शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

नागपूरलाही डेल्टा व्हेरियंटचा धोका! मध्य प्रदेशातून मोठ्या संख्येत येतात रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 11:30 IST

Nagpur News मध्य प्रदेशात या व्हेरियंटचे सात रुग्ण व एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या राज्यातून मोठ्या संख्येत रुग्ण नागपुरात उपचारासाठी येतात.

सुमेध वाघमारे

नागपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल केले जात आहे तर दुसरीकडे, कोरोनाच्या नवीन ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’ने चिंता वाढवली आहे. अधिक संसर्गजन्य असलेल्या या व्हेरियंटचा तूर्तास तरी नागपूर जिल्ह्यात एकही रुग्ण नाही. परंतु शेजारच्या मध्य प्रदेशात या व्हेरियंटचे सात रुग्ण व एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या राज्यातून मोठ्या संख्येत रुग्ण नागपुरात उपचारासाठी येतात. जानेवारी ते मे २०२१ या कालावधीत एकट्या मेडिकलमध्ये मध्य प्रदेशातील ६९ कोरोनाबाधितांचे बळी गेले आहेत. सध्यातरी डेल्टाला घेऊन कुठेही निर्बंध लावण्यात आलेले नाहीत. यामुळे या व्हेरियंटचा धोका नागपूर जिल्ह्यासह पूर्व विदर्भाला बसण्याची दाट शक्यता आहे.

डेल्टा प्लस व्हेरियंट जगभरात फैलावत असून ८५ देशांमध्ये आढळल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिली आहे. ‘डब्ल्यूएचओ’ने कोरोनाचा या नव्या विषाणूचा प्रकाराला घेऊन इशाराही दिला आहे. या ‘व्हेरियंट’चा संसर्गाचा दर कायम राहिल्यास कोरोनाच्या इतर विषाणूंपेक्षा अधिक वर्चस्व निर्माण करण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केलेल्या आपल्या साप्ताहिक अहवालात डेल्टा व्हेरियंट ८५ देशांमध्ये आढळला आहे. महाराष्ट्रात डेल्टा व्हेरियंटचे २१ रुग्ण आहेत. या विषाणूच्या संसर्गामुळे रत्नागिरी जिल्ह्यात पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नुकताच याला दुजोराही दिला आहे.

-मध्य प्रदेशातील ६९ बाधितांचा नागपुरात मृत्यू

कोरोनाचा दुसऱ्या लाटेच्या दरम्यान शेजारील राज्यातून शेकडो रुग्ण नागपुरात उपचारासाठी आले. यातील मध्य प्रदेशातील ६९, छत्तीसगड येथील ५, उत्तर प्रदेशातील ३, झारखंड येथील ३ तर बिहार येथील १ रुग्ण असे एकूण ८१ रुग्णांचा उपचारादरम्यान एकट्या मेडिकलमध्ये मृत्यू झाले आहेत. यामुळे नागपूर जिल्ह्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.

-केवळ नमुने घेण्यावरच भर

डेल्टा व्हेरियंट विषाणूचे निदान करण्यासाठी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) प्रयोगशाळेला दर १५ दिवसांनी कोरोनाबाधितांचे १५ नमुने पुण्याच्या ‘एनआयव्ही’ प्रयोगशाळेत पाठविण्याचा सूचना आहेत. मागील महिन्यापासून ते आतापर्यंत जवळपास ४५ नमुने पाठविण्यात आले, परंतु एकाचाही अहवाल प्रयोगशाळेला प्राप्त झाला नसल्याची माहिती आहे.

-जिल्ह्याबाहेरील प्रवाशांना आयसोलेशन करावे

शेजारच्या राज्यासोबतच इतर जिल्हातून येणाऱ्यांची कोरोना तपासणी करून त्यांचा अहवाल येईपर्यंत त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवायला हवे. यातील गंभीर रुग्णांची ‘जिनोम सिक्वेंसिंग’ करून त्याचा तातडीने अहवाल प्राप्त व्हायला हवा. यामुळे डेल्टा व्हेरियंटचा संसर्ग पसरण्यावर काही प्रमाणात नियंत्रण येईल. कोरोनाचा दुसऱ्या लाटेत नागपुरात झालेल्या उद्रेकाला काही प्रमाणात जिल्ह्याबाहेरील व इतर राज्यातील रुग्ण जबाबदार आहेत. आता तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त केला जात असल्याने आतापासून सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.

-डॉ. प्रशांत पाटील, प्रमुख औषधवैद्यकशास्त्र विभाग मेडिकल

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस