शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

नागपूर खंडपीठ : २२ महिन्यात ६९२३ अपिल व ११७४ तक्रारी निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 00:36 IST

राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठाने झिरो पेंडेन्सी अभियान राबविल्यामुळे गेल्या २२ महिन्यात माहिती आयोगाकडे आलेल्या ६९२३ अपिल व ११७४ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहे. त्याचबरोबर २०१७ या कालावधीत ३७ प्रकरणांमध्ये २ लाख ४५ हजार ५०० रुपयांचा दंड अधिकाऱ्यांना ठोठावला आहे. नागपूर खंडपीठाचे माहिती आयुक्त दिलीप धारुरकर यांनी संवाद या कार्यक्रमात प्रसार माध्यमांना माहिती दिली.

ठळक मुद्देमाहिती आयुक्त दिलीप धारुरकर यांची माहिती : ३७ प्रकरणात २.५ लाख रुपयांचा ठोठावला दंड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठाने झिरो पेंडेन्सी अभियान राबविल्यामुळे गेल्या २२ महिन्यात माहिती आयोगाकडे आलेल्या ६९२३ अपिल व ११७४ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहे. त्याचबरोबर २०१७ या कालावधीत ३७ प्रकरणांमध्ये २ लाख ४५ हजार ५०० रुपयांचा दंड अधिकाऱ्यांना ठोठावला आहे. नागपूर खंडपीठाचे माहिती आयुक्त दिलीप धारुरकर यांनी संवाद या कार्यक्रमात प्रसार माध्यमांना माहिती दिली.यावेळी नागपूर खंडपीठातील सुरेश टोंगे, नंदकुमार राऊत, डॉ. सुबोध नंदागवळी व जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर उपस्थित होते. यावेळी बोलताना धारुरकर म्हणाले की, सामान्य नागरिकांच्या समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी माहिती अधिकाराचा उपयोग होत आहे. कोणतीही माहिती कुणालाही विचारण्याचा अधिकार कायद्याने दिला आहे. संसद आणि विधिमंडळाला देय असलेली माहिती सामान्य नागरिकालाही देय आहे. गैरव्यवहारावर वचक व सोशल आॅडिटींग माहिती अधिकाराच्या माध्यमातून करता येते. माहिती आयोगामुळे अर्जदारांना कसा न्याय मिळाला याची काही उदाहरणे यावेळी त्यांनी दिली. एका प्रकरणात व्यक्तीने बांधकामाच्या परवानगी मागितली. अनेक महिने लोटून गेल्यानंतरही परवानगी मिळाली नाही.माहिती अधिकारात माहिती मागितली असता फाईल हरविल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आयोगाने फाईल हरविल्याची तक्रार पोलिसात देण्याचे आदेश देताच फाईल मिळाली. आयोगाने अधिकाऱ्यांना दंड ठोठावत अर्जदारला नुकसान भरपाईचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.माहिती अधिकार हा कायदा लोकशाहीच्या व्याख्येची अनुभूती करून देणारा आहे. माहिती न दिल्यास अधिकाऱ्यावर दंडासोबत शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.आयोगाने घेतला विशेष ड्राईव्हहिंगोलीत एका सामाजिक कार्यकर्त्याने ३५० माहिती अधिकाराचे अर्ज एकाच दिवशी आयोगाकडे दाखल केले. त्याने ग्रामपंचायतीकडून ५ वर्षांतील लेखा परीक्षणाचा अहवाल मागितला होता. मात्र ग्राम पंचायत अधिकाऱ्यांनी माहिती दिली नाही. तेव्हा आयोगाच्या औरंगाबाद खंडपीठाने विशेष ड्राईव्ह घेऊन विशेष तपासणी केली असता अनेक ठिकाणी लेखा परीक्षणे झालीच नसल्याचे आढळून आले. ग्रामंचायत पातळीवरही लेखा परिक्षण करावे, रेकॉर्डची तपासणी यासंदर्भात शासनाला सूचना करण्यात येणार असल्याचे धारुरकर यांनी सांगितले.आठवड्यातून एक दिवस सामान्य नागरिक बघू शकतील कागदपत्रपुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयात आठवड्यातील एक दिवस सामान्य नागरीक त्यांना आवश्यक असलेले कागदपत्र बघू शकतील, असा निर्णय घेतला होता. शासनाने या उपक्रमाची राज्यभर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. आठवड्यातून एक दिवस नागरिकांसाठी कागदपत्रे पाहणीसाठी खुले ठेवण्यासंदर्भात शासन निर्णय काढला आहे. हा निर्णय चांगला असून यामुळे आयोगाकडे येणाºया तक्रारी काही प्रमाणात कमी होतील, असा विश्वास दिलीप धारुरकर यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :Right to Information actमाहिती अधिकारnagpurनागपूर