शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

महाराष्ट्रात सर्वाधिक जीवनदाते

By admin | Updated: May 16, 2014 00:46 IST

रक्तदान हेच जीवनदान म्हटल्या जाते. हे पुण्यकर्म करण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. गेल्या चार वर्षांंपासून गरजेपेक्षा रक्ताचे संकलन दीड ते दोन लाख युनिटने जास्त होत आहे.

नागपूर : रक्तदान हेच जीवनदान म्हटल्या जाते. हे पुण्यकर्म करण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. गेल्या चार वर्षांंपासून गरजेपेक्षा रक्ताचे संकलन दीड ते दोन लाख युनिटने जास्त होत आहे.

वाढलेले आजार, अपघातामुळे रुग्णांना, जखमींना रुक्ताची गरज असते. थॅलेसिमिया, सिकलसेल, ब्लड कॅन्सरचा आजार झालेल्या रुग्णांना तर नियमित रक्ताची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात रक्त संकलन सर्वाधिक जास्त होत असेल तर महाराष्ट्रासाठी ही गौरवाची बाब आहे. राज्याला दरवर्षी १0 ते १२ लाख युनिट रक्ताची गरज भासते, असे महाराष्ट्र रक्त संक्रमण परिषदेचा अहवाल आहे. रक्ताची गरज भागविण्यासाठी शासकीय रुग्णालये, स्वयंसेवी संस्था, रक्तपेढय़ा रक्तदान शिबिर घेऊन रक्त संकलन करतात. राज्यात जवळपास ३00 च्यावर रक्तपेढय़ा आहेत. ग्रामीण भागाच्या तुलनेत मोठय़ा शहरात रक्ताची गरज अधिक असते. विशेष म्हणजे ३५ दिवसांत संकलन केलेल्या रक्ताचा वापर करावा लागतो. आधुनिक तंत्रज्ञानामुळे रक्तातील वेगवेगळे घटक काढून वापरात आणले जातात.

गरजेपेक्षा जास्त रक्त संकलन होणे महाराष्ट्रासाठी भूषणावह असले तरी, खाजगी रक्तपेढय़ांच्या माध्यमातून रक्ताचा व्यवसाय होत आहे. यात गरीब मात्र भरडल्या जात आहे. त्यांच्या या समस्येकडे लक्ष द्यायला कुणीच पुढे सरसावत नाही. परिणामी, रक्ताअभावी अनेकांचे जीव जात आहेत. रक्ताच्या उपलब्धतेसाठी आता स्वयंसेवी संस्थांनी मदतीचा हात देणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)