शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

मुंबईत भाजपा-सेनेची युती व्हावी - मा गो वैद्य

By admin | Updated: February 25, 2017 22:42 IST

जागांचा आकडा लक्षात घेता पहिली संधी शिवसेनेला मिळायला हवी, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते व जेष्ठ विचारक मा.गो.वैद्य यांनी व्यक्त केले आहे

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 25 - मुंबई महापालिकेत भाजपा व शिवसेनेची युती झाली पाहिजे. दोन्ही पक्षांनी मानापमान बाजुला सारुन एकत्र आले पाहिजे व अडीच-अडीच वर्षे महापौरपद वाटून घेतले पाहिजे. जागांचा आकडा लक्षात घेता पहिली संधी शिवसेनेला मिळायला हवी, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते व जेष्ठ विचारक मा.गो.वैद्य यांनी व्यक्त केले आहे. नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. 
 
मुंबईत भाजप-शिवसेनेची युती व्हावी असे मला वाटते. जर युतीची मुंबईत सत्ता आली तर राज्य शासनाला तेथे आणखी प्रभावीपणे काम करता येईल व त्यामुळे सरकारची लोकप्रियता वाढेल. काँग्रेस तसेच इतर विरोधी पक्षांना ही बाब सहन होणार नाही. भाजपा-सेना एकत्र येऊ नये साठी कॉंग्रेस प्रयत्न करत आहे. मुंबईत महापौर पदासाठी पाठिंबा देण्याकरता काँग्रेस राज्य सरकारमधून बाहेर पाडण्याची सेनेला मागणी करू शकते. जर शिवसेनेने कॉंग्रेसची मदत घेतली, तर शासन पडू शकते व मध्यावधी निवडणूकांना सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, असे वैद्य म्हणाले. शिवसेनेने विचार करुन निर्णय घ्यावा, असेदेखील ते म्हणाले. 
 
संघ मध्यस्थी करणार नाही 
या वादात संघाची भुमिका काय राहते, याकडे राजकीय तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे. मात्र मा.गो.वैद्य यांनी संघाची येथे भुमिकाच राहणार नसल्याचे स्पष्ट केले. संघ या वादात कुठलीही मध्यस्थी करणार नाही. संघाची ती कार्यप्रणाली नाही. जो काही निर्णय घ्यायचा आहे ते भाजपाचे नेते घेतील, असे वैद्य यांनी सांगितले.