शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

मनपाचे बजेट सादर झाले, पण अंमलबजावणी नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 22:16 IST

तीन महिन्यानंतर विधानसभा निवडणुका होणार आहे. त्यामुळे स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी बजेट सादर करून तत्काळ अंमलबजावणी करण्याचा दावा केला होता. परंतु त्यांचा दावा फोल ठरताना दिसतो आहे.

ठळक मुद्देआयुक्तांच्या स्वाक्षरीची प्रतीक्षा : स्थायी समितीच्या कक्षात शांतता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तीन महिन्यानंतर विधानसभा निवडणुका होणार आहे. त्यामुळे स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी बजेट सादर करून तत्काळ अंमलबजावणी करण्याचा दावा केला होता. परंतु त्यांचा दावा फोल ठरताना दिसतो आहे. २६ जून रोजी पोहाणे यांनी ३१९७.६० कोटी रुपयांचे बजेट सादर केले होते. दोन दिवस चर्चा झाल्यानंतर २८ जून रोजी सभागृहाने बजेटला मंजुरी प्रदान केली. मात्र १२ दिवसानंतरही मनपा आयुक्तांची बजेटवर स्वाक्षरी झाली नाही. त्यामुळे बजेटच्या अंमलबजावणीचे परिपत्रक काढण्यात आले नाही. परिणामी काम करण्यास स्थायी समिती हतबल ठरत आहे.विशेष म्हणजे ५ जुलैपासून मनपा आयुक्त अभिजित बांगर हे सुटीवर गेले आहे. त्यांचा प्रभार अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे यांना नगरविकास विभागाने सोपविला आहे. बांगर हे ८ जुलै ते २ ऑगस्टदरम्यान मसुरी येथे प्रशिक्षणासाठी गेले आहे. आयुक्तांना सामान्य प्रशासन विभागाने २१ जून रोजी प्रशिक्षणासंदर्भात अवगत केले होते. त्यांच्या जवळ बजेट वर हस्ताक्षर करून अंमलबजावणीचे पत्रक काढण्यासाठी पर्याप्त वेळ होता परंतु त्यांनी तसे केले नाही. आता प्रभार ठाकरे यांच्याकडे आहे. ते सुद्धा यासंदर्भात कुठलेही पाऊल उचलत नसल्याने बजेटला मंजुरी मिळवूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही.ऑगस्टच्या शेवटी व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागत आहे. त्यामुळे वेळ कमी आहे. बजेटवर आयुक्तांच्या हस्ताक्षराशिवाय स्थायी समिती अध्यक्ष कुठलेही काम करू शकत नाही. स्थायी समितीबरोबरच सत्तापक्षाचे नगरसेवक सुद्धा शांत बसले आहेत. शहरात मनपाच्या निधीतून कुठल्याही प्रकारचे विकास कार्य गेल्या चार महिन्यापासून सुरू झाले नाही. कामासाठी स्थायी समितीजवळ केवळ दोन महिने शिल्लक आहे. आयुक्तांच्या स्वाक्षरीसाठी बजेट अडल्यामुळे बजेटदरम्यान केलेल्या घोषणा ३० टक्केही पूर्ण होऊ शकत नाही.सत्तापक्षाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्हआयुक्तांनी बजेटवर हस्ताक्षर करून परिपत्रक जाहीर न केल्याने सत्तापक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. मनपा आयुक्त १२ दिवसापासून बजेटवर हस्ताक्षर करीत नाही, तरीही त्यांच्या भूमिकेला सत्तापक्ष विरोध करीत नाही, यावरही काही नगरसेवक प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहे. बजेटच्या अंमलबजावणीत जेवढा उशीर होईल, तेवढेच शहराला नुकसान सहन करावे लागणार आहे.गेल्या वर्षीसुद्धा आयुक्तांनी अडविले होते बजेटगेल्यावर्षी तत्कालीन आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी जवळपास एक महिना बजेटवर स्वाक्षरी केली नव्हती. जेव्हा स्वाक्षरी केली तेव्हा त्यांनी सुरुवातीलाच काही विभागांच्या कामावर बंदी आणली होती. त्यामुळे स्थायी समिती व आयुक्तांमध्ये तू तू मै मै सुद्धा झाली होती. सप्टेंबरमध्ये वीरेंद्र सिंह सुटीवर गेले होते. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये बजेटची अंमलबजावणी झाली होती.बजेटचे टार्गेट पूर्ण करणे मोठे आव्हानप्रदीप पोहणे यांनी २०१९-२० चा ३१९७.६० कोटी रुपयांचे प्रस्तावित बजेट सादर केले. गेल्यावर्षी वीरेंद्र कुकरेजा यांनी २९४६ कोटी रुपयांचे बजेट सादर केले होते. या बजेटमधून केवळ २०१७.७५ कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. त्यामुळे बजेट आणि उत्पन्नात मोठा फरक होता. यावर्षी बजेटचे आकडे पोहाणे यांनी वाढविले आहे. परंतु उत्पन्नासाठी नवीन स्रोत नसल्याने अनुदानाच्या भरवशावर मनपाचे कामकाज चालविण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBudgetअर्थसंकल्प