शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
3
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
4
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
5
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
6
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
7
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
9
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
10
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
11
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
12
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
13
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
14
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
15
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
16
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
17
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
18
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
19
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
20
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत नागपूर शहरातून बाराशेहून अधिक अल्पवयीन बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 11:11 IST

नागपूर शहरातून मागील पाच वर्षांत १ हजार २३३ अल्पवयीन बेपत्ता झाल्याची बाब समोर आली आहे.

ठळक मुद्दे१०६ जणांचा अद्यापही पत्ताच नाही मानवी तस्करीचा संशय

रियाज अहमद ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरातून मागील पाच वर्षांत १ हजार २३३ अल्पवयीन बेपत्ता झाल्याची बाब समोर आली आहे. यातील १ हजार १२७ जण परत आले. मात्र १०६ जणांचा काहीच पत्ता लागलेला नाही. यात ७७ मुलींचादेखील समावेश आहे. मानवी तस्करीतून हे प्रकार घडले असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. माहिती अधिकारातील माहितीतून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

बाल अधिकार अधिनियम २०१५ च्या कलम १०७ अंतर्गत प्रत्येक पोलीस ठाण्यात बाल पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती अनिवार्य आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात मानव तस्करी प्रतिबंधक पथकदेखील असणे गरजेचे आहे. मात्र मागील पाच वर्षांतील आकडे प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे.आरटीआय कार्यकर्ते आरिफ शेख पटेल यांनी माहिती अधिकारांतर्गत ही माहिती पोलिसांना मागितली होती. प्राप्त माहितीनुसार, जानेवारी २०१५ ते फेब्रुवारी २०२० या कालावधीत नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयांतर्गत येणाºया पोलीस ठाण्यांत १ हजार २३३ अल्पवयीन गायब झाले.

यात ९२१ मुलींचा समावेश होता. २८३ मुले व ८४४ मुलींना पोलिसांनी शोधून काढले. मात्र ७७ मुली व २९ मुलांचा काहीच पत्ता लागलेला नाही.

दोन महिन्यातच ६८ गायब२०२० मध्ये जानेवारी व फेब्रुवारीतील आकडेवारी चिंता वाढविणारी आहे. या दोन महिन्यांत ६८ अल्पवयीन गायब झाले. यातील २६ जण अद्यापही बेपत्ताच आहेत. यात १८ मुली व ८ मुलांचा समावेश आहे. बाल अधिकार कल्याण अंतर्गत असलेल्या कायद्यात अनेक तरतुदी आहेत. मात्र त्यांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नाही. ही प्रकरणे नियंत्रित करणे आवश्यक आहे, असे मत राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी समुपदेशक अंजली विटणकर यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Human Traffickingमानवी तस्करी