शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

नागपुरात आई, वडील व मुलाने हरविले कोरोनाला  : मेडिकलमधून मिळाली सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 20:05 IST

नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोनामुक्त होऊन घरी जाणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. मंगळवारी आणखी तीन कोरोनाबाधितांना मेडिकलमधून सुटी देण्यात आली. आई, वडील व मुलाने कोरोनाला हरविले आहे.

ठळक मुद्देकोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ११

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोनामुक्त होऊन घरी जाणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. मंगळवारी आणखी तीन कोरोनाबाधितांना मेडिकलमधून सुटी देण्यात आली. आई, वडील व मुलाने कोरोनाला हरविले आहे. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ११ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, वडिलांना पक्षाघात झाला होता. त्या स्थितीतही त्यांनी कोरोनाशी लढा दिला. यात त्यांना मेडिकलच्या डॉक्टरांची मोठी मदत झाली.नागपुरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मंगळवारी ५६ झाली. गेल्या तीन दिवसांत २७ रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे. असे असताना तीन रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने काहीसा दिलासाही मिळाला आहे. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे व औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमख डॉ. राजेश गोसावी यांनी ‘कोविड-१९’ वॉर्डात काम करणारे डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. रुग्णालयातून सुटी झालेल्या ४५ वर्षीय वडिलांचा संपर्क त्याच्या कोरोनाबाधित भावाकडून झाला होता. त्याचा भाऊ बाधित रुग्णाच्या दुकानात काम करीत होता. वडिलांचे नमुने २९ मार्च रोजी पॉझिटिव्ह आले. यामुळे त्यांची ४४ वर्षीय पत्नी व १४ वर्षीय मुलाचे नमुने तपासले असता ३० मार्च रोजी दोघेही पॉझिटिव्ह आले. या तिघांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. भरतीच्या सातव्या दिवशी व १४ दिवसांनंतर २४ तासांच्या कालावधीत तपासलेले तिन्ही नमुने निगेटिव्ह आले. यामुळे तिघांनाही रुग्णालयातून सुटी देण्यात आली. या दरम्यान, आई-वडील व मुलाने त्यांना सेवा देणारे डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी त्यांच्या रुग्णसेवेची प्रशंसा केली. डॉक्टरांचे उपचार, त्यांनी दिलेले हिमतीचे बळ आणि आपल्याला बरे व्हायचे आहे, ही सकारात्मक वृत्ती ठेवल्याने आजारातून बरे झालो, असेही त्यांचे म्हणणे होते. तिघांना रुग्णालातून घरी नेण्यासाठी त्यांचे नातेवाईक आले होते. तिघेही कोरोनामुक्त झाले असले तरी पुढील १४ दिवस त्यांना घरीच राहावे लागणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर