शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

-तर ‘जलयुक्त’ होणार नागपूर!

By admin | Updated: June 6, 2017 01:43 IST

राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार उपक्रमामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी निश्चित वाढेल.

सिमेंट रोड ठरणार डोकेदुखी   पावसाचे पाणी घरात शिरणार  रस्ते झाले उंच; घरे पडली ठेंगणी  मनपाचे नियोजन फसले लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार उपक्रमामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी निश्चित वाढेल. मात्र नागपूर महापालिकेचे चुकीचे नियोजन आणि कंत्राटदारांनी सिमेंट रोडच्या कामात केलेल्या हलगर्जीपणामुळे यंदाच्या पावसाळ्यात नागपूर ‘जलयुक्त’ निश्चितच होणार आहे. रस्ते उंच आणि घर ठेंगणे झाल्याने, पावसाळ्यात घरात पाणी शिरणार आहे. लोकमत चमूने सिमेंट रोडचे बांधकाम झालेल्या शहरातील सर्व प्रमुख मार्गावरील रस्तांच्या आढावा घेतला असता कामातील त्रुटीमुळे सामान्य नागरिकांना सर्वाधिक फटका बसणार असल्याचे दिसून आले. इकडे पावसाळी पाणी घरात शिरू नये म्हणून सिमेंट रोडलगत घर आणि व्यावसायिक प्रतिष्ठान असलेल्या नागपूरकरांना घराची आणि आवारभिंतीची उंची वाढवावी लागणार असल्याने खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. दुर्गानगरातील वास्तव दक्षिण नागपुरात दुर्गानगर परिसरात सिमेंटरोडचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहेत. अजून पावसाळाही सुरू व्हायचा आहे. परंतु या रस्त्याच्या दोन्ही बाजूला राहणाऱ्या लोकांमध्ये पावसाच्या पाण्याची भीती जाणवू लागली आहे. मानेवाडा रोड ते अयोध्यानगरला जोडणारा हा रस्ता आहे. या रस्त्यावर किमान १०० ते १५० घरे दोन्ही बाजूला आहे. या रस्त्याच्या सिमेंटीकरणाचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. रस्ता बनून तयार झाला आहे. आता फुटपाथचे काम सुरू आहे. परंतु या रस्त्यामुळे अनेकांची घरे रस्त्याखाली आली आहे. त्यामुळे पावसाळ्याचे पाणी घरात शिरण्याची भीती त्यांना आहे. रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी आवश्यक चेंबर दिलेले नाही. रस्त्याचे पाणी घरात शिरणार नाही यासाठी येथील रहिवाशांना भरण टाकून रस्त्याच्या लेव्हलमध्ये अंगण आणायचे आहे. रस्त्यामुळे आगाऊचा भुर्दंड आमच्यावर बसणार असल्याची प्रतिक्रिया या रस्त्यावरील रहिवाशांची आहे. रस्त्यामुळे ५० हजारांचा खर्च आहेरस्त्याच्या बांधकामाच्या सुरुवातीलाच आमचे पाणी पुरवठ्याचे कनेक्शन तुटले. आता हा रस्ता बनलाय. रस्ता उंच आणि घर ठेंगणे असे झाले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी घरात शिरू नये त्यासाठी आता ५० हजारांचा खर्च करावा लागणार आहे. - मीनल भाके, रहिवासी, दुर्गानगर