शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

मोदींच्या स्वच्छता अभियानाला ‘अभाविप’चा खोडा !

By admin | Updated: August 3, 2015 02:45 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या स्वच्छता अभियानाचा त्यांच्याच भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला (अभाविप) विसर पडलेला दिसतो.

विद्यापीठाच्या स्वच्छ भिंतीवर केली जाहिरातीची घाण : प्रशासनाचे मौन कशासाठी ?नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या स्वच्छता अभियानाचा त्यांच्याच भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला (अभाविप) विसर पडलेला दिसतो. कारण नागपूर विद्यापीठाने सुरक्षा भिंतीची नुकतीच साफसफाई करून रंगरंगोटी केली, त्यावर अभाविपने जाहिराती लिहून स्वच्छता अभियानाला हरताळ फासला.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने काही दिवसांपूर्वीच विद्यापीठ परिसराच्या सुरक्षा भिंतींना रंगरंगोटी करून स्वच्छ केले होते. त्याचप्रमाणे विद्यापीठ लायब्ररी परिसराच्या सुरक्षा भिंतीची साफसफाई करण्यात आली होती. रंगरंगोटी करून स्वच्छ केलेल्या या चमकदार भिंतीमुळे विद्यापीठालाही झळाळी आली होती. मात्र विद्यापीठाची ही चमक अभाविपच्या पदाधिकाऱ्यांना सलत होती की काय, त्यांनी जाहिराती लिहून विद्यापीठाच्या सर्व मेहनतीवर पाणीच फेरले आहे. लायब्ररी आणि विद्यापीठाच्या भिंतींचे विद्रुपीकरण पाहून सुजाण नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. रस्त्यांवरच्या कोणत्याही भिंतींचा विविध संस्थांकडून जाहिरातीसाठी सर्रासपणे वापर केला जातो. मात्र अभाविपसारख्या जबाबदार संघटनेने विद्यापीठाच्या स्वच्छ भिंतीवर जाहिराती लिहून त्यांना विद्रुप करावे, ही बाब अशोभनीय असल्याचे बोलले जात आहे. जाहिरात करायचीच होती तर महापालिकेत रीतसर पैसे भरून जाहिरातीचा फलक लावावा, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. स्वच्छता ही केवळ कचऱ्याशीच संबधित नसते, तर आपल्या घराच्या व आसपासच्या भिंती स्वच्छ आहेत की नाही याचेही महत्त्व असते. हे मात्र अभाविपच्या पदाधिकाऱ्यांना कदाचित माहिती नसावे. यात युवकांना जुळण्याचे आवाहन केल्या जात आहे. असे विद्रुपीकरण करून विद्यार्थ्यांना काय संदेश दिला जाईल, हे जबाबदार संघटनेला सुचू नये, हीच शोकांतिका आहे. (प्रतिनिधी)एबीव्हीपी सफाई करणार का?लाखो रुपये खर्च करून विद्यापीठाने भिंतींची रंगरंगोटी केली. आता अभाविपचे जबाबदार पदाधिकारी व कार्यकर्ते जाहिराती लिहून विद्रुप केलेल्या भिंतींची साफसफाई करणार का, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.विद्यापीठाने कारवाई का केली नाही?कोणाच्याही मालमत्तांवर जाहिराती लावून त्याचे विद्रुपीकरण करण्याच्या विरोधात शासनाने कायदा करून दंडात्मक कारवाईची तरतूद केली आहे. जाहिरात लावण्यासाठी संबंधित मालमत्ताधारकाकडून रीतसर परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे अभाविपने विद्यापीठाची परवानगी घेतली होती का, आणि नसेल घेतली तर विद्यापीठाने कारवाई करण्याबाबत काही हालचाली केल्या का, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.