शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
4
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
6
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
7
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
8
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
9
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
10
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
11
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
12
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
13
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
14
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
15
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
16
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
17
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
18
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
19
...तर तुम्हा-आम्हाला स्वस्त वीज मिळेल! खासगी कंपन्यांच्या प्रवेशाने महाराष्ट्राच्या वीज बाजारात स्पर्धा वाढणार
20
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग

जलसंवर्धनातून समृद्धीकडे वाटचाल करा

By admin | Updated: April 19, 2015 02:22 IST

केंद्र व राज्य सरकारच्या योजना व ग्रामस्थांचा सहभाग यातून पुढील पाच वर्षात जिल्ह्यातील गावागावात २४ तास पाणी उपलब्ध करण्याचा संकल्प करा, ..

नागपूर : केंद्र व राज्य सरकारच्या योजना व ग्रामस्थांचा सहभाग यातून पुढील पाच वर्षात जिल्ह्यातील गावागावात २४ तास पाणी उपलब्ध करण्याचा संकल्प करा, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केले. अ‍ॅग्रोव्हिजन व विदर्भ गौरव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शंकरनगर येथील श्री साई सभागृहात आयोजित अ‍ॅग्रोव्हिजन सेंद्रीय शेती कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी खासदार दत्ता मेघे तर प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुधीर पारवे, जि.प.अध्यक्ष निशा सावरकर, अभिनेता मनोज जोशी, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे, संजय नहार, भारत देसरडा, विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे सचिव गिरीश गांधी आदी उपस्थित होते.नैसर्गिक संकटात शेतक ऱ्यांनी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. अशा संकटावर मात करण्यासाठी जलसंवर्धनाशिवाय पर्याय नाही. यात ज्या गावात सर्वाधिक पाणीटंचाई आहे, त्यांना प्राधान्य द्या, असे आवाहन गडकरी यांनी केले.पुढील पाच वर्षात जिल्ह्यातील सर्व १८०० गावात सेंद्रीय शेतीसोबतच जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ३३६ गावांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीतून ५५ कोटीचा निधी उपलब्ध केला आहे. या वर्षात १०० कोटीचा निधी खर्च करून जिल्हा टंचाईमुक्त करणार असल्याची घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. पशुसंवर्धन, मत्स्य विभागातील योजनांच्या तुलनेत कर्मचाऱ्यांच्या वेतनावर अधिक खर्च होतो. हा प्रकार थांबला पाहिजे. ग्रामस्तरावर ७३ सक्रिय कृषी बचतगट तयार करून प्रत्येकी पाच लाखाची मदत देण्याची घोषणा त्यांनी केली. प्रास्ताविकातून निशा सावरकर यांनी शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती करण्याचे आवाहन केले. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन जि.प.चे माजी अध्यक्ष रमेश मानकर यांनी तर आभार दिलीप जाधव यांनी मानले. मनोहर परचुरे, अभयसिंग राजपूत व हेमंत चव्हाण आदींनी विविध चर्चासत्रात मार्गदर्शन केले. बाबासाहेब बोंदरे, रवी बोरटकर, साहेबराव धोटे आदीसह प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)