शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

स्वार्थासाठी केलेल्या तडजोडीने चळवळच संपली

By admin | Updated: December 16, 2014 01:05 IST

बाबासाहेबांच्या विचारावर जगण्याची आमची निष्ठा कमी होते की काय असे वाटते आहे. जे लोक डॉ. आंबेडकरांचा विचार सोडतात ते विचारशून्य आणि ध्येयशून्य होतात. असे ध्येयशून्य लोक स्वत:च्या

दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांची खंत : एस.सी.एस. व्याख्यानमालानागपूर : बाबासाहेबांच्या विचारावर जगण्याची आमची निष्ठा कमी होते की काय असे वाटते आहे. जे लोक डॉ. आंबेडकरांचा विचार सोडतात ते विचारशून्य आणि ध्येयशून्य होतात. असे ध्येयशून्य लोक स्वत:च्या स्वार्थासाठी विचारधारेचा बळी देतात आणि पदे मिळवून भौतिक सुखात रममाण होतात. व्यक्तिगत स्वार्थासाठी अनेक लोक अशाच नेतृत्वाच्या मागे लागतात तेव्हा विचार संपतो आणि चळवळही संपते. आंबेडकरवादी चळवळीचे हेच झाले, त्यामुळे आपली चळवळच संपली असल्याची खंत दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांनी व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित एस. सी. एस. व्याख्यानमालेत ‘आजची आपली चळवळ’ विषयावर व्याख्यान देताना राजा ढाले बोलत होते. हा कार्यक्रम एस. सी. एस. गर्ल्स हायस्कूल, पाचपावली येथे सोमवारी सायंकाळी पार पडला. आज कुठलीही आंबेडकरवादी चळवळ सुरू नाही, कारण नेतृत्व करणाऱ्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा सांभाळला नाही. बाबासाहेबांचे नाव घ्यायचे आणि त्यांच्या विचारांना तिलांजली देत इतरांशी संधान साधायचे, यामुळे चळवळीच्या लोकांमध्ये एक संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. चळवळीतल्या निष्ठावंतांच्या उणिवांमुळेच हे घडले आणि घडते आहे पण सारेच काही संपलेले नाही. आंबेडकरांचा विचार आणि आपल्यातील बंधूता, ध्येयवाद, निष्ठा पुन्हा निर्माण करण्याची शक्ती आपल्यात आहे. त्यासाठी मी पुन्हा तयार आहे, पण मला निष्ठावंत युवक हवे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. भाऊ लोखंडे तर प्रमुख अतिथी म्हणून रणजित मेश्राम, विजय चिकाटे उपस्थित होते. डॉ. भाऊ लोखंडे यांनीही आपली बाबासाहेबांच्या विचारावरची श्रद्धा कमी झाली तर भौतिक सुखे कदाचित मिळतील; पण वैचारिक स्वातंत्र्य आपण गमावून बसू. माणूस म्हणून जगायचे असेल तर बाबासाहेबांचा विचारच आपल्याला तारू शकतो, अन्यथा वैचारिक गुलामगिरीतच आपल्या पिढ्या राहतील, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)