शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सकाळी नोकरी गेली, रात्री जीव गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:51 IST

भूविकास बँकेच्या ३६ कर्मचाºयांना सेवामुक्त करण्यात येत असल्याचा आदेश अवसायकाने जारी केला. दसºयाच्या आदल्या दिवशी संबंधित आदेश कर्मचाºयाच्या हाती पडला.

ठळक मुद्देभूविकास बँकेच्या कर्मचाºयांवर संकट : ३६ कर्मचारी सेवामुक्त

कमलेश वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भूविकास बँकेच्या ३६ कर्मचाºयांना सेवामुक्त करण्यात येत असल्याचा आदेश अवसायकाने जारी केला. दसºयाच्या आदल्या दिवशी संबंधित आदेश कर्मचाºयाच्या हाती पडला. आपल्या भविष्याचे काय होणार, दोन मुलींच्या शिक्षणाचे कसे होणार या चिंतेने त्याने धसका घेतला. रात्री हृदयविकाराचा तीव्र धक्का आला आणि जीवच गेला. रवींद्र गुलाबराव धांडे यांच्यासोबत हा दुर्दैवी प्रकार घडला.खरबी रोड येथील रहिवासी असलेले रवींद्र गुलाबराव धांडे (वय ५५) भूविकास बँकेत नोकरीवर होते. सरकारतर्फे या बँकेवर अवसायकाची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या ३३ महिन्यांपासून त्यांना पगार मिळाला नव्हता. धांडे यांना दोन मुली आहेत. दोन्ही इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहेत. घरचा खर्च व मुलींचे शिक्षण असा दुहेरी भार विना पगाराने उचलणे कठीण होते. मात्र, तरीही त्यांनी हिंमत सोडली नाही. कधीतरी बँक सुरळीत होईल. आपली हक्काची देणी मिळतील व सर्वकाही ठीक होईल, या आशेवर त्यांचा जीवनसंघर्ष सुरू होता.२९ सप्टेंबर रोजी दुपारी आपल्याला सेवामुक्त करण्यात येत असल्याचा अवसायक डीडीआर सतीश भोसले यांनी काढलेला आदेश धांडे यांना मिळाला. त्यात नोकरी संदर्भातील आपली देणी उपलब्धतेनुसार व प्राधान्य क्रमानुसार दिली जातील, असे नमूद होते. पैसे कधी मिळतील याची निश्चित कालमर्यादा आदेशात नमूद नाही. हे पाहून धांडे यांना धक्का बसला. दिवसभर ते चिंताग्रस्त राहिले. दोन्ही मुलींचे इंजिनिअरिंगचे शिक्षण सुरू आहे, अजून लग्न व्हायची आहेत. अशात आपली नोकरी गेली यामुळे ते पुरते खचले. ३० सप्टेंबरच्या पहाटे या चिंतेत त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला व त्यातच त्यांचे निधन झाले. दसºयाच्या दिवशी लोक एकमेकांना सोनं देऊन शुभेच्छा देत असताना धांडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.धांडे यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. या घटनेमुळे भूविकास बँकेच्या कर्मचाºयांमध्ये तीव्र रोष पसरला आहे. एकीकडे सरकार विविध प्रकल्पांवर कोट्यवधी रुपये खर्च करते. तर दुसरीकडे भूविकास बँकेच्या कर्मचाºयांना त्यांचा हक्काचा पैसा देण्यासही टाळाटाळ करून त्यांचे जीव जाण्याची वाट पाहत आहे, असा संताप कर्मचाºयांनी व्यक्त केला आहे.३६ कर्मचाºयांची परिस्थिती वाईटसेवामुक्त करण्यात आलेल्या ३६ कर्मचाºयांनी शासनाच्या या भूमिकेमुळे धसका घेतला आहे. ३६ महिन्यांपासून पगार नसल्यामुळे आधीच हे कर्मचारी आर्थिक विवंचनेचा सामना करीत आहेत. अशात सरकारने सेवामुक्त करताना हक्काचे पैसे कधी मिळतील याची कालमर्यादा दिली नसल्यामुळे या कर्मचाºयांवरील मानसिक दडपण वाढले आहे.