शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मनपाचे बजेट सादर झाले, पण अंमलबजावणी नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 22:16 IST

तीन महिन्यानंतर विधानसभा निवडणुका होणार आहे. त्यामुळे स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी बजेट सादर करून तत्काळ अंमलबजावणी करण्याचा दावा केला होता. परंतु त्यांचा दावा फोल ठरताना दिसतो आहे.

ठळक मुद्देआयुक्तांच्या स्वाक्षरीची प्रतीक्षा : स्थायी समितीच्या कक्षात शांतता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तीन महिन्यानंतर विधानसभा निवडणुका होणार आहे. त्यामुळे स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी बजेट सादर करून तत्काळ अंमलबजावणी करण्याचा दावा केला होता. परंतु त्यांचा दावा फोल ठरताना दिसतो आहे. २६ जून रोजी पोहाणे यांनी ३१९७.६० कोटी रुपयांचे बजेट सादर केले होते. दोन दिवस चर्चा झाल्यानंतर २८ जून रोजी सभागृहाने बजेटला मंजुरी प्रदान केली. मात्र १२ दिवसानंतरही मनपा आयुक्तांची बजेटवर स्वाक्षरी झाली नाही. त्यामुळे बजेटच्या अंमलबजावणीचे परिपत्रक काढण्यात आले नाही. परिणामी काम करण्यास स्थायी समिती हतबल ठरत आहे.विशेष म्हणजे ५ जुलैपासून मनपा आयुक्त अभिजित बांगर हे सुटीवर गेले आहे. त्यांचा प्रभार अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे यांना नगरविकास विभागाने सोपविला आहे. बांगर हे ८ जुलै ते २ ऑगस्टदरम्यान मसुरी येथे प्रशिक्षणासाठी गेले आहे. आयुक्तांना सामान्य प्रशासन विभागाने २१ जून रोजी प्रशिक्षणासंदर्भात अवगत केले होते. त्यांच्या जवळ बजेट वर हस्ताक्षर करून अंमलबजावणीचे पत्रक काढण्यासाठी पर्याप्त वेळ होता परंतु त्यांनी तसे केले नाही. आता प्रभार ठाकरे यांच्याकडे आहे. ते सुद्धा यासंदर्भात कुठलेही पाऊल उचलत नसल्याने बजेटला मंजुरी मिळवूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही.ऑगस्टच्या शेवटी व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागत आहे. त्यामुळे वेळ कमी आहे. बजेटवर आयुक्तांच्या हस्ताक्षराशिवाय स्थायी समिती अध्यक्ष कुठलेही काम करू शकत नाही. स्थायी समितीबरोबरच सत्तापक्षाचे नगरसेवक सुद्धा शांत बसले आहेत. शहरात मनपाच्या निधीतून कुठल्याही प्रकारचे विकास कार्य गेल्या चार महिन्यापासून सुरू झाले नाही. कामासाठी स्थायी समितीजवळ केवळ दोन महिने शिल्लक आहे. आयुक्तांच्या स्वाक्षरीसाठी बजेट अडल्यामुळे बजेटदरम्यान केलेल्या घोषणा ३० टक्केही पूर्ण होऊ शकत नाही.सत्तापक्षाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्हआयुक्तांनी बजेटवर हस्ताक्षर करून परिपत्रक जाहीर न केल्याने सत्तापक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. मनपा आयुक्त १२ दिवसापासून बजेटवर हस्ताक्षर करीत नाही, तरीही त्यांच्या भूमिकेला सत्तापक्ष विरोध करीत नाही, यावरही काही नगरसेवक प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहे. बजेटच्या अंमलबजावणीत जेवढा उशीर होईल, तेवढेच शहराला नुकसान सहन करावे लागणार आहे.गेल्या वर्षीसुद्धा आयुक्तांनी अडविले होते बजेटगेल्यावर्षी तत्कालीन आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी जवळपास एक महिना बजेटवर स्वाक्षरी केली नव्हती. जेव्हा स्वाक्षरी केली तेव्हा त्यांनी सुरुवातीलाच काही विभागांच्या कामावर बंदी आणली होती. त्यामुळे स्थायी समिती व आयुक्तांमध्ये तू तू मै मै सुद्धा झाली होती. सप्टेंबरमध्ये वीरेंद्र सिंह सुटीवर गेले होते. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये बजेटची अंमलबजावणी झाली होती.बजेटचे टार्गेट पूर्ण करणे मोठे आव्हानप्रदीप पोहणे यांनी २०१९-२० चा ३१९७.६० कोटी रुपयांचे प्रस्तावित बजेट सादर केले. गेल्यावर्षी वीरेंद्र कुकरेजा यांनी २९४६ कोटी रुपयांचे बजेट सादर केले होते. या बजेटमधून केवळ २०१७.७५ कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. त्यामुळे बजेट आणि उत्पन्नात मोठा फरक होता. यावर्षी बजेटचे आकडे पोहाणे यांनी वाढविले आहे. परंतु उत्पन्नासाठी नवीन स्रोत नसल्याने अनुदानाच्या भरवशावर मनपाचे कामकाज चालविण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBudgetअर्थसंकल्प