नावर आधारित नसून, उपलब्ध घरे, वीज जोडण्या, पाण्याची व्यवस्था, स्वयंपाकाच्या इंधनाची व्यवस्था, आरोग्याच्या सुविधा, शिक्षणाच्या सोयी, मृत्यूदर अशा विविध निकषांच्या आधारावर मल्टीडायमेन्शनल पॉव्हर्टी निर्देशांक निश्चित केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील नागरिकांना शासनाच्या विविध सोयी-सुविधांचा लाभ मिळाल्याने त्यांच्या राहणीमानात सुधारणा झाली आहे.

नीति आयोगाच्या ताज्या अहवालानुसार गेल्या दहा वर्षात बीपीएलमधील काही नागरिकांची संख्या कमी झाल्याचेही दिसून येत आहे. यासोबतच जिल्ह्यात शाळा, दवाखाने, घरकुल, पाणी पुरवठा अशा विविध सोयी-सुविधांबाबत शासकीय योजना अधिक प्रभावीपणे राबविली जात असल्याचे दिसून येते. परिणामी, अहवालानुसार जिल्ह्यातील गरिबी ही राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बरीच कमी आहे.

- राज्यात पहिल्या दहामध्ये कोण?

नंदूरबार : ५२.१२ टक्के

धुळे : ३३.२३ टक्के

जालना : २९.४१ टक्के

हिंगोली : २८.०५ टक्के

नांदेड : २७.४८ टक्के

यवतमाळ : २३.५४

परभणी : २३.३९ टक्के

बीड : २२.६६ टक्के

वाशिम : २२.५३ टक्के

गडचिरोली : २०.५८ टक्के

- अशी आहेत गरिबीची कारणे

आहार - ३४.६० टक्के

शौचालय -२७.७२ टक्के

घरे - २४.०२ टक्के

स्वयंपाकाची साधने - २३ टक्के

कौटुंबिक आरोग्य : ९.२१

मृत्यूदर - ०.९७ टक्के

मालमत्ता - ६.७२ - टक्के

बँक खाते - ६.४१ टक्के

शालेय हजेरी - १.२३ टक्के

पिण्याचे पाणी - ६.८८ टक्के

वीज - १.६५ टक्के

आरोग्य, शिक्षण व रोजगार यांचे योग्य नियोजन व्हावे

नागपूर शहर हे गरिबीत इतर जिल्ह्याच्या तुलनेत कमी दिसून येत असले तरी ६.७२ टक्के लोक गरीब आहेतच. ही संख्या कमी होत नाही. गरिबी कमी करायची असेल तर आरोग्य, शिक्षण व रोजगार याचे शासनाने योग्य नियोजन करण्याची गरज आहे. दिल्ली सरकारच्या धर्तीवर हे काम करता येऊ शकते. ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर शहरातही शहरी रोजगार योजना राबवावी, तसेच वर्षभर रोजगार उपलब्ध होईल, याची व्यवस्था करावी. रेशनचे धान्य गरीब लोकांनाच मिळेल, अशी यंत्रणा उभी करावी. तसेच शासकीय आरोग्य सुविधा बळकट करावी. शासकीय शिक्षणाची व्यवस्था सुधारावी.

विलास भोगांडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :GovernmentसरकारNIti Ayogनिती आयोग