शहरं
Join us  
Trending Stories
1
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
2
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
3
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
4
भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
5
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
6
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
7
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
8
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
9
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
10
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
11
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
12
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
13
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
14
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
15
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
16
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 
17
"घाबरण्याची गरज नाही..," भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलनं पेट्रोल-डिझेलवर केलं मोठं वक्तव्य
18
"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान!
19
India Pakistan: पाकिस्तानच्या मिसाईल्स फटाक्यासारख्या फुस्स; पंजाबमध्ये सापडली पाडलेली क्षेपणास्त्रे, बघा व्हिडीओ
20
सलमान खान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, गलवान व्हॅलीतील भारत-चीन युद्धावर येणार सिनेमा

‘अभिजात’ दर्जासाठी महाराष्ट्रदिनी आंदोलन

By admin | Updated: April 27, 2017 02:15 IST

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सर्व स्तरातून प्रयत्न सुरू आहेत. सामान्य मराठी जणांपासून विविध साहित्य संस्थांनी

‘मसाप’चा निर्णय : मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान, राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर धरणे नागपूर : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सर्व स्तरातून प्रयत्न सुरू आहेत. सामान्य मराठी जणांपासून विविध साहित्य संस्थांनी सातत्याने ही मागणी केंद्र सरकारकडे लावून धरली आहे. पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तब्बल ९० हजार पत्रे पाठवली. पण, केंद्र सरकार जागचे हलायला तयार नाही. राज्य सरकारही या विषयावर केवळ औपचारिकता दाखवत आहे. त्यामुळे या दोन्ही सरकारांना मराठीच्या अभिजाततेचे स्मरण करून देण्यासाठी १मे महाराष्ट्रदिनी मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील निवासस्थानासह राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर धरणे देण्याचे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषदेने केले आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही तमाम महाराष्ट्रासाठी एक अर्थपूर्ण घटना ठरणार आहे. अभिजात दर्जा देण्यासाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. मराठी भाषा हे निकष निश्चितपणे पूर्ण करते. तसा अहवाल प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेतील समितीने सप्रमाण केंद्र सरकारला देऊनही केंद्र सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. म्हणून महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून हे आंदोलन करण्याचा निर्णय महाराष्ट्र साहित्य परिषदेने घेतला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या घटक संस्थांसह राज्यभरातील साहित्य संस्थांनी त्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मागणीसाठी धरणे द्यावे, असे आवाहन ‘मसाप’च्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी) नागपुरात मात्र सामसूम मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्यभरात असे आंदोलनाचे वारे वाहत असताना साहित्य महामंडळाचा मुक्काम असलेल्या नागपुरात मात्र सारेच सामसूम आहे. मुख्यमंत्र्यांचे मूळ निवासस्थान नागपुरात आहे. परंतु महाराष्ट्र दिन तीन दिवसांवर असताना शहरातील साहित्य संस्थांमध्ये अशा कुठल्या धरणे आंदोलनाबाबत चर्चाही झालेली नाही. ‘मसाप’चे आवाहन नागपुरात पोहोचले नाही की येथील साहित्य संस्थांना अशा कुठल्या आंदोलनात रस नाही, असा प्रश्न या निमित्ताने समोर झाला आहे.