शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

नागपुरात बोट, लाईफ जॅकेट, जवान तयार : आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 00:13 IST

पावसाला सुरुवात झाली असून जिल्ह्यात कुठलीही नैसर्गिक आपत्ती आल्यास त्याचा सामना करण्यासाठी आणि लोकांच्या मदतीसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बोट, लाईफ जॅकेटसह एसडीआरएफचे १५० जवान तयार आहेत.

ठळक मुद्देप्रत्येक तालुक्यात शोध बचाव पथक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसाला सुरुवात झाली असून जिल्ह्यात कुठलीही नैसर्गिक आपत्ती आल्यास त्याचा सामना करण्यासाठी आणि लोकांच्या मदतीसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बोट, लाईफ जॅकेटसह एसडीआरएफचे १५० जवान तयार आहेत.२००५ च्या आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तयार करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी हे या प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात. तालुका स्तरावरही ही समिती कार्यरत असते. प्राधिकरण हे वर्षभर कार्यरत असते. परंतु मान्सूनच्या काळात विशेष काळजी घेतली जाते. आपत्ती व्यवस्थापन हे केवळ एका विभागाचे काम नाही. प्रत्येक विभागाच्या सहकार्याने याचे नियोजन केले जाते. त्यामुळे प्रत्येक विभागाचेच यात मोलाचे सहकार्य असते. आपत्तीच्या काळात विभागांचे नेमके नियोजन कसे असावे, यासाठी प्रत्येक विभागातील अधिकऱ्यांचे प्रशिक्षण केले जाते. हे प्रशिक्षण पार पडले आहे. यामध्ये आपत्ती आल्यास विभागांनी नेमके काय करवे, त्या-त्या विभागाची काय जबाबदारी राहील, याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. याकाळात विशेषत: जनजागृतीवर अधिक भर दिला जात आहे. महापालिकेचा अग्निशमन विभाग, रेड क्रॉस सोसायटी आणि एसडीआरएफ यांनी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.जिल्ह्यातील आपत्तीचा सामना करण्यासाठी सध्या ३ बोटी, १५० लाईफ जॅकेट, १५० लाईफ बॉय, २२ इन्फाटेबल लाईट ही प्रमुख सामुग्री आहे. यासोबतच आवश्यक इतर लहानसहान वस्तूही आहेत. ही सामुग्री पुरेशी आहे. यासोबतच एसडीआरएफचे (स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स) १५० जवान तैनात आहेत. एसडीआरएफच्या २२ ते २३ टीम तयार करण्यात आल्या आहेत. ही टीम अतिशय प्रशिक्षित असल्याने कुठल्याही आपत्तीचा सामना करण्यास सज्ज आहे. यासोबतच नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सचीही एक टीम तैनात राहणार आहे.शालेय विद्यार्थ्यांना प्रशिक्षणआपत्ती व्यवस्थापनाचा सामना करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असते. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थान केंद्राद्वारे नागपुुरातील विविध शाळांमधील मुलांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामध्ये एखादी नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास काय करायला हवे, याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.२४ तास सुरू राहणार नियंत्रण कक्षजिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आले आहे. ते सातही दिवस २४ तास सुरू राहील. यासाठी तिन्ही पाळ्यातील कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुटीच्या दिवशीही हे केंद्र सुरू राहील. तशी कर्मचाºयांची ड्युटी लावण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षाचा टोल फ्री क्रमांक १०७७ आहे. तर ०७१२-२५६२६६८ हा या नियंत्रण कक्षाचा क्रमांक आहे. कुठलाही कॉल आला तर संबंधितांना लगेच कळविले जाते. त्यामुळे तातडीने कारवाई शक्य होईल, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यांनी सांगितले.प्रत्येक तालुकास्तरावर शोध बचाव पथकप्रत्येक तालुका व महत्त्वाच्या ठिकाणी शोध बचाव पथक सज्ज ठेवण्यात आले आहे. यामध्ये चांगले पोहता येणारे लोक, होमगार्ड यांचा समावेश आहे. प्रत्येक तालुक्यात जवळपास ३० लोकांचे पथक असून गावपातळीवर ५ ते १० जणांचे पथक आहे.

 

टॅग्स :floodपूरNagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालय