शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
4
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
5
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
6
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
7
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
8
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
9
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
10
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
11
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द
12
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
13
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
14
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
15
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
16
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
17
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
18
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
19
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
20
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन

मुंढे इम्पॅक्ट :  रस्ते झाले मोकळे ; प्रशासनाला लागली शिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 00:13 IST

तुकाराम मुंढे यांनी २८ जानेवारीला महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली. त्यांनी ६२ बाजारातील चार हजारांहून अधिक भाजी विक्रेते व फेरीवाल्यांवर कारवाई करीत शहरातील रस्ते मोकळे केले. यामुळे रहदारी सुरळीत झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देकामचुकार अधिकारी व निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांना दणका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिस्तप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ तुकाराम मुंढे यांनी २८ जानेवारीला महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली. पहिल्या दिवसापासून कामाला सुरुवात केली. लेखा विभागातील चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सिमेंट रोड कंत्राटदारांना आणि मनपाच्या अभियंत्यालाही कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यानंतर फूटपाथ व रस्त्यांवरील फेरीवाला हटाव मोहीम हाती घेतली. ६२ बाजारातील चार हजारांहून अधिक भाजी विक्रेते व फेरीवाल्यांवर कारवाई करीत शहरातील रस्ते मोकळे केले. यामुळे रहदारी सुरळीत झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.महापालिकेची शहरात १२६ उद्याने आहेत. यातील १३ उद्यानांची देखभाल व दुरुस्ती महापालिकेकडे आहे. तर ११३ उद्यानांची जबाबदारी खासगी कंत्राटदारांकडे आहे. परंतु अनेक उद्यानांची अवस्था बिकट आहे. उद्यानांची स्वच्छता व देखभाल व्यवस्थित होत नसल्यास संबंधित कंत्राटदार व अधिकाºयांना जबाबदार धरले जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.जनता दरबारामुळे नागरिकांना दिलासाअतिक्रमण, रस्ते, पाणीपुरवठा, सिवरेज, मोकाट कुत्रे, घरटॅक्स अशा स्वरुपाच्या नागरिकांच्या तक्रारी तातडीने मार्गी लागाव्यात. यासाठी तुकाराम मुंढे यांच्या नियमित जनता दरबाराला सुरुवात केली. यात दररोज ९० ते १०० तक्रारी वा समस्या येत आहेत. तक्रारींची तात्काळ सुनावणी केली जात आहे. तक्रारीसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देत तातडीने दखल घेण्यास सांगितले जात आहे. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.बाजारातील अतिक्रमण हटविलेशहरात विविध भागात दररोज किंवा आठवडी बाजार भरतात. मात्र मनपाने निर्धारित केलेल्या परिसराव्यतिरिक्त रस्त्यावर भाजी विक्रेते व्यवसाय करतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. याशिवाय नागरिकांनाही अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. याची गांभीर्याने दखल घेत महापौर संदीप जोशी यांनी अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले होते. आयुक्तांनी पदभार स्वीकारताचा फेब्रुवारीपासून कारवाईला धडाक्यात सुरुवात झाली. शहारातील ६२ बाजारावर कारवाई करण्यात आली. अतिक्रमण हटविल्याने रस्ते मोकळे झाले. वाहतुकीचा अडथळा दूर झाला. रस्ते व फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची धडक कारवाई सुरू आहे.

कंत्राटदार व अधिकाऱ्यांना दणकापदभार स्वीकारताच तुकाराम मुंढेंनी पहिल्याच दिवशी नागपूर मनपाच्या लेखा विभागातील चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यानंतर दुसºया दिवशी सिमेंट रोड कंत्राटदारांना आणि मनपाच्या अभियंत्यालाही कारणे दाखवा नोटीस बजावली. एकस्तंभ चौक ते उत्तर अंबाझरी हा सिमेंट रस्ता जे.पी. इंटरप्रायजेस या कंपनीने तयार केला आहे. या रस्त्यांवरील आय ब्लॉक मानकाप्रमाणे नसल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे. क्युरिंग पिरियड पूर्ण होण्यापूर्वीच आय ब्लॉक लावण्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. निकृष्ट कामाबाबत आयुक्तांनी यांनी जे.पी. इंटरप्राईजेस क्वॉलिटी कंट्रोलचे काम पाहणारी क्रिएशन इंजिनिअर्स यांना नोटीस बजावण्याचे निर्देश दिले. गोकुळपेठ, बुधवाराला शिस्तगोकुळपेठ व कॉटन मार्के ट येथील बाजार जुने आहेत. परंतु भाजी विक्रेते रस्त्यावर येऊन दुकाने लावतात. यामुळे रहदारीला अडथळा होत होता. यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी होत्या. याची दखल घेत गोकुळपेठ व कॉटन मार्केटसह शहरातील आठवडी बाजारात अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करून शिस्त लावली. तसेच स्वच्छता राहावी यासाठी विक्रे त्यांना कचरापेटी ठेवणे बंधनकारक केले.कर वसुलीसासाठी कठोर भूमिकानागपूर शहरात ६ लाख १३ हजार मालमत्ता आहेत. यातील ३ लाख ३३ हजार ८७ मालमत्ताधारकांकडे ४५४ कोटींची थकबाकी आहे. मालमत्ता कर हा महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असल्याने तुकाराम मुंढे यांनी थकबाकीदारांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. थकीत कर भरा अन्यथा कारागृहात जाल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे