शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

साेयाबीन पिकांमध्ये माकडांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क मांढळ : नैसर्गिक आपत्ती, पावसाची उघडीप यामुळे हवालदिल झालेला शेतकरी आता वन्यप्राण्यांच्या समस्येने त्रस्त झाला आहे. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

मांढळ : नैसर्गिक आपत्ती, पावसाची उघडीप यामुळे हवालदिल झालेला शेतकरी आता वन्यप्राण्यांच्या समस्येने त्रस्त झाला आहे. मांढळनजीकच्या तारणा, चिकना, वीरखंडी शिवारात माकडांचे कळप साेयाबीन पिकांमध्ये धुमाकूळ घालत असल्याने पिकांचे प्रचंड नुकसान हाेत आहे.

यंदा सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी साेयाबीन, कपाशीची पेरणी केली. त्यानंतर मात्र पावसाने माेठी उघडीप दिली. यामुळे अनेकांना दुबार पेरणी करावी लागली. त्यातच आता साेयाबीन व इतर पिकांमध्ये रानडुकर, हरिण, नीलगाय व माकडांचे कळप हैदाेस घालत असल्याने शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत आहे. मांढळ परिसरातील तारणा, चिकना, डोंगरमौदा, वीरखंडी, ठाणा, हरदोली, कऱ्हांडला, गाेठणगाव व इतर गावे जंगलालगत आहेत. सध्या बहुतांश शिवारात साेयाबीन, मिरची, कपाशी, तूर, धान पिके डाेलत आहेत. या शिवारात ३० ते ४० च्या संख्येत माकडांचे कळप साेयाबीन व इतर पिकांमध्ये उपद्व्याप घालत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. वन विभागाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन तात्काळ माकडांचा बंदाेबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.