शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

मुंबई, पुणे, हैदराबाद ‘नो वेटिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:08 IST

नागपूर : कोरोनामुळे अनेक प्रवासी प्रवासाचा बेत रद्द करीत आहेत. त्यामुळे रेल्वेगाड्यात बर्थ सहज उपलब्ध होत आहेत. कोरोनाची लाट ...

नागपूर : कोरोनामुळे अनेक प्रवासी प्रवासाचा बेत रद्द करीत आहेत. त्यामुळे रेल्वेगाड्यात बर्थ सहज उपलब्ध होत आहेत. कोरोनाची लाट संपेपर्यंत हीच परिस्थिती राहणार आहे. मुंबई, पुणे आणि हैदराबादला जाणाऱ्या रेल्वेगाड्यात वर्षभर वेटिंगची स्थिती असते. परंतु कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे अनेक प्रवासी प्रवास करणे टाळत आहेत. त्यामुळे मुंबई, पुणे आणि हैदराबादला जाणाऱ्या रेल्वेगाड्यात सहज बर्थ उपलब्ध होत आहेत. परंतु गोरखपूर, दानापूर, पाटणा, हावडा या मार्गावरील रेल्वेगाड्यात प्रवाशांची गर्दी असल्यामुळे या गाड्यात वेटिंगची स्थिती आहे.

कोरोनामुळे नियमित रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या आहेत. परंतु रेल्वे बोर्डाने प्रवाशांच्या सुविधेसाठी विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतलेला आहे. कोरोनाच्या पूर्वी रेल्वेस्थानकावरून जवळपास १२५ रेल्वेगाड्या धावत होत्या. या गाड्यांमधून ३० हजार प्रवासी प्रवास करीत होते. परंतु सध्या नागपूर रेल्वेस्थानकावरून ८० रेल्वेगाड्या धावत आहेत. या रेल्वेगाड्यांमधून १२ हजार प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मे महिन्यातही बर्थ उपलब्ध

एप्रिल महिन्यात मुलांच्या परीक्षा आटोपतात. त्यामुळे अनेक पालक बाहेरगावी फिरायला जाण्याचा बेत आखतात. त्यासाठी तीन महिन्यापूर्वीच मे महिन्यातील रेल्वेगाड्या फुल्ल होत असतात. परंतु सगळीकडे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सध्यातरी अनेक पालकांनी रेल्वेचे आरक्षण केलेले नाही. त्यामुळे मे महिन्यात मुंबई, पुणे, दिल्ली, मद्रास येथील रेल्वेगाड्यात बर्थ उपलब्ध आहेत. कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर मे महिन्यातील आरक्षण फुल्ल होणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

प्रोटोकॉल पाहून प्रवासाचा निर्णय

कोरोनामुळे वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे नियम लागू करण्यात आले आहेत. प्रवाशांना काही राज्यात कोरोनाची टेस्ट करणे बंधनकारक आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रोटोकॉल पाहून प्रवासी प्रवासाचे नियोजन करीत आहेत.

-एस.जी. राव. जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, नागपूर विभाग

...............