शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
2
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
3
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
4
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
5
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
6
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
7
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
8
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध
9
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
10
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
11
राज्यातील तब्बल आठ हजारांहून अधिक गावांत शाळाच नाही; केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश
12
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
13
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
14
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
15
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
16
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
17
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 
18
‘लष्कर’ कमांडर सैफुल्लाह याचा पाकिस्तानमध्ये ‘गेम’; नागपूरच्या संघ मुख्यालय हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार
19
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीचे धक्कादायक खुलासे, टोळीत अनेकांचा समावेश
20
आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-

मोदींच्या स्वच्छता अभियानाला ‘अभाविप’चा खोडा !

By admin | Updated: August 3, 2015 02:45 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या स्वच्छता अभियानाचा त्यांच्याच भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला (अभाविप) विसर पडलेला दिसतो.

विद्यापीठाच्या स्वच्छ भिंतीवर केली जाहिरातीची घाण : प्रशासनाचे मौन कशासाठी ?नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या स्वच्छता अभियानाचा त्यांच्याच भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला (अभाविप) विसर पडलेला दिसतो. कारण नागपूर विद्यापीठाने सुरक्षा भिंतीची नुकतीच साफसफाई करून रंगरंगोटी केली, त्यावर अभाविपने जाहिराती लिहून स्वच्छता अभियानाला हरताळ फासला.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने काही दिवसांपूर्वीच विद्यापीठ परिसराच्या सुरक्षा भिंतींना रंगरंगोटी करून स्वच्छ केले होते. त्याचप्रमाणे विद्यापीठ लायब्ररी परिसराच्या सुरक्षा भिंतीची साफसफाई करण्यात आली होती. रंगरंगोटी करून स्वच्छ केलेल्या या चमकदार भिंतीमुळे विद्यापीठालाही झळाळी आली होती. मात्र विद्यापीठाची ही चमक अभाविपच्या पदाधिकाऱ्यांना सलत होती की काय, त्यांनी जाहिराती लिहून विद्यापीठाच्या सर्व मेहनतीवर पाणीच फेरले आहे. लायब्ररी आणि विद्यापीठाच्या भिंतींचे विद्रुपीकरण पाहून सुजाण नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. रस्त्यांवरच्या कोणत्याही भिंतींचा विविध संस्थांकडून जाहिरातीसाठी सर्रासपणे वापर केला जातो. मात्र अभाविपसारख्या जबाबदार संघटनेने विद्यापीठाच्या स्वच्छ भिंतीवर जाहिराती लिहून त्यांना विद्रुप करावे, ही बाब अशोभनीय असल्याचे बोलले जात आहे. जाहिरात करायचीच होती तर महापालिकेत रीतसर पैसे भरून जाहिरातीचा फलक लावावा, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. स्वच्छता ही केवळ कचऱ्याशीच संबधित नसते, तर आपल्या घराच्या व आसपासच्या भिंती स्वच्छ आहेत की नाही याचेही महत्त्व असते. हे मात्र अभाविपच्या पदाधिकाऱ्यांना कदाचित माहिती नसावे. यात युवकांना जुळण्याचे आवाहन केल्या जात आहे. असे विद्रुपीकरण करून विद्यार्थ्यांना काय संदेश दिला जाईल, हे जबाबदार संघटनेला सुचू नये, हीच शोकांतिका आहे. (प्रतिनिधी)एबीव्हीपी सफाई करणार का?लाखो रुपये खर्च करून विद्यापीठाने भिंतींची रंगरंगोटी केली. आता अभाविपचे जबाबदार पदाधिकारी व कार्यकर्ते जाहिराती लिहून विद्रुप केलेल्या भिंतींची साफसफाई करणार का, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.विद्यापीठाने कारवाई का केली नाही?कोणाच्याही मालमत्तांवर जाहिराती लावून त्याचे विद्रुपीकरण करण्याच्या विरोधात शासनाने कायदा करून दंडात्मक कारवाईची तरतूद केली आहे. जाहिरात लावण्यासाठी संबंधित मालमत्ताधारकाकडून रीतसर परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे अभाविपने विद्यापीठाची परवानगी घेतली होती का, आणि नसेल घेतली तर विद्यापीठाने कारवाई करण्याबाबत काही हालचाली केल्या का, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.