शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

नागपूर शहर बस कर्मचाऱ्यांच्या संपाला ‘एस्मा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 22:28 IST

महापालिकेच्या आपली बसच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मंगळवारी बेमुदत संप पुकारला आहे. संपामुळे नागपूर शहरातील परिवहन सेवा विस्कळीत झाल्याने महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम २०११(एस्मा)च्या तरतुदीनुसार परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या संपावर बंदी घातली आहे

ठळक मुद्देमहाराष्ट्र शासनाचे आदेश : संप चिघळण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या आपली बसच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मंगळवारी बेमुदत संप पुकारला आहे. संपामुळे नागपूर शहरातील परिवहन सेवा विस्कळीत झाल्याने महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम २०११(एस्मा)च्या तरतुदीनुसार परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या संपावर बंदी घातली आहे. महाराष्ट्र शासनाचे नगर विकास विभागाचे सहसचिव सं. श. गोखले यांनी मंगळवारी सायंकाळी याबाबतचे आदेश काढले आहेत. यानंतरही कामगार संघटना संपावर ठाम राहिल्यास संप चिघळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे सुधारित किमान वेतन मिळावे, यासाठी शिवसेनाप्रणीत भारतीय कामगार सेना-चालक वाहक संघटनेने मंगळवारपासून संपाचा इशारा दिला होता. सोमवारी रात्री उशिरापर्यंत यावर तोडगा निघालेला नव्हता.कर्मचाऱ्यांच्या वेतनावरून २० चालक व वाहकांच्या संघटनेने शहरातील ३७५ बसेसची वाहतूक बंद ठेवली आहे. हा संप बेकायदेशीर असून, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी महापौर नंदा जिचकार व सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी चर्चा केली. सायंकाळी ६.३० च्या सुमारास नगर विकास विभागाने एस्मा लागू करण्याचे आदेश काढले आहेत. यामुळे बस कामगारात खळबळ उडाली आहे. रात्री उशिरापर्यंत महापालिकेचा परिवहन विभाग व आंदोलनकर्ते यांच्यातील वाद मिटलेला नव्हता.उद्योग, कामगार, ऊर्जा मंत्रालयाच्या २० जुलै २०१० च्या अधिसूचनेनुसार बस चालक व वाहकांना वेतन दिले जाते. त्यानुसार चालकांना ११९८ व वाहकांना ९,५०० रुपये वेतन दिले जाते. वंश निमय इन्फ्रा प्रोजेक्ट कर्मचाऱ्यांना वाढीव भत्ता देत होती. त्यानुसार त्यांना वेतन मिळत होते. सध्या महापालिका कायद्यानुसार वेतन दिले जात आहे. त्यामुळे संप अवैध असल्याची माहिती आयुक्त अश्विन मुदगल यांनी सभागृहात दिली तर उद्योग व कामगार मंत्रालय शिवसेनेकडे आहे. वेतनाबाबतचा प्रस्ताव महापालिकेने या विभागाकडे पाठविलेला आहे. परंतु यावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी दिली.शिवसेनेचे नेते आंदोलकांना चिथावणी देत आहेत. मंगळवारी पहाटे ४ वाजता परिवहन विभाग व परिवहन समितीच्या सदस्यांनी संप टाळण्यासाठी प्रयत्न केला. खापरी ते बुटीबोरी मार्गावर बसेस सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र छत्रपती चौकात शिवसेना नेत्यांनी बसेस थांबविल्या. प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून बस वाहतूक बंद ठेवण्यात आली. २० आंदोलक कर्मचाऱ्यांना चिथावणी देत असल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी दिली. गेल्या वेळी संप कालावधीत ९.६० लाखांचा दंड आकारण्यात आला होता. तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले; परंतु कर्मचारी संघटनेकडून प्रतिसाद मिळाला नाही, असेही त्यांनी सांगितले.तर विना तिकीट बसेस चालवू - संदीप जोशीआपली बस कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप बेकायदेशीर आहे. सायंकाळपर्यंत अनेकदा चर्चेसाठी बोलावले, परंतु आंदोलनकर्त्यांनी प्रतिसाद दिला नाही. पोलीस आयुक्त डॉ. वेंकटेशम यांच्याशी चर्चा झाली. शहरातील प्रवासी व विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. आंदोलकांनी संप मागे न घेतल्यास अन्य चालकांच्या मदतीने बसेस चालविल्या जातील. यासाठी कंडक्टरची गरज भासणार नाही. सर्व पर्याय उपलब्ध असल्याची माहिती सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी दिली.

टॅग्स :Bus DriverबसचालकStrikeसंप