शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

सकाळी नोकरी गेली, रात्री जीव गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:51 IST

भूविकास बँकेच्या ३६ कर्मचाºयांना सेवामुक्त करण्यात येत असल्याचा आदेश अवसायकाने जारी केला. दसºयाच्या आदल्या दिवशी संबंधित आदेश कर्मचाºयाच्या हाती पडला.

ठळक मुद्देभूविकास बँकेच्या कर्मचाºयांवर संकट : ३६ कर्मचारी सेवामुक्त

कमलेश वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भूविकास बँकेच्या ३६ कर्मचाºयांना सेवामुक्त करण्यात येत असल्याचा आदेश अवसायकाने जारी केला. दसºयाच्या आदल्या दिवशी संबंधित आदेश कर्मचाºयाच्या हाती पडला. आपल्या भविष्याचे काय होणार, दोन मुलींच्या शिक्षणाचे कसे होणार या चिंतेने त्याने धसका घेतला. रात्री हृदयविकाराचा तीव्र धक्का आला आणि जीवच गेला. रवींद्र गुलाबराव धांडे यांच्यासोबत हा दुर्दैवी प्रकार घडला.खरबी रोड येथील रहिवासी असलेले रवींद्र गुलाबराव धांडे (वय ५५) भूविकास बँकेत नोकरीवर होते. सरकारतर्फे या बँकेवर अवसायकाची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या ३३ महिन्यांपासून त्यांना पगार मिळाला नव्हता. धांडे यांना दोन मुली आहेत. दोन्ही इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहेत. घरचा खर्च व मुलींचे शिक्षण असा दुहेरी भार विना पगाराने उचलणे कठीण होते. मात्र, तरीही त्यांनी हिंमत सोडली नाही. कधीतरी बँक सुरळीत होईल. आपली हक्काची देणी मिळतील व सर्वकाही ठीक होईल, या आशेवर त्यांचा जीवनसंघर्ष सुरू होता.२९ सप्टेंबर रोजी दुपारी आपल्याला सेवामुक्त करण्यात येत असल्याचा अवसायक डीडीआर सतीश भोसले यांनी काढलेला आदेश धांडे यांना मिळाला. त्यात नोकरी संदर्भातील आपली देणी उपलब्धतेनुसार व प्राधान्य क्रमानुसार दिली जातील, असे नमूद होते. पैसे कधी मिळतील याची निश्चित कालमर्यादा आदेशात नमूद नाही. हे पाहून धांडे यांना धक्का बसला. दिवसभर ते चिंताग्रस्त राहिले. दोन्ही मुलींचे इंजिनिअरिंगचे शिक्षण सुरू आहे, अजून लग्न व्हायची आहेत. अशात आपली नोकरी गेली यामुळे ते पुरते खचले. ३० सप्टेंबरच्या पहाटे या चिंतेत त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला व त्यातच त्यांचे निधन झाले. दसºयाच्या दिवशी लोक एकमेकांना सोनं देऊन शुभेच्छा देत असताना धांडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.धांडे यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. या घटनेमुळे भूविकास बँकेच्या कर्मचाºयांमध्ये तीव्र रोष पसरला आहे. एकीकडे सरकार विविध प्रकल्पांवर कोट्यवधी रुपये खर्च करते. तर दुसरीकडे भूविकास बँकेच्या कर्मचाºयांना त्यांचा हक्काचा पैसा देण्यासही टाळाटाळ करून त्यांचे जीव जाण्याची वाट पाहत आहे, असा संताप कर्मचाºयांनी व्यक्त केला आहे.३६ कर्मचाºयांची परिस्थिती वाईटसेवामुक्त करण्यात आलेल्या ३६ कर्मचाºयांनी शासनाच्या या भूमिकेमुळे धसका घेतला आहे. ३६ महिन्यांपासून पगार नसल्यामुळे आधीच हे कर्मचारी आर्थिक विवंचनेचा सामना करीत आहेत. अशात सरकारने सेवामुक्त करताना हक्काचे पैसे कधी मिळतील याची कालमर्यादा दिली नसल्यामुळे या कर्मचाºयांवरील मानसिक दडपण वाढले आहे.