शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
3
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
4
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
5
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
6
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
7
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
8
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
10
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
11
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
12
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
13
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
14
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
16
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
17
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
18
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
19
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
20
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील शहर बससेवा ३४ तास ठप्प, प्रवासी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 11:38 IST

कर्मचाऱ्यांचे वेतन व डिझेल भरण्यासाठी पैसे नसल्याने रेड बसच्या तीन आॅपरेटरने शुक्रवारी अघोषित संप पुकारला. महापालिका प्रशासन व बस आॅपरेटर यांच्या वादात विद्यार्थी व प्रवाशांना हकनाक त्रास सहन करावा लागला.

ठळक मुद्देथकीत बिलासाठी आॅपरेटरचा संपप्रशासन व आॅपरेटरच्या वादात नागरिक वेठीस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या बिकट आर्थिक स्थितीचा फटका आपली बसला बसला आहे. गेल्या तीन महिन्यापासून रेड बस आॅपरेटरचे ४२ कोटी थकीत आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन व डिझेलसाठी किमात २१ कोटी द्यावे, अशी मागणी महापालिका प्रशासनाकडे केली होती. मात्र तीन कोटी आॅपरेटरच्या खात्यात जमा केले. ही रक्कम बँकांनी कर्जाच्या हप्त्यात वळती केली. यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन व डिझेल भरण्यासाठी पैसे नसल्याने रेड बसच्या तीन आॅपरेटरने शुक्रवारी अघोषित संप पुकारला. महापालिका प्रशासन व बस आॅपरेटर यांच्या वादात विद्यार्थी व प्रवाशांना हकनाक त्रास सहन करावा लागला. शहरालगतच्या भागातही प्रवाशांना बस स्थानकांवर दिवसभर ताटकळत बसावे लागले. दुपारी ४.३० नंतर काही बसेस सुरू झाल्या.आॅपरेटरने संप मागे घ्यावा यासाठी पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. मात्र किमान ९ कोटी मिळाल्याशिवाय बसेस सोडणार नाही. अशी भूमिका आॅपरेटरने घेतली. गुरुवारी तीन कोटी व शुक्रवारी ४.५० कोटी असे एकूण ७.५० कोटी दिल्यानंतर सायंकाळी ४.३० च्या सुमारास बसेस डेपोतून सोडण्यात आल्या. मात्र दुपारी २ वाजता कामावर आलेले चालक-वाहक संपामुळे घरी परतले होते. त्यामुळे त्यांना पुन्हा कामावर बोलवण्यात आल्याने सायंकाळपर्यंत बससेवा पूर्णपणे सुरळीत सुरू झालेली नव्हती. आॅपरेटला दर महिन्याला महापालिकेकडून घेणे असलेली रक्कम वेळेवर मिळत नाही. एप्रिल महिन्यापासून त्यांना बिल मिळालेले नव्हते. वारंवार मागणी करूनही बिल मिळत नसल्याने आॅपरेटरने संपावर जाण्याचा निर्णय घेतला. शहर बस रस्त्यांवर धावणार नसल्याची विद्यार्थी व नोकरदार यांना कल्पना नव्हती. नेहमीप्रमाणे सकाळी विद्यार्थी शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी निघाले परंतु बस बंद असल्याने त्यांना जाता आले नाही. बसबधून प्रवास करणारे कर्मचारी सकाळी कार्यालयात जाण्यासाठी निघाले. परंतु बसेस बंद असल्याने त्यांना आॅटो वा खासगी वाहनांनी जावे लागल्याने अनेकांना वेळेवर कार्यालयात पोहचता आले नाही.

तब्बल ३४ तास बस सेवा ठप्पगुरुवारी सकल मराठा समाजाने आरक्षणाच्या मुद्यावरून बंदची हाक दिली होती. हे निमित्त साधून आॅपरेटरने बसेस सोडल्या नाही. वास्तविक दुपारनंतर रहदारी पूर्ववत झाली होती. शहर बस सोडता आल्या असत्या परंतु थकीत रक्कम मिळावी यासाठी आॅपरेटरने बसेस सोडल्या नाही. म्हणजे शहरात तब्बल ३४ तास बस सेवा ठप्प होती. शुक्रवारी दुपारनंतरही पूर्ण बसेस रस्त्यांवर नव्हत्या.

कर्मचाऱ्यांप्रमाणे आॅपरेटवर मेस्मा का नाहीअत्यावश्यक सेवा असल्याने परिवहन विभागातील कर्मऱ्यांनी संप पुकारला तर त्यांच्यावर मेस्मा लावला जातो. २० फेब्रुवारी २०१४ रोजी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. परंतु १२ तासात कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्यात आला. कर्मचाऱ्यांप्रमाणे आॅपेरटरला मेस्मा का लावला जात नाही, असा प्रश्न भारतीय कामगार सेनेचे अंबादास शेंडे व भाऊ राव रेवतकर यांनी केला आहे.

एक दिवसाचे उत्पन्न बुडालेथकीत रक्कम न मिळाल्यास आॅपरेटर बसेस सोडणार नाही याची जाणीव प्रशासनाला होती. त्यानंतरही यावर तोडगा काढण्यासाठी तातडीने हालचाली करण्याची गरज होती. मात्र प्रशासनाने हा मुद्दा गांभीर्याने न घेतल्याने वेळीच तोडगा निघाला नाही. संपामुळे विद्यार्थी व प्रवाशांना हकनाक मनस्ताप सहन करवा लागला. आॅटोसाठी जादा पैसे मोजून प्रवास करावा लागला. तसेच संपामुळे महापालिकेचेही एका दिवसाचे तिकिटाचे उत्पन्न बुडाले. याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक