शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

सांप्रदायिक शक्तीचा मूक निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2016 02:55 IST

राज्यघटनेने निर्माण केलेल्या समता, बंधूता व एकतेच्या वातावरणात विष मिसळविण्याचा प्रयत्न करीत असलेल्या ....

गांधीवादी कार्यकर्ते एकत्र : संविधान चौकात केले आंदोलननागपूर : राज्यघटनेने निर्माण केलेल्या समता, बंधूता व एकतेच्या वातावरणात विष मिसळविण्याचा प्रयत्न करीत असलेल्या सांप्रदायिक व हुकूमशाही शक्तीचा निषेध करण्यासाठी गांधीवादी कार्यकर्त्यांनी सोमवारी संविधान चौकात मूक धरणे आंदोलन केले. आंदोलनात सुमारे १०० कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यात माजी खासदार विलास मुत्तेमवार, लीलाताई चितळे, हरिभाऊ केदार, उमेशबाबू चौबे, केशवराव शेंडे, डॉ. चित्रा सूर, डॉ. रतिनाथ मिश्रा, जम्मू आनंद, मा.म. गडकरी, यादवराव देवगडे, दत्तात्रय बर्गी, धनंजय धार्मिक, रवी गुडधे, आत्माराम उखळकर, बाबूराव झाडे, डॉ. प्रकाश तोवर, डॉ. सुनिती देव, अ‍ॅड. रेखा बारहाते, धर्मेंद्र राजपूत, अमिताभ पावडे, सत्यनारायण शर्मा, अनंतराव अहमदाबादकर आदींचा समावेश होता. आंदोलनकर्त्यांनी सुमारे दोन तास काहीही न बोलता शांततेच्या मार्गाने सांप्रदायिक व हुकूमशाही शक्तीचा निषेध केला. वैष्णव जन तो... या भजनाने आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलन पूर्वनियोजित असल्यामुळे संविधान चौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या आंदोलनाला स्वातंत्र्यसंग्राम सैनिक, महात्मा गांधी विचार मंच, जागृत नागरिक मंच यासह अन्य गांधीवादी संस्था व संघटनांचा पाठिंबा होता. संविधान चौकात पत्रके वाटून आंदोलनामागची भूमिका स्पष्ट करण्यात आली.स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देश कसा राहावा यासाठी तत्कालीन नेत्यांनी राष्ट्रीयस्तरावर चिंतन केले. त्यातून राज्यघटना अस्तित्वात आली. त्याद्वारे देशात सामाजिक न्याय, समता, बंधूता व एकता ही मूल्ये रुजली. धार्मिक, जातीय व प्रादेशिक विविधता असूनही देश संघटित राहिला. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून देशाची अखंडता भंग होण्याच्या मार्गावर आहे. समाजात विद्वेषाचे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विकासाच्या नावावर सत्ता मिळविणारे राजकारणी धर्मांध शक्तीला पाठिंबा देत आहे. या विध्वंसक परिस्थितीमुळे देशातील नागरिक व्यथित झाले आहेत. परिणामी हे मूक आंदोलन करण्यात आले.(प्रतिनिधी)