शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील रस्ते दुरुस्तीची जबाबदारी मनपाचीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:13 IST

नागरिकांनी आणखी किती त्रास सोसायचा : दुुरुस्तीसाठी पावसाळा संपण्याची प्रतीक्षा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील रस्ते महापालिका, सार्वजनिक ...

नागरिकांनी आणखी किती त्रास सोसायचा : दुुरुस्तीसाठी पावसाळा संपण्याची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरातील रस्ते महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व नासुप्रच्या मालकीचे आहेत. परंतु नागरिकांकडून टॅक्स वसूल करीत असल्याने शहरातील रस्ते दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेचीच आहे.

नागपूर शहरात जवळपास ३,६०० किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. यातील १,४६० किलोमीटर लांबीचे रस्ते मनपाचे आहेत. त्यामुळे शहरातील रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीची जबाबदारी आमची नसल्याची भूमिका मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली आहे. मात्र शहरातील नागरिकांकडून टॅक्स वसूल करून महापालिकेची तिजोरी भरली जाते. त्यामुळे नागरिकांना सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी मनपाचीच आहे. अन्य कोणत्याही विभागाकडून टॅक्स वसूल केला जात नाही. दुर्दैवाने पावसाळा संपेपर्यंत शहरातील रस्त्याची दुरुस्ती होणार नाही तोपर्यंत शहरातील नागरिकांना खड्ड्यांचा त्रास असाच सोसावा लागणार आहे.

मागील तीन वर्षात डांबरी रस्त्याची कामे ठप्पच आहे. त्यात दरवर्षी ४० टक्के खड्ड्यांचे प्रमाण वाढल्याने रस्त्याची चाळण झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांवरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्तापक्षासोबतच विरोधकांनी प्रशासनाला धारेवर धरले. अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार निधी उपलब्ध करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. मात्र पावसाळ्याच्या दिवसात हॉटमिक्स प्लांट बंद असल्याने व इन्फ्रा पॅचरच्या साह्याने शहरातील खड्डे बुजविणे शक्य नसल्याने आदेशाला महत्त्व नाही.

...

अपघातांना जबाबदार कोण?

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अपघातामुळे अनेक जण जखमी होत आहेत. काहींना आपला जीव गमवावा लागला. याचा जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

...

अर्थसंकल्पातील निधी जातो कुठे?

नवीन रस्ते व दुरुस्तीसाठी मनपाच्या अर्थसंकल्पात १५० कोटींच्या आसपास तरतूद असते. परंतु दोन वर्षात कामे ठप्प आहेत. रस्त्याची डागडुजी झालेली नाही. शहरातील सर्वच रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. तरतूद असलेला निधी जातो कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

...

सत्ताधाऱ्यांच्या अडचणी वाढल्या

मागील १५ वर्षांपासून महापालिकेत भाजपची सत्ता आहे. विकासाचा दावा केला जात असला तरी मागील तीन वर्षात डांबरी रस्त्याची कामे झालेली नाही. खड्ड्यांमुळे नागरिकात प्रचंड रोष आहे. त्यात निवडणुकीला सामोरे जावयाचे असल्याने सत्तापक्षातील नगरसेवकांच्या अडचणी वाढल्या आहेत.