शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
2
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
3
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
4
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
5
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
6
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
7
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
8
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
9
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
10
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
11
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
12
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
13
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
14
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
15
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
16
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
17
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
18
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
19
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
20
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक

राजकीय कृतज्ञतेपोटी माय मराठीकडे कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:21 IST

प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शासनाचे कान टोचणे, हे साहित्यिकांचे काम आहे. मराठीबाबत साहित्य महामंडळाची ही ...

प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शासनाचे कान टोचणे, हे साहित्यिकांचे काम आहे. मराठीबाबत साहित्य महामंडळाची ही जबाबदारी आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून केवळ राजकीय कृतज्ञतेपोटी मराठी ध्येयधोरणांचा बळी देण्याचा प्रयत्न अ.भा. मराठी साहित्य महामंडळाकडून सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.

कोरोनाच्या दीर्घकाळानंतर ४ जानेवारी रोजी महामंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत स्थळ निवड समितीची स्थापना झाली. त्यात दिल्लीचा पत्ता कट करून ९४व्या अ.भा. मराठी संमेलनासाठी केवळ नाशिकलाच पसंती देण्याची चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षाप्रीत्यर्थ कुसुमाग्रजांना आदरांजली वाहण्याचा हा विचार असू शकतो. संस्थात्मकदृष्ट्या भावनेपेक्षा धोरणांना जास्त महत्त्व असते. मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्रात कधीही घेता येईल. परभाषिक मुलखात, तेही दिल्लीत क्वचितच संधी असेल. मिळालेली ती संधी केवळ राजकीय कृतज्ञतेपोटी दवडली जात असल्याचे स्पष्ट होत आहे. हीरक महोत्सवी वर्षानिमित्त मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे, मराठी विद्यापीठ स्थापन होणे आदी प्रलंबित मागण्यांना केंद्र दरबारी बळ देण्याची ही संधी महत्त्वाची मानली जात होती. नागपुरात महामंडळाचे कार्यालय असताना मराठीच्या विकासासाठी राजकीय वर्चस्व डावलण्याचे सर्वतोपरी प्रयत्न झाले आणि धोरणात्मक निर्णयांना प्राधान्य देण्यात आले. मात्र, महामंडळाचे कार्यालय औरंगाबादकडे हस्तांतरित होताच, ध्येयधोरणांना केराची टोपली दाखवण्यात आल्याचे वेळोवेळी दिसून येते.

महाराष्ट्राबाहेर झालेली संमेलने

आतापर्यंत अ.भा. मराठी साहित्य संमेलने १७ वेळा महाराष्ट्राबाहेर झाली आहेत. त्यात बडोदे : अहमदाबाद - गुजरात, इंदूर : ग्वाल्हेर : भोपाळ - मध्यप्रदेश, रायपूर - छत्तीसगड, हैदराबाद - आंध्रप्रदेश (तेलंगणा), पणजी - गोवा, घुमान - पंजाब आणि दिल्ली या स्थळांचा समोवश आहे. अहमदाबाद, पणजी, रायपूर, घुमान आणि दिल्ली वगळता इतर ठिकाणी एकापेक्षा जास्तवेळा ही संमेलने झाली आहेत.

संमेलनाची दिल्ली मोहीम गरजेची

१९५४ साली दिल्ली येथे ३७वे साहित्य संमेलन झाले होते. तेव्हा संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आले नव्हते. त्यामुळे, केंद्रापुढे महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त मराठी भाषेबाबत अनेक मागण्यांना प्रत्यक्ष बळ देण्याची आणि महाराष्ट्र संघटित असल्याचे दाखविण्याची संधी होती. मात्र, राजकीय इच्छेपुढे महामंडळ हतबल असल्याचे स्पष्ट होत आहे.

हवे तर भुजबळ, टकले यांनीच नेतृत्व स्वीकारावे

पवार साहेब गर्जा महाराष्ट्रच्या भीमथडीचे नेतृत्व करतात. साहित्य, कला आधारवडीच्या बाबतील यशवंतरावांनंतर पवार साहेबांचेच नाव पुढे येते. विरोधकही त्यांना मानतात. पंतप्रधान मोदी यांनाही त्यांच्याबाबत सन्मान आहे. संमेलनाच्या निमित्ताने दिल्लीत महाराष्ट्र संघटित आहे, हे सिद्ध करता येणार आहे आणि मराठी बतचे अनेक प्रश्न थेट सोडवता येणार आहेत. हवे तर महाराष्ट्र सरकारने आम्हाला अनुदानाचा पैसा देऊ नये. छगन भुजबळ आणि हेमंत टकले यांनी संमेलनाचे नेतृत्व करावे आणि पवार साहेबांना स्वागताध्यक्ष. मात्र, ९४वे संमेलन दिल्लीत व्हावे, अशी आमची इच्छा आहे.

- संजय नाहर, संस्थापक - सरहद