शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील तुंबलेल्या बहुतांश नाल्यांमध्ये आढळले प्लास्टिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 10:38 IST

शुक्रवारी मुसळधार पावसामुळे जनजीवन ठप्प झाले. अनेक वस्त्यांमधील घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे अनेकांना सामान इतरत्र हलवावे लागले. अनेक वस्त्यांमधील ड्रेनेज लाईनमध्ये प्लास्टिक अडकून पाणी तुंबल्याने गडर-नाल्यांमधील पाणी रस्त्यांवर आले.

ठळक मुद्देप्लास्टिकबंदीचे कळले महत्त्वपाणी वाहून जाण्यास अडथळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शुक्रवारी मुसळधार पावसामुळे जनजीवन ठप्प झाले. अनेक वस्त्यांमधील घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे अनेकांना सामान इतरत्र हलवावे लागले. अनेक वस्त्यांमधील ड्रेनेज लाईनमध्ये प्लास्टिक अडकून पाणी तुंबल्याने गडर-नाल्यांमधील पाणी रस्त्यांवर आले. त्यामुळे थेट शहरात पूरजन्य आणि आपात स्थिती निर्माण झाली होती. या कारणांमुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे प्लास्टिकचा उपयोग योग्य वा अयोग्य हे आता नागरिकांनी रस्त्यांवर निर्माण झालेल्या पूरजन्य स्थितीवरून ठरवावे. काही वर्षांपूर्वी मुंबईत प्लास्टिक नाल्यांमध्ये तुंबल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणली होती.पण आता शासनाने २२ जूनपासून प्लास्टिक ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या आणि थर्माकोलपासून तयार केलेले ताट, कप्स, प्लेटस, ग्लास, वाटी, चमचे आदीं वस्तूंची विक्री आणि वापरावर बंदी आणली. याच वस्तू शुक्रवारी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्यावर तरंगताना दिसून आल्या.

अनेक भागात प्लास्टिकमुळे पाणी वाहून जाण्यास खोळंबाप्लास्टिक आणि थर्माकोलच्या वस्तू नाल्यात तुंबल्यामुळे नाल्यातील पाणी रस्त्यांवर आले. शहरातील अनेक भागात युवकांनी नाल्यांच्या तोंडाशी असलेले प्लास्टिक हटवून पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी जागा मोकळी केली. दुपारी १२ च्या सुमारास धंतोली भागातील रेल्वे पुलाखाली नागनदीला पूर आला होता. त्यावेळी पाण्यावरून प्लास्टिक मोठ्या प्रमाणात वाहून जात होते. पुराचे पाणी नदीतून रेल्वे पुलाखालील रस्त्यावर येत असताना पाण्यासोबत प्लास्टिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वाहून येत होते. शासनाने प्लास्टिकवर बंदी आणली, पण नागरिकांनाही तेवढ्याच सजगतेने बंदीचा स्वीकार केला पाहिजे. शुक्रवारी प्लास्टिकने तुंबलेल्या नाल्यांचा बोध नागरिकांना घेण्याची गरज निर्माण झाली आहे.नागरिक दैनंदिन वापराच्या वस्तू छोट्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये घरी आणतात आणि उपयोगानंतर सवयीप्रमाणे त्या रस्त्यांवर फेकतात. त्या नंतर नाल्यांच्या तोंडाशी जमा होतात. मुसळधार पावसानंतर त्या नाल्यात फसतात. शुक्रवारी मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरजन्य स्थितीसाठी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक जबाबदार आहे.

व्यापाऱ्यांनीही बंदीचा स्वीकार करावाप्लास्टिकबंदीमुळे व्यवसाय बंद पडतील आणि बेरोजगारी वाढले, अशा वल्गना व्यापाऱ्यांनी पावसामुळे घडलेल्या घटनांवरून बोध घेऊन करू नये. किराणा दुकानदारांनी प्लास्टिकचा बंदी कटाक्षाने पाळल्यास ग्राहकसुद्धा कापडी थैल्यांचा उपयोग करतील आणि हळूहळू प्लास्टिक रस्त्यांवर दिसणार नाही तसेच मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पूरजन्य स्थिती निर्माण होणार नाही.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी