शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मुक्तिबोधांच्या कादंबरी विश्वातील नायक साम्यवादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राजकीय स्वातंत्र्य मिळाले तरी वर्गभेद नष्ट करणे, गरीब-श्रीमंत भेद नष्ट करणे, कायमची आर्थिक प्रतिष्ठा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राजकीय स्वातंत्र्य मिळाले तरी वर्गभेद नष्ट करणे, गरीब-श्रीमंत भेद नष्ट करणे, कायमची आर्थिक प्रतिष्ठा नष्ट करणे हे ध्येय असल्यानेच शरच्चंद्र मुक्तिबोधांच्या कादंबरी विश्वातला नायक हा कायम साम्यवादी विचारांनी प्रेरित असल्याचे मत प्राचार्य डॉ. रमेश अंधारे यांनी व्यक्त केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर मराठी विभाग व विदर्भ साहित्य संघाच्या वतीने सुरू असलेल्या शरच्चंद्र मुक्तिबोध जन्मशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित व्याख्यानमालेत अंधारे ‘मुक्तिबोधांचे कादंबरी विश्व’ या विषयावर बोलत होते.

या आभासी यंत्रणेद्वारे पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वि.सा. संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर उपस्थित होते.

मुक्तिबोधांनी क्षिप्रा, सरहद्द व जन हे वोळतू जेथे अशा तीन कादंबऱ्या लिहिल्या. या कादंबऱ्यांमध्ये दारिद्र्य, दु:ख आणि स्वार्थाचे मूल्यांकन त्यांनी केले. त्यात वास्तवाचे भान आहे आणि समूह शक्तीनेच अपेक्षित परिवर्तन शक्य आहे, असे ठाम मत असल्याचे अंधारे यावेळी म्हणाले. प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी केले. संचालन ऋचा वगरकर मांजरखेडे यांनी केले तर आभार वर्षा पतके थोटे यांनी मानले.

* आज जन्मशताब्दी सोहळ्याची सांगता

विदर्भ साहित्य संघ व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने कविवर्य शरच्चंद्र मुक्तिबोध यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गुरुवारी संध्याकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम विदर्भ साहित्य संघाच्या अमेय सभागृहात पार पडेल.

..........

‘’?!