शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

भाच्यावरील हल्ल्याचा जाब विचारायला गेलेल्या मामाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - भाच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना जाब विचारला म्हणून त्यांनी मामाची हत्या केली. सोमवारी रात्री ९.३० ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - भाच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना जाब विचारला म्हणून त्यांनी मामाची हत्या केली. सोमवारी रात्री ९.३० च्या सुमारास यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धम्मदीपनगरात ही थरारक घटना घडली. अतुल रामकृष्ण धकाते (वय ३२) असे मृताचे नाव आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, अतुलचा भाचा पीयूषसोबत १८ जुलैला आरोपी तुषार वर्मा, मनीष शाहूसोबत पैशाच्या व्यवहारातून वाद झाला. यावेळी आरोपीच्या हल्ल्यात पीयुष जखमी झाला. त्याला दवाखान्यात दाखल केल्यानंतर अतुल धकातेने आरोपी तुषार आणि मनीषला मारहाणीचे कारण विचारले. आरोपींनी तुषारसोबतही वाद घालून त्याचा मोबाईल फोडला. त्यानंतर अतुल घराकडे आला तर आरोपी त्यांच्या मित्राकडे गेले. त्यांनी घातक शस्त्रे सोबत घेऊन अतुलच्या घराकडे धाव घेतली. तो बाहेरच उभा होता. आरोपी तुषार, मनीष आणि त्यांच्या साथीदारांनी अतुलवर घातक हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. गंभीर अवस्थेत अतुलला रुग्णालयात नेले असता मंगळवारी उपचारादरम्यान अतुलचा मृत्यू झाला. यामुळे परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले.

----

पाच आरोपी गजाआड

त्यामुळे यशोधरानगर पोलिसांनी मंगेश रामकृष्ण धकाते (वय ३५) यांची तक्रार नोंदवून घेत आरोपी

तुषार धनराज वर्मा (वय १९, रा. कळमना), सुनील शिवलाल सारंगपुरे (वय २०, रा. कळमना), मनीष ऊर्फ डब्ल्यू कमल शाहू (वय १९), अंकितकुमार नेमीचंद्र इवनाते (वय १९) आणि भोलेश्वर ऊर्फ पप्पू श्याम निर्मलकर (वय २१, रा. धम्मदीपनगर) यांना अटक केली.

--