शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
2
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
5
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
6
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
7
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
8
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
9
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
10
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
11
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
12
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
13
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
14
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
15
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
16
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
17
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
18
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
19
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
20
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी

मूल्यांकनासाठी मुंबईचे नागपूरला साकडे

By admin | Updated: July 5, 2017 01:44 IST

मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमांचे निकाल रखडले असून लाखो उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन प्रलंबित आहे.

निकाल लावण्यात नागपूर विद्यापीठाला मागितली मदत लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमांचे निकाल रखडले असून लाखो उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन प्रलंबित आहे. या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना मदत मागितली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नागपूर विद्यापीठाने परीक्षा प्रणालीत सुधारणा करत निकालांचा वेग प्रचंड प्रमाणात वाढविला आहे हे विशेष.मुंबई विद्यापीठाचे निकाल रखडल्यामुळे विद्यार्थ्यांची प्रचंड अडचण होत आहे. उत्तरपत्रिकांचे मूल्यांकनच झाले नसल्याची बाब समोर आली आहे. मुंबई विद्यापीठाप्रमाणे नागपूर विद्यापीठातदेखील ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकन करण्यात येते. नागपूर विद्यापीठाचा ‘पॅटर्न’ जाणून घेण्यासाठी राज्यातील काही विद्यापीठांनी परीक्षा विभागाला भेटी दिल्या होत्या व प्रक्रिया जाणून घेतली होती. नागपूर विद्यापीठाच्या बहुतांश परीक्षांचे निकाल (सुमारे १०००) ३० जूनअगोदर जाहीर झाले. नागपूर विद्यापीठाकडून निकालासंदर्भात काही मार्गदर्शन व मदत मिळू शकते का याची चाचपणी करण्यासाठी तेथील कुलगुरू डॉ. संजय देशमुख दोन आठवड्यांअगोदर नागपुरात आले होते. मात्र कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे व प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले हे दोघेही नसल्यामुळे चर्चा होऊ शकली नाही.मागील आठवड्यात मुंबई विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक व परीक्षा विभागातील अधिकारी नागपूर विद्यापीठात आले होते. त्यांनी वेगाने निकाल कसे लागतात हे जाणून घेतले व नागपूर विद्यापीठ काही मदत करु शकेल का, अशी विचारणा केली. मात्र मुंबईसारख्या नामांकित विद्यापीठाने इतर विद्यापीठांकडून मूल्यांकन करवून घेणे योग्य वाटणार नाही. त्यापेक्षा ‘आॅ़नस्क्रीन’ला बाजूला सारुन थेट उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन सुरू करून द्या, असा सल्ला देण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत प्रतिक्रियेसाठी कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.