शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

मजीप्राकडून गढूळ पाण्याचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:39 IST

कोराडी : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून महादुल्याला पुरविल्या जाणाऱ्या पिण्याचे पाणी गढूळ येत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष ...

कोराडी : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून महादुल्याला पुरविल्या जाणाऱ्या पिण्याचे पाणी गढूळ येत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष उषा शाहू यांनी नगरपंचायतीकडे केली आहे. या संदर्भात नगराध्यक्ष राजेश रंगारी यांना दिलेल्या निवेदनात संभाजीनगर या भागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून केला जाणारा पाणीपुरवठा हा दूषित व अशुद्ध असून, याबाबत चौकशी करावी, मजीप्रावर पाणीपुरवठा संदर्भात नगरपंचायतीने नियंत्रण ठेवावे व शुद्ध पाणी देण्यासंदर्भात मजीप्राला ताकीद द्यावी, अशी मागणी केली आहे. पाण्यामध्ये ब्लिचिंग व क्लोरिन गॅसचा पर्याप्त पुरवठा न करणे, तसेच पाण्यातील गाळ कमी करण्यासंदर्भात परिपक्व यंत्रणा नसणे आदी बाबतीत लक्ष वेधण्यात आले. या संदर्भात राजेश रंगारी यांनी मजीप्राच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करून, यावर तत्काळ कार्यवाही करावी व सर्वांना शुद्ध पाणी दिले जाईल, याची खात्री करावी, असे आदेश दिले आहेत. मजीप्राकडून मात्र अशुद्ध पाण्याचा इन्कार करण्यात आला आहे. मजीप्राच्या दर पंधरा दिवसांनी पाण्याची टीडीएस व इतर तपासणी केल्या जात असल्याचे सांगितले असून, या महिन्यात १ व १९ रोजी तपासणी झाली असून, पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले आहे.