शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात दहशतवाद्यांना जादा मायलेज

By admin | Updated: September 25, 2015 03:37 IST

दहशतवाद हा काही एखाद्या कोड्याचे उत्तर शोधून संपविण्यासारखा विषय नव्हे. दहशतवाद्यांना कोणत्याही जाती-धर्माशी काही देणे-घेणे नाही.

टाळता येऊ शकतो धोका : प्रत्येकाने सतर्कता बाळगण्याची गरज नरेश डोंगरे नागपूरदहशतवाद हा काही एखाद्या कोड्याचे उत्तर शोधून संपविण्यासारखा विषय नव्हे. दहशतवाद्यांना कोणत्याही जाती-धर्माशी काही देणे-घेणे नाही. अशांतता, अस्वस्थता, उध्वस्तता हेच दहशतवाद्यांचे टार्गेट असते. त्यासाठी ते प्रयत्नशील असतात. स्लिपर सेलच्या माध्यमातून आपली जमीन तयार करतात अन् आपले कलुषित मनसुबे यशस्वी करतात. त्यांचा मुकाबला करण्यासाठी सुरक्षा यंत्रणेसारखी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखण्याची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीने सतर्कता बाळगल्यास राज्यच काय, देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात कसलाही धोका होणार नाही. राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (स्पेशल आॅपरेशन) विपीनकुमार बिहारी यांचे हे मत आहे. दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या नागपुरात घातपात किंवा जातीय दंगलीचा प्रकार घडू शकतो, असा इशारा असल्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. गेल्या चार दिवसांपासून एडीजी बिहारी नागपुरात आहेत. अधिकाऱ्यांच्या बैठका घेत शहरातील वेगवेगळ्या भागांची ते पाहणी करीत असल्यामुळे पोलीस दलातही कुजबुज वाढली आहे. या पार्श्वभूमीवर, प्रस्तुत प्रतिनिधीने गुरुवारी त्याची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. गोपनीयतेच्या अनुषंगाने अनेक बाबींवर भाष्य करण्याचे टाळत त्यांनी दहशतवाद, महाराष्ट्र आणि सुरक्षा व्यवस्थेच्या संदर्भातील काही प्रश्नांवर चर्चा केली. २६/ ११ ची पुनरावृत्ती होऊ शकते, असा धोका वर्तविण्यात आल्याचे वृत्त आहे. याकडे लक्ष वेधून मुंबई-महाराष्ट्रालाच दहशतवादी वेळोवेळी का टार्गेट करीत आहेत, बाबत त्यांना विचारणा केली असता ते म्हणाले, महाराष्ट्र हे पुरोगामी, विकसित आणि लक्षवेधी राज्य आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई, महाराष्ट्रात आहे. एक प्रकारे महाराष्ट्र हे देशाचे हृदय आहे. येथे काही झाले तर त्याचे पडसाद देशातच नव्हे तर जगभरात उमटतात. दहशतवाद्यांना हे माहीत आहे. त्यांना हवे असलेले ‘मायलेज’ मिळत असल्यामुळेच महाराष्ट्राकडे त्यांची नजर जास्त वाकडी आहे. ‘जनरल अलर्ट’राज्यातील सुरक्षा यंत्रणा डोळ्यात तेल घालून जागली करीत आहे. घातपाताचा ‘जनरल अलर्ट’ आहे. मात्र, दहशतावाद्यांना कसलीही संधी मिळणार नाही, अशा उपाययोजना राज्य पोलीस दलाने केल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कुठेच काही विपरीत घडणार नाही आणि सणोत्सव शांततेत पार पडेल, असा विश्वासही एडीजी बिहारी यांनी शेवटी व्यक्त केला.