शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

घर पडल्यास मनपा जबाबदार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 01:04 IST

कराच्या स्वरुपात नागरिकांच्या खिशातून कोट्यवधी रुपये वसूल करण्याचे काम मनपा करीत आहे. त्यानंतरही मनपाला नागरिकांच्या जीवाची पर्वा नाही. जीर्ण घरांच्या प्रकरणांमध्ये मनपाने कायद्याचा हवाला देत घर मालकाला घराचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास बाध्य केले आहे.

ठळक मुद्दे नोटीस जारी करून जबाबदारी झटकली : घरमालकाने करावे स्ट्रक्चरल ऑडिट

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कराच्या स्वरुपात नागरिकांच्या खिशातून कोट्यवधी रुपये वसूल करण्याचे काम मनपा करीत आहे. त्यानंतरही मनपाला नागरिकांच्या जीवाची पर्वा नाही. जीर्ण घरांच्या प्रकरणांमध्ये मनपाने कायद्याचा हवाला देत घर मालकाला घराचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास बाध्य केले आहे.संबंधित जीर्ण इमारतीच्या आसपास राहणारे नागरिक आणि त्या परिसरातून जाणाऱ्या नागरिकांचा जीव गेल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, घर जीर्ण झाल्याची माहिती झाल्यानंतरही कारवाई होत नसेल तर त्याकरिता जबाबदार कोण, असे गंभीर प्रश्न यानिमित्ताने उभे राहिले आहे. जीर्ण आणि जुन्या इमारतींना पाडण्याचे काम मनपाचे अतिक्रमणविरोधी पथक करीत असल्याचे मनपाने जारी केलेल्या बयाणात म्हटले आहे. त्यानंतरही घरमालकाला स्वत:च्या इमारतींचे वेळोवळी सुरक्षा आॅडिट करणे आवश्यक आहे. इमारतीची सुरक्षा ठेवण्याची जबाबदारी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमच्या कलम-२६५ अंतर्गत प्रत्येक घरमालकाची आहे. त्या अंतर्गत विशेतज्ज्ञ स्ट्रक्चरल इंजिनिअरकडून तपासणी करणे अनिवार्य आहे.कोणत्याही इमारतीचा हिस्सा जीर्ण असल्याची माहिती मनपाच्या झोन कार्यालयाला देण्याचे मनपाने म्हटले आहे. मनपा संबंधित प्रकरणी घर मालकाला नोटीस देईल. त्यानंतर त्या घरी कुणी राहात असेल आणि घर पडण्याच्या घटनेत कुणी सापडत असेल तर त्याकरिता मनपा जबाबदार नाही. जीर्ण इमारतींचे निरीक्षण करून मनपाचे अधिकारी काही सूचना करतील. घराच्या जीर्ण भागाच्या दुरुस्तीसाठी मनपाची परवानगी घ्यावी लागेल. त्यानंतर सुधारणा करता येईल.पाऊस सुरू असल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका होऊ शकतो. जन आणि धन हानी टाळण्यासाठी मदत करावी, असे मनपाने म्हटने आहे, पण जीर्ण घर पडल्यामुळे कुणी व्यक्ती जखमी वा मृत होत असेल तर मनपाची जबाबदारी काय राहील आणि दोषी घरमालकावर काय कारवाई करण्यात येईल, हे मनपाने जारी केलेल्या बयाणात सांगितलेले नाही.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका