शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

स्वार्थासाठी केलेल्या तडजोडीने चळवळच संपली

By admin | Updated: December 16, 2014 01:05 IST

बाबासाहेबांच्या विचारावर जगण्याची आमची निष्ठा कमी होते की काय असे वाटते आहे. जे लोक डॉ. आंबेडकरांचा विचार सोडतात ते विचारशून्य आणि ध्येयशून्य होतात. असे ध्येयशून्य लोक स्वत:च्या

दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांची खंत : एस.सी.एस. व्याख्यानमालानागपूर : बाबासाहेबांच्या विचारावर जगण्याची आमची निष्ठा कमी होते की काय असे वाटते आहे. जे लोक डॉ. आंबेडकरांचा विचार सोडतात ते विचारशून्य आणि ध्येयशून्य होतात. असे ध्येयशून्य लोक स्वत:च्या स्वार्थासाठी विचारधारेचा बळी देतात आणि पदे मिळवून भौतिक सुखात रममाण होतात. व्यक्तिगत स्वार्थासाठी अनेक लोक अशाच नेतृत्वाच्या मागे लागतात तेव्हा विचार संपतो आणि चळवळही संपते. आंबेडकरवादी चळवळीचे हेच झाले, त्यामुळे आपली चळवळच संपली असल्याची खंत दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांनी व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित एस. सी. एस. व्याख्यानमालेत ‘आजची आपली चळवळ’ विषयावर व्याख्यान देताना राजा ढाले बोलत होते. हा कार्यक्रम एस. सी. एस. गर्ल्स हायस्कूल, पाचपावली येथे सोमवारी सायंकाळी पार पडला. आज कुठलीही आंबेडकरवादी चळवळ सुरू नाही, कारण नेतृत्व करणाऱ्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा सांभाळला नाही. बाबासाहेबांचे नाव घ्यायचे आणि त्यांच्या विचारांना तिलांजली देत इतरांशी संधान साधायचे, यामुळे चळवळीच्या लोकांमध्ये एक संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. चळवळीतल्या निष्ठावंतांच्या उणिवांमुळेच हे घडले आणि घडते आहे पण सारेच काही संपलेले नाही. आंबेडकरांचा विचार आणि आपल्यातील बंधूता, ध्येयवाद, निष्ठा पुन्हा निर्माण करण्याची शक्ती आपल्यात आहे. त्यासाठी मी पुन्हा तयार आहे, पण मला निष्ठावंत युवक हवे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. भाऊ लोखंडे तर प्रमुख अतिथी म्हणून रणजित मेश्राम, विजय चिकाटे उपस्थित होते. डॉ. भाऊ लोखंडे यांनीही आपली बाबासाहेबांच्या विचारावरची श्रद्धा कमी झाली तर भौतिक सुखे कदाचित मिळतील; पण वैचारिक स्वातंत्र्य आपण गमावून बसू. माणूस म्हणून जगायचे असेल तर बाबासाहेबांचा विचारच आपल्याला तारू शकतो, अन्यथा वैचारिक गुलामगिरीतच आपल्या पिढ्या राहतील, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)