शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘नागोराव पाटणकर’ सूरसेनापतीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 01:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धम्मक्रांतीचा प्रचार, प्रसार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जनमानसात रुजविण्याचे काम त्या काळात लोककवि व गीतकारांनी केले. यात नागोराव पाटणकर यांचा मोलाचा वाटा आहे. आंबेडकरी चळवळ गतिमान करणारे ते खरे सूरसेनापती होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवि इ. मो. नारनवरे यांनी केले.आंबेडकरी लोक गायक दिवंगत नागोराव पाटणकर ...

ठळक मुद्देइ.मो. नारनवरे : रिपब्लिकन मुव्हमेंटतर्फे कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धम्मक्रांतीचा प्रचार, प्रसार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जनमानसात रुजविण्याचे काम त्या काळात लोककवि व गीतकारांनी केले. यात नागोराव पाटणकर यांचा मोलाचा वाटा आहे. आंबेडकरी चळवळ गतिमान करणारे ते खरे सूरसेनापती होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवि इ. मो. नारनवरे यांनी केले.आंबेडकरी लोक गायक दिवंगत नागोराव पाटणकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त रविवारी सामाजिक संघटना रिपब्लिकन मुव्हमेंटतर्फे नेताजी मार्केट येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी इ. मो. नारनवरे यांनी पाटणकर यांच्या गीतांमधून आंबेडकरी चळवळ कशी गतिमान होत गेली, हे उदाहरणांसह सांगत पाटणकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. पाटणकर यांनी धम्मप्रचारासह समाजाचे प्रश्नसुद्धा गीतांमधून मांडले. आंबेडकरी चळवळीतील गायनाच्या क्षेत्रातील ते खºया अर्थाने सूरसेनापती होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी ज्येष्ठ सामजिक कार्यकर्ते मारोतराव कांबळे, ज्येष्ठ साहित्यिक ताराचंद्र खांडेकर, भीमराव वैद्य, कवी भोला सरवर, नरेंद्र शेलार, नारायण बागडे, डॉ. विनोद डोंगरे यांनीही पाटणकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. प्रास्ताविक रिपब्लिकन मुव्हमेंटचे अध्यक्ष नरेश वाहाणे यांनी केले. संचालन सेवक लव्हात्रे यांनी केले. आजच्या सांस्कृतिक दहशतवादला खरे उत्तरज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक ताराचंद्र खांडेकर म्हणाले, नागोराव पाटणकर हे आंबेडकरी तत्त्वज्ञान, विचार आणि आंदोलनासाठी जगले. त्यांच्या सारखा एकही लोककलावंत आज दिसत नाही. आजच्या सांस्कृतिक दहशतवादाला नागोराव पाटणकर यांची गीते आणि त्यांची शैली हे खरे उत्तर आहे.