शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

जलसंवर्धनातून समृद्धीकडे वाटचाल करा

By admin | Updated: April 19, 2015 02:22 IST

केंद्र व राज्य सरकारच्या योजना व ग्रामस्थांचा सहभाग यातून पुढील पाच वर्षात जिल्ह्यातील गावागावात २४ तास पाणी उपलब्ध करण्याचा संकल्प करा, ..

नागपूर : केंद्र व राज्य सरकारच्या योजना व ग्रामस्थांचा सहभाग यातून पुढील पाच वर्षात जिल्ह्यातील गावागावात २४ तास पाणी उपलब्ध करण्याचा संकल्प करा, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केले. अ‍ॅग्रोव्हिजन व विदर्भ गौरव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शंकरनगर येथील श्री साई सभागृहात आयोजित अ‍ॅग्रोव्हिजन सेंद्रीय शेती कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी खासदार दत्ता मेघे तर प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुधीर पारवे, जि.प.अध्यक्ष निशा सावरकर, अभिनेता मनोज जोशी, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे, संजय नहार, भारत देसरडा, विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे सचिव गिरीश गांधी आदी उपस्थित होते.नैसर्गिक संकटात शेतक ऱ्यांनी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. अशा संकटावर मात करण्यासाठी जलसंवर्धनाशिवाय पर्याय नाही. यात ज्या गावात सर्वाधिक पाणीटंचाई आहे, त्यांना प्राधान्य द्या, असे आवाहन गडकरी यांनी केले.पुढील पाच वर्षात जिल्ह्यातील सर्व १८०० गावात सेंद्रीय शेतीसोबतच जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ३३६ गावांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीतून ५५ कोटीचा निधी उपलब्ध केला आहे. या वर्षात १०० कोटीचा निधी खर्च करून जिल्हा टंचाईमुक्त करणार असल्याची घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. पशुसंवर्धन, मत्स्य विभागातील योजनांच्या तुलनेत कर्मचाऱ्यांच्या वेतनावर अधिक खर्च होतो. हा प्रकार थांबला पाहिजे. ग्रामस्तरावर ७३ सक्रिय कृषी बचतगट तयार करून प्रत्येकी पाच लाखाची मदत देण्याची घोषणा त्यांनी केली. प्रास्ताविकातून निशा सावरकर यांनी शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती करण्याचे आवाहन केले. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन जि.प.चे माजी अध्यक्ष रमेश मानकर यांनी तर आभार दिलीप जाधव यांनी मानले. मनोहर परचुरे, अभयसिंग राजपूत व हेमंत चव्हाण आदींनी विविध चर्चासत्रात मार्गदर्शन केले. बाबासाहेब बोंदरे, रवी बोरटकर, साहेबराव धोटे आदीसह प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)