शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

नागपूर दर्शनाबाबत ‘एमटीडीसी’ उदासीन ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 01:15 IST

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे नागपूर दर्शन सहल तसेच खाण पर्यटनाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र १९ महिन्यांमध्ये नागपूर दर्शन सहलीसाठी केवळ ८७ पर्यटक आले. तर खाण पर्यटकांचा आकडा ३००च्या वर गेला नाही. ही आकडेवारी पाहिली असता याबाबत योग्य प्रचार-प्रसार होतो आहे का तसेच नागपूर शहर पर्यटनाच्या बाबतीत समोर कसे येईल, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली.

ठळक मुद्दे१९ महिन्यांत केवळ ८७ पर्यटक : खाण पर्यटनालादेखील हवा तसा प्रतिसाद नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे नागपूर दर्शन सहल तसेच खाण पर्यटनाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र १९ महिन्यांमध्ये नागपूर दर्शन सहलीसाठी केवळ ८७ पर्यटक आले. तर खाण पर्यटकांचा आकडा ३००च्या वर गेला नाही. ही आकडेवारी पाहिली असता याबाबत योग्य प्रचार-प्रसार होतो आहे का तसेच नागपूर शहर पर्यटनाच्या बाबतीत समोर कसे येईल, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे विचारणा केली होती. एप्रिल २०१७ ते आॅक्टोबर २०१८ या कालावधीत खाण पर्यटन व नागपूर दर्शन सहलीला कसा प्रतिसाद लाभला, त्यापासून किती महसूल प्राप्त झाला, शिवाय १ जानेवारी २००५ ते ३१ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत पर्यटन वाढीसाठी कोणकोणते कार्यक्रम आयोजित करण्यात आले व किती प्रायोजकत्व मिळाले इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार नागपूर दर्शन सहलीचे उद्घाटन १५ डिसेंबर २०१६ ला करण्यात आले होते. १९ महिन्यांत केवळ ८७ पर्यटक लाभले. २०१७-१८ मध्ये तर अवघे ९ पर्यटक नागपूर दर्शन सहलीकडे वळले. १९ महिन्यांत सहलीपासून ६७ हजार ४५० रुपयांचा महसूल प्राप्त झाला.दुसरीकडे १७ डिसेंबर २०१६ रोजी खाण पर्यटनाचे उद्घाटन झाले होते. २०१६-१७ मध्ये ११२ पर्यटक आले व त्यापासून ७२ हजार ८०० रुपयांचा महसूल प्राप्त झाला. खाण पर्यटन हा एक वेगळा अनुभव असूनदेखील लोक त्याकडे वळलेच नाही. एप्रिल२०१७ पासून १९ महिन्यांत २७८ पर्यटकांनी खाण पर्यटनाला प्राधान्य दिले व त्यापासून १ लाख ७७ हजार ४५० रुपयांचा महसूल प्राप्त झाला.कालिदास महोत्सवाला साडेचार कोटींचे प्रायोजकत्वनागपुरात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने १९९८-९९ पासून कालीदास महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. एप्रिल २००५ पासून ते आॅक्टोबर २०१८ पर्यंत १२ वर्ष या महोत्सवाला विविध माध्यमांतून प्रायोजकत्व प्राप्त झाले. प्रायोजकांकडून मिळालेली रक्कम ही ४ कोटी ६० लाख १८ हजार ५९ इतकी होती. मात्र हा महोत्सव नि:शुल्क असल्याने कुठलाही महसूल मिळाला नसल्याचा दावा महामंडळातर्फे करण्यात आला आहे. या महोत्सवासाठी प्रायोजक तसेच राज्य शासनाकडून निधी मिळतो, असेदेखील महामंडळाने स्पष्ट केले.कोराडी महोत्सवाला जास्त प्रायोजकदरम्यान, दुसरीकडे कोराडी महोत्सवाला मात्र चांगले प्रायोजकत्व मिळत आहे. २०१६-१७ मध्ये ६१ लाख ५० हजार तर २०१७-१८ मध्ये १ कोटी ४ लाख २५ हजारांचे प्रायोजकत्व मिळाले. दोन वर्षांत प्रायोजकांकडून १ कोटी ६५ लाख ७५ हजारांचा निधी देण्यात आला. तर खाद्य महोत्सवाला ५८ लाख ५२ हजार ९०० रुपयांचे प्रायोजकत्व प्राप्त झाले.‘मारबत’कडे दुर्लक्ष‘मारबत’ महोत्सवाबाबत देशविदेशातदेखील उत्सुकता असते. मात्र महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे केवळ २०१३ व २०१४ मध्येच याचे आयोजन करण्यात आले. यासाठी साडेपाच लाखांचे प्रायोजकत्व प्राप्त झाले. मात्र त्यानंतर याच्या आयोजनासाठी महामंडळातर्फे पुढाकार का घेण्यात आला नाही हा प्रश्नच आहे.

 

टॅग्स :tourismपर्यटनRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता