शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात बोट, लाईफ जॅकेट, जवान तयार : आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 00:13 IST

पावसाला सुरुवात झाली असून जिल्ह्यात कुठलीही नैसर्गिक आपत्ती आल्यास त्याचा सामना करण्यासाठी आणि लोकांच्या मदतीसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बोट, लाईफ जॅकेटसह एसडीआरएफचे १५० जवान तयार आहेत.

ठळक मुद्देप्रत्येक तालुक्यात शोध बचाव पथक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसाला सुरुवात झाली असून जिल्ह्यात कुठलीही नैसर्गिक आपत्ती आल्यास त्याचा सामना करण्यासाठी आणि लोकांच्या मदतीसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बोट, लाईफ जॅकेटसह एसडीआरएफचे १५० जवान तयार आहेत.२००५ च्या आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तयार करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी हे या प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात. तालुका स्तरावरही ही समिती कार्यरत असते. प्राधिकरण हे वर्षभर कार्यरत असते. परंतु मान्सूनच्या काळात विशेष काळजी घेतली जाते. आपत्ती व्यवस्थापन हे केवळ एका विभागाचे काम नाही. प्रत्येक विभागाच्या सहकार्याने याचे नियोजन केले जाते. त्यामुळे प्रत्येक विभागाचेच यात मोलाचे सहकार्य असते. आपत्तीच्या काळात विभागांचे नेमके नियोजन कसे असावे, यासाठी प्रत्येक विभागातील अधिकऱ्यांचे प्रशिक्षण केले जाते. हे प्रशिक्षण पार पडले आहे. यामध्ये आपत्ती आल्यास विभागांनी नेमके काय करवे, त्या-त्या विभागाची काय जबाबदारी राहील, याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. याकाळात विशेषत: जनजागृतीवर अधिक भर दिला जात आहे. महापालिकेचा अग्निशमन विभाग, रेड क्रॉस सोसायटी आणि एसडीआरएफ यांनी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.जिल्ह्यातील आपत्तीचा सामना करण्यासाठी सध्या ३ बोटी, १५० लाईफ जॅकेट, १५० लाईफ बॉय, २२ इन्फाटेबल लाईट ही प्रमुख सामुग्री आहे. यासोबतच आवश्यक इतर लहानसहान वस्तूही आहेत. ही सामुग्री पुरेशी आहे. यासोबतच एसडीआरएफचे (स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स) १५० जवान तैनात आहेत. एसडीआरएफच्या २२ ते २३ टीम तयार करण्यात आल्या आहेत. ही टीम अतिशय प्रशिक्षित असल्याने कुठल्याही आपत्तीचा सामना करण्यास सज्ज आहे. यासोबतच नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सचीही एक टीम तैनात राहणार आहे.शालेय विद्यार्थ्यांना प्रशिक्षणआपत्ती व्यवस्थापनाचा सामना करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असते. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थान केंद्राद्वारे नागपुुरातील विविध शाळांमधील मुलांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामध्ये एखादी नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास काय करायला हवे, याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.२४ तास सुरू राहणार नियंत्रण कक्षजिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आले आहे. ते सातही दिवस २४ तास सुरू राहील. यासाठी तिन्ही पाळ्यातील कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुटीच्या दिवशीही हे केंद्र सुरू राहील. तशी कर्मचाºयांची ड्युटी लावण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षाचा टोल फ्री क्रमांक १०७७ आहे. तर ०७१२-२५६२६६८ हा या नियंत्रण कक्षाचा क्रमांक आहे. कुठलाही कॉल आला तर संबंधितांना लगेच कळविले जाते. त्यामुळे तातडीने कारवाई शक्य होईल, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यांनी सांगितले.प्रत्येक तालुकास्तरावर शोध बचाव पथकप्रत्येक तालुका व महत्त्वाच्या ठिकाणी शोध बचाव पथक सज्ज ठेवण्यात आले आहे. यामध्ये चांगले पोहता येणारे लोक, होमगार्ड यांचा समावेश आहे. प्रत्येक तालुक्यात जवळपास ३० लोकांचे पथक असून गावपातळीवर ५ ते १० जणांचे पथक आहे.

 

टॅग्स :floodपूरNagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालय