शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मानवी चुकांमुळेच सर्वाधिक अपघात; नागपुरातील धक्कादायक वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 11:01 IST

एकट्या नागपूर शहरात २०१८ मध्ये १११७ अपघात झाले. यात २३७ जणांचा मृत्यू व ११८७ जखमी झाले.

ठळक मुद्दे४५ दिवसात ३७ अपघात, ३९ मृत्यू 

 

सुमेध वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अपघाताच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसल्याचे शहरातील चित्र आहे. १ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या ४५ दिवसात ३७ अपघात झाले असून यात ३९ जणांचे बळी गेले आहेत. ही संख्या कोणत्याही प्रकाराच्या आजाराने किंवा नैसर्गिक आपत्तीने होणाऱ्या जीवहानीपेक्षाही मोठी आहे. यातील ८० टक्के अपघात मानवी चुकांमुळे झाल्याचे समोर आले आहे. हे निश्चितच टाळता येण्यासारखे आहे. वाहतूक नियमांच्या व्यापक जनजागृतीची गरज निर्माण झाली आहे.वाढत्या शहरीकरणामुळे मुख्य रस्तेच नाही तर वसाहतीमधील रस्त्यांवरील वाहतूक समस्या बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दुरावस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ यामुळे जलद आणि सुरक्षित प्रवास करणे कठीण झाले आहे. मर्यादित पार्किंगच्या जागा व रस्त्यावरील अतिक्र मणामुळे परिस्थिती अधिकच अवघड होत चालली आहे. पोलीस उपआयुक्त (वाहतूक) कार्यालयाने ४५ दिवसात शहरात झालेले रस्ता अपघात व मृत्यूचा अभ्यास केला असता हे अपघात ९ ते सकाळी ७ दरम्यान झाल्याचे पुढे आले आहे. या वेळेत रस्ता मोकळा म्हणजे अनियंत्रित वेग व वाहतूक नियमांची पायमल्ली हे अपघातासाठी तर सुरक्षिततेविषयी निष्काळजीपणा हे मृत्यूला कारणीभूत ठरल्याचे समोर आले आहे. झालेल्या ३७ अपघातात सर्वाधिक अपघात दुचाकीस्वारांचे आहेत.जिल्ह्यात २०१८ मध्ये अपघातात ५७७ तर २०१९ मध्ये ६३४ मृत्यूएकट्या नागपूर शहरात २०१८ मध्ये १११७ अपघात झाले. यात २३७ जणांचा मृत्यू व ११८७ जखमी झाले. ग्रामीणमध्ये ९४० अपघात, ३४० मृत्यू व ९८१ व्यक्ती जखमी झाल्या. एकूण जिल्ह्यात २०५७ अपघात, ५७७ मृत्यू व २१६८ जखमी झाले. २०१९ मध्ये शहरात १००७ अपघातात २५० मृत्यू तर १०४२ जखमी झाले. ग्रामीणमध्ये ८४३ अपघात, ३८४ मृत्यू व ९५० जखमी झाले. एकूण जिल्ह्यात १८५० अपघात, ६३४ मृत्यू व १९९२ जखमी झाले. २०१८च्या तुलनेत २०१९ मध्ये २०७ अपघात कमी झाले असलेतरी शहर आणि ग्रामीणमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

वेगाने वाहन चालविणे हे अपघाताचे कारणवाहतुकीच्या नियमांचा अभ्यास करणायाऱ्या तज्ज्ञांच्या मते, वाहतुकीसाठी निर्देशित वेगमर्यादेचे उल्लंघन करणे किंवा रस्त्यावरील स्थिती न पाहता वेगाने वाहन चालविणे हे जवळपास १/३ जीवघेण्या अपघातांचे कारण असते. अतिवेगामुळे अपघात टाळण्यास कमी वेळ मिळतो, अपघाताची शक्यता वाढते व अपघात झाल्यास त्याची तीव्रताही वाढते.

दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर का?दुचाकीचा अपघात होऊन आपले डोके एखाद्या कठीण पृष्ठभागावर आदळते, तेव्हा अगदी सेकंदभरात डोके काम करेनासे होते. ताशी १० ते १०० कि.मी. वेगाने मोटारबाईक चालविणाऱ्याला होणाऱ्या अपघातात ही प्रक्रिया हानिकारक ठरते.२० कि.मी. वेगाने जाणाऱ्या दुचाकीचा अपघात होतो, तेव्हा निर्माण होणारा आघात ५०००० न्यूटन मापाच्या बलाइतका प्रचंड असतो. या आघाताने कवटीला चिरा जाणे, मेंदूत रक्तस्राव, मेंदूला धक्का, मुका मार; अशा इजा होतात. अशावेळी डोक्यावर असलेले हेल्मेट हा आघात शोषून डोक्याचे रक्षण करते.

अपघात निश्चितच टाळता येण्यासारखेअपघातांपैकी ७० ते ८० टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होत असल्याने ते निश्चितच टाळता येतात. प्रवासादरम्यानची जीवित सुरक्षितता प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. परंतु अधिक गतीने वाहन चालविणे, चालविताना वाहतुकीचे नियम तोडणे हल्ली फॅशन झाली आहे. ही फॅशन वाहनचालकासोबतच पादचारी व निरपराध व्यक्तीच्या जीवावर बेतणारी ठरत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी दोषी चालकांवर कारवाई केली जात आहे, सोबतच चालक व सामान्य व्यक्तींमध्ये वाहतूक नियमांची जनजागृती करण्यासाठी मोहीमही हाती घेतली आहे.-चिन्मय पंडित, पोलीस उपआयुक्त (वाहतूक)

टॅग्स :Accidentअपघात