शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

नागपूर शहर बस कर्मचाऱ्यांच्या संपाला ‘एस्मा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 22:28 IST

महापालिकेच्या आपली बसच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मंगळवारी बेमुदत संप पुकारला आहे. संपामुळे नागपूर शहरातील परिवहन सेवा विस्कळीत झाल्याने महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम २०११(एस्मा)च्या तरतुदीनुसार परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या संपावर बंदी घातली आहे

ठळक मुद्देमहाराष्ट्र शासनाचे आदेश : संप चिघळण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या आपली बसच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मंगळवारी बेमुदत संप पुकारला आहे. संपामुळे नागपूर शहरातील परिवहन सेवा विस्कळीत झाल्याने महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम २०११(एस्मा)च्या तरतुदीनुसार परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या संपावर बंदी घातली आहे. महाराष्ट्र शासनाचे नगर विकास विभागाचे सहसचिव सं. श. गोखले यांनी मंगळवारी सायंकाळी याबाबतचे आदेश काढले आहेत. यानंतरही कामगार संघटना संपावर ठाम राहिल्यास संप चिघळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे सुधारित किमान वेतन मिळावे, यासाठी शिवसेनाप्रणीत भारतीय कामगार सेना-चालक वाहक संघटनेने मंगळवारपासून संपाचा इशारा दिला होता. सोमवारी रात्री उशिरापर्यंत यावर तोडगा निघालेला नव्हता.कर्मचाऱ्यांच्या वेतनावरून २० चालक व वाहकांच्या संघटनेने शहरातील ३७५ बसेसची वाहतूक बंद ठेवली आहे. हा संप बेकायदेशीर असून, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी महापौर नंदा जिचकार व सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी चर्चा केली. सायंकाळी ६.३० च्या सुमारास नगर विकास विभागाने एस्मा लागू करण्याचे आदेश काढले आहेत. यामुळे बस कामगारात खळबळ उडाली आहे. रात्री उशिरापर्यंत महापालिकेचा परिवहन विभाग व आंदोलनकर्ते यांच्यातील वाद मिटलेला नव्हता.उद्योग, कामगार, ऊर्जा मंत्रालयाच्या २० जुलै २०१० च्या अधिसूचनेनुसार बस चालक व वाहकांना वेतन दिले जाते. त्यानुसार चालकांना ११९८ व वाहकांना ९,५०० रुपये वेतन दिले जाते. वंश निमय इन्फ्रा प्रोजेक्ट कर्मचाऱ्यांना वाढीव भत्ता देत होती. त्यानुसार त्यांना वेतन मिळत होते. सध्या महापालिका कायद्यानुसार वेतन दिले जात आहे. त्यामुळे संप अवैध असल्याची माहिती आयुक्त अश्विन मुदगल यांनी सभागृहात दिली तर उद्योग व कामगार मंत्रालय शिवसेनेकडे आहे. वेतनाबाबतचा प्रस्ताव महापालिकेने या विभागाकडे पाठविलेला आहे. परंतु यावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी दिली.शिवसेनेचे नेते आंदोलकांना चिथावणी देत आहेत. मंगळवारी पहाटे ४ वाजता परिवहन विभाग व परिवहन समितीच्या सदस्यांनी संप टाळण्यासाठी प्रयत्न केला. खापरी ते बुटीबोरी मार्गावर बसेस सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र छत्रपती चौकात शिवसेना नेत्यांनी बसेस थांबविल्या. प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून बस वाहतूक बंद ठेवण्यात आली. २० आंदोलक कर्मचाऱ्यांना चिथावणी देत असल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी दिली. गेल्या वेळी संप कालावधीत ९.६० लाखांचा दंड आकारण्यात आला होता. तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले; परंतु कर्मचारी संघटनेकडून प्रतिसाद मिळाला नाही, असेही त्यांनी सांगितले.तर विना तिकीट बसेस चालवू - संदीप जोशीआपली बस कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप बेकायदेशीर आहे. सायंकाळपर्यंत अनेकदा चर्चेसाठी बोलावले, परंतु आंदोलनकर्त्यांनी प्रतिसाद दिला नाही. पोलीस आयुक्त डॉ. वेंकटेशम यांच्याशी चर्चा झाली. शहरातील प्रवासी व विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. आंदोलकांनी संप मागे न घेतल्यास अन्य चालकांच्या मदतीने बसेस चालविल्या जातील. यासाठी कंडक्टरची गरज भासणार नाही. सर्व पर्याय उपलब्ध असल्याची माहिती सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी दिली.

टॅग्स :Bus DriverबसचालकStrikeसंप