नागपूर : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात आंदोलन केले. प्रवेशबंदी लावलेल्या महाविद्यालयांना दिलासा देऊ नये, या महाविद्यालयांत प्रवेशित ६,६१६ विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्था करावी, एलएलबी परीक्षेचा निकाल लवकरात लवकर लावण्यात यावा, मूल्यांकनातील त्रुटी दूर करण्यात याव्या, अशाप्रकारच्या त्यांच्या मागण्या होत्या. विद्वत् परिषदेच्या अगोदर हे कार्यकर्ते जमा झाल्यामुळे मागील अनुभव पाहता पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी कार्यकर्त्यांनी परिसरात जोरदार निदर्शने केली. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांनी शिष्टमंडळाची भेट घेतली. यावेळी त्यांनी लवकरात लवकर निकाल लावण्यात येतील, अशा आशयाचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे प्रवेशबंदी असलेली महाविद्यालये जोपर्यंत नियमांची पूर्तता करीत नाही तोपर्यंत त्यांना दिलासा मिळणार नाही, असेदेखील स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
‘अभाविप’चे विद्यापीठात आंदोलन
By admin | Updated: June 24, 2014 00:58 IST