शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

महापालिका शंभर कोटींचे कर्ज घेणार

By admin | Updated: November 10, 2015 03:34 IST

एलबीटी रद्द करण्यात आल्याने महापालिका आर्थिक संकटात आहे. विकास प्रकल्पासाठी निधी उभारताना प्रशासनाची दमछाक होत आहे.

स्थायी समितीची मंजुरी : सभागृहाच्या मंजुरीनंतर शासनाला प्रस्ताव पाठविणारनागपूर : एलबीटी रद्द करण्यात आल्याने महापालिका आर्थिक संकटात आहे. विकास प्रकल्पासाठी निधी उभारताना प्रशासनाची दमछाक होत आहे. महापालिकेच्या डोक्यावर २७५ कोटीचे कर्ज शिल्लक असताना पुन्हा पेंच टप्पा -४ प्रकल्पासाठी १०० कोटीचे कर्ज घेणार आहे. स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. सभागृहाच्या मान्यतेनंतर मंजुरीसाठी हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला जाणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी सोमवारी दिली. महापालिकेने मार्च २०१० मध्ये २०० कोटी तर मार्च २०१४ मध्ये २०० कोटी अस ४०० कोटीचे कर्ज घेतले आहे. पैकी १२५ कोटीची परतफेड केली असून २७५ कोटीचे कर्ज शिल्लक आहे. परंतु महापालिकेला वार्षिक उत्पन्नाइतके कर्ज घेता येते. त्यामुळे ११०० कोटीपर्यंत कर्ज घेता येते. १०० कोटीच्या कर्ज घेण्याच्या प्रस्तावाला शासनाची मंजुरी मिळताच कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. पेंच टप्पा-४ हा खासगी सहभागातून राबविला जात आहे. या प्रकल्पांतर्गत गोधनी येथील जलशुद्धीकरण केंद्रासाठी ५० कोटी, हुडकेश्वर-नरसाळा येथील वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी १२ कोटी, पेंच टप्प्पा -४च्या कामाचे २७ कोटीचे दायित्व, सांडपाणी प्रक्रिया व पुनर्वापर प्रकल्पाचे दायित्व म्हणून देणे असलेले ११ कोटी आदींचा यात समावेश आहे. सध्या प्रकल्पावर कंत्राटदाराने केलेल्या खर्चावर त्याला १३.२५ टक्के दराने व्याज स्वरूपात परतावा द्यावा लागत आहे. कमी व्याजदराने घेतलेल्या कर्जाच्या माध्यमातून एकमुस्त परतफेड करण्याचा प्रशासनाचा विचार आहे.हा प्रकल्प ४८.९४ कोटीचा होता. परंतु प्रकल्पाला विलंब झाल्याने खर्च ६१ कोटी ९६ लाखावर गेला आहे. महापालिकेचे उत्पन्नाचे स्रोत व खर्च विचारात घेता या प्रकल्पासाठी कर्ज उभारण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार स्थायी समितीकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. (प्रतिनिधी)