शहरं
Join us  
Trending Stories
1
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
2
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
3
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
4
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
5
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
6
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
7
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
8
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
9
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
10
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
11
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
12
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
13
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
14
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
15
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
17
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
18
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
19
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
20
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
Daily Top 2Weekly Top 5

मानवी चुकांमुळेच सर्वाधिक अपघात; नागपुरातील धक्कादायक वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 11:01 IST

एकट्या नागपूर शहरात २०१८ मध्ये १११७ अपघात झाले. यात २३७ जणांचा मृत्यू व ११८७ जखमी झाले.

ठळक मुद्दे४५ दिवसात ३७ अपघात, ३९ मृत्यू 

 

सुमेध वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अपघाताच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसल्याचे शहरातील चित्र आहे. १ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या ४५ दिवसात ३७ अपघात झाले असून यात ३९ जणांचे बळी गेले आहेत. ही संख्या कोणत्याही प्रकाराच्या आजाराने किंवा नैसर्गिक आपत्तीने होणाऱ्या जीवहानीपेक्षाही मोठी आहे. यातील ८० टक्के अपघात मानवी चुकांमुळे झाल्याचे समोर आले आहे. हे निश्चितच टाळता येण्यासारखे आहे. वाहतूक नियमांच्या व्यापक जनजागृतीची गरज निर्माण झाली आहे.वाढत्या शहरीकरणामुळे मुख्य रस्तेच नाही तर वसाहतीमधील रस्त्यांवरील वाहतूक समस्या बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दुरावस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ यामुळे जलद आणि सुरक्षित प्रवास करणे कठीण झाले आहे. मर्यादित पार्किंगच्या जागा व रस्त्यावरील अतिक्र मणामुळे परिस्थिती अधिकच अवघड होत चालली आहे. पोलीस उपआयुक्त (वाहतूक) कार्यालयाने ४५ दिवसात शहरात झालेले रस्ता अपघात व मृत्यूचा अभ्यास केला असता हे अपघात ९ ते सकाळी ७ दरम्यान झाल्याचे पुढे आले आहे. या वेळेत रस्ता मोकळा म्हणजे अनियंत्रित वेग व वाहतूक नियमांची पायमल्ली हे अपघातासाठी तर सुरक्षिततेविषयी निष्काळजीपणा हे मृत्यूला कारणीभूत ठरल्याचे समोर आले आहे. झालेल्या ३७ अपघातात सर्वाधिक अपघात दुचाकीस्वारांचे आहेत.जिल्ह्यात २०१८ मध्ये अपघातात ५७७ तर २०१९ मध्ये ६३४ मृत्यूएकट्या नागपूर शहरात २०१८ मध्ये १११७ अपघात झाले. यात २३७ जणांचा मृत्यू व ११८७ जखमी झाले. ग्रामीणमध्ये ९४० अपघात, ३४० मृत्यू व ९८१ व्यक्ती जखमी झाल्या. एकूण जिल्ह्यात २०५७ अपघात, ५७७ मृत्यू व २१६८ जखमी झाले. २०१९ मध्ये शहरात १००७ अपघातात २५० मृत्यू तर १०४२ जखमी झाले. ग्रामीणमध्ये ८४३ अपघात, ३८४ मृत्यू व ९५० जखमी झाले. एकूण जिल्ह्यात १८५० अपघात, ६३४ मृत्यू व १९९२ जखमी झाले. २०१८च्या तुलनेत २०१९ मध्ये २०७ अपघात कमी झाले असलेतरी शहर आणि ग्रामीणमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

वेगाने वाहन चालविणे हे अपघाताचे कारणवाहतुकीच्या नियमांचा अभ्यास करणायाऱ्या तज्ज्ञांच्या मते, वाहतुकीसाठी निर्देशित वेगमर्यादेचे उल्लंघन करणे किंवा रस्त्यावरील स्थिती न पाहता वेगाने वाहन चालविणे हे जवळपास १/३ जीवघेण्या अपघातांचे कारण असते. अतिवेगामुळे अपघात टाळण्यास कमी वेळ मिळतो, अपघाताची शक्यता वाढते व अपघात झाल्यास त्याची तीव्रताही वाढते.

दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर का?दुचाकीचा अपघात होऊन आपले डोके एखाद्या कठीण पृष्ठभागावर आदळते, तेव्हा अगदी सेकंदभरात डोके काम करेनासे होते. ताशी १० ते १०० कि.मी. वेगाने मोटारबाईक चालविणाऱ्याला होणाऱ्या अपघातात ही प्रक्रिया हानिकारक ठरते.२० कि.मी. वेगाने जाणाऱ्या दुचाकीचा अपघात होतो, तेव्हा निर्माण होणारा आघात ५०००० न्यूटन मापाच्या बलाइतका प्रचंड असतो. या आघाताने कवटीला चिरा जाणे, मेंदूत रक्तस्राव, मेंदूला धक्का, मुका मार; अशा इजा होतात. अशावेळी डोक्यावर असलेले हेल्मेट हा आघात शोषून डोक्याचे रक्षण करते.

अपघात निश्चितच टाळता येण्यासारखेअपघातांपैकी ७० ते ८० टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होत असल्याने ते निश्चितच टाळता येतात. प्रवासादरम्यानची जीवित सुरक्षितता प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. परंतु अधिक गतीने वाहन चालविणे, चालविताना वाहतुकीचे नियम तोडणे हल्ली फॅशन झाली आहे. ही फॅशन वाहनचालकासोबतच पादचारी व निरपराध व्यक्तीच्या जीवावर बेतणारी ठरत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी दोषी चालकांवर कारवाई केली जात आहे, सोबतच चालक व सामान्य व्यक्तींमध्ये वाहतूक नियमांची जनजागृती करण्यासाठी मोहीमही हाती घेतली आहे.-चिन्मय पंडित, पोलीस उपआयुक्त (वाहतूक)

टॅग्स :Accidentअपघात