शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
3
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
4
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
5
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
6
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
7
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
8
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
9
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
10
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
11
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
12
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
13
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
14
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
15
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
16
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
17
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
18
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
19
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
20
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा

स्वार्थासाठी केलेल्या तडजोडीने चळवळच संपली

By admin | Updated: December 16, 2014 01:05 IST

बाबासाहेबांच्या विचारावर जगण्याची आमची निष्ठा कमी होते की काय असे वाटते आहे. जे लोक डॉ. आंबेडकरांचा विचार सोडतात ते विचारशून्य आणि ध्येयशून्य होतात. असे ध्येयशून्य लोक स्वत:च्या

दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांची खंत : एस.सी.एस. व्याख्यानमालानागपूर : बाबासाहेबांच्या विचारावर जगण्याची आमची निष्ठा कमी होते की काय असे वाटते आहे. जे लोक डॉ. आंबेडकरांचा विचार सोडतात ते विचारशून्य आणि ध्येयशून्य होतात. असे ध्येयशून्य लोक स्वत:च्या स्वार्थासाठी विचारधारेचा बळी देतात आणि पदे मिळवून भौतिक सुखात रममाण होतात. व्यक्तिगत स्वार्थासाठी अनेक लोक अशाच नेतृत्वाच्या मागे लागतात तेव्हा विचार संपतो आणि चळवळही संपते. आंबेडकरवादी चळवळीचे हेच झाले, त्यामुळे आपली चळवळच संपली असल्याची खंत दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांनी व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित एस. सी. एस. व्याख्यानमालेत ‘आजची आपली चळवळ’ विषयावर व्याख्यान देताना राजा ढाले बोलत होते. हा कार्यक्रम एस. सी. एस. गर्ल्स हायस्कूल, पाचपावली येथे सोमवारी सायंकाळी पार पडला. आज कुठलीही आंबेडकरवादी चळवळ सुरू नाही, कारण नेतृत्व करणाऱ्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा सांभाळला नाही. बाबासाहेबांचे नाव घ्यायचे आणि त्यांच्या विचारांना तिलांजली देत इतरांशी संधान साधायचे, यामुळे चळवळीच्या लोकांमध्ये एक संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. चळवळीतल्या निष्ठावंतांच्या उणिवांमुळेच हे घडले आणि घडते आहे पण सारेच काही संपलेले नाही. आंबेडकरांचा विचार आणि आपल्यातील बंधूता, ध्येयवाद, निष्ठा पुन्हा निर्माण करण्याची शक्ती आपल्यात आहे. त्यासाठी मी पुन्हा तयार आहे, पण मला निष्ठावंत युवक हवे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. भाऊ लोखंडे तर प्रमुख अतिथी म्हणून रणजित मेश्राम, विजय चिकाटे उपस्थित होते. डॉ. भाऊ लोखंडे यांनीही आपली बाबासाहेबांच्या विचारावरची श्रद्धा कमी झाली तर भौतिक सुखे कदाचित मिळतील; पण वैचारिक स्वातंत्र्य आपण गमावून बसू. माणूस म्हणून जगायचे असेल तर बाबासाहेबांचा विचारच आपल्याला तारू शकतो, अन्यथा वैचारिक गुलामगिरीतच आपल्या पिढ्या राहतील, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)