शहरं
Join us  
Trending Stories
1
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
2
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
3
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
4
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
5
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
6
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
7
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
8
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
9
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
10
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
11
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
12
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
13
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
14
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
15
Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यात 'गुगल' दाखवणार गर्दीतून वाट; अडीच हजार CCTV ची शहरावर नजर
16
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
17
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
18
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
19
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
20
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण

महाराष्ट्रात दहशतवाद्यांना जादा मायलेज

By admin | Updated: September 25, 2015 03:37 IST

दहशतवाद हा काही एखाद्या कोड्याचे उत्तर शोधून संपविण्यासारखा विषय नव्हे. दहशतवाद्यांना कोणत्याही जाती-धर्माशी काही देणे-घेणे नाही.

टाळता येऊ शकतो धोका : प्रत्येकाने सतर्कता बाळगण्याची गरज नरेश डोंगरे नागपूरदहशतवाद हा काही एखाद्या कोड्याचे उत्तर शोधून संपविण्यासारखा विषय नव्हे. दहशतवाद्यांना कोणत्याही जाती-धर्माशी काही देणे-घेणे नाही. अशांतता, अस्वस्थता, उध्वस्तता हेच दहशतवाद्यांचे टार्गेट असते. त्यासाठी ते प्रयत्नशील असतात. स्लिपर सेलच्या माध्यमातून आपली जमीन तयार करतात अन् आपले कलुषित मनसुबे यशस्वी करतात. त्यांचा मुकाबला करण्यासाठी सुरक्षा यंत्रणेसारखी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखण्याची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीने सतर्कता बाळगल्यास राज्यच काय, देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात कसलाही धोका होणार नाही. राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (स्पेशल आॅपरेशन) विपीनकुमार बिहारी यांचे हे मत आहे. दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या नागपुरात घातपात किंवा जातीय दंगलीचा प्रकार घडू शकतो, असा इशारा असल्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. गेल्या चार दिवसांपासून एडीजी बिहारी नागपुरात आहेत. अधिकाऱ्यांच्या बैठका घेत शहरातील वेगवेगळ्या भागांची ते पाहणी करीत असल्यामुळे पोलीस दलातही कुजबुज वाढली आहे. या पार्श्वभूमीवर, प्रस्तुत प्रतिनिधीने गुरुवारी त्याची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. गोपनीयतेच्या अनुषंगाने अनेक बाबींवर भाष्य करण्याचे टाळत त्यांनी दहशतवाद, महाराष्ट्र आणि सुरक्षा व्यवस्थेच्या संदर्भातील काही प्रश्नांवर चर्चा केली. २६/ ११ ची पुनरावृत्ती होऊ शकते, असा धोका वर्तविण्यात आल्याचे वृत्त आहे. याकडे लक्ष वेधून मुंबई-महाराष्ट्रालाच दहशतवादी वेळोवेळी का टार्गेट करीत आहेत, बाबत त्यांना विचारणा केली असता ते म्हणाले, महाराष्ट्र हे पुरोगामी, विकसित आणि लक्षवेधी राज्य आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई, महाराष्ट्रात आहे. एक प्रकारे महाराष्ट्र हे देशाचे हृदय आहे. येथे काही झाले तर त्याचे पडसाद देशातच नव्हे तर जगभरात उमटतात. दहशतवाद्यांना हे माहीत आहे. त्यांना हवे असलेले ‘मायलेज’ मिळत असल्यामुळेच महाराष्ट्राकडे त्यांची नजर जास्त वाकडी आहे. ‘जनरल अलर्ट’राज्यातील सुरक्षा यंत्रणा डोळ्यात तेल घालून जागली करीत आहे. घातपाताचा ‘जनरल अलर्ट’ आहे. मात्र, दहशतावाद्यांना कसलीही संधी मिळणार नाही, अशा उपाययोजना राज्य पोलीस दलाने केल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कुठेच काही विपरीत घडणार नाही आणि सणोत्सव शांततेत पार पडेल, असा विश्वासही एडीजी बिहारी यांनी शेवटी व्यक्त केला.