शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

जनतेची संपत्ती मोदींनी आपल्या दोन खास उद्योगपती मित्रांच्या घशात घातली ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पंडित जवाहरलाल नेहरूंपासून डॉ. मनमोहन सिंग यांच्यापर्यंत काँग्रेस सरकारने ७० वर्षात विकासातून देश उभा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पंडित जवाहरलाल नेहरूंपासून डॉ. मनमोहन सिंग यांच्यापर्यंत काँग्रेस सरकारने ७० वर्षात विकासातून देश उभा केला. आज हेच वैभव नरेंद्र मोदी विकत आहेत. रेल्वे, विमानतळ, बंदरे, बीएसएनएल, एलआयसी, पेट्रोलियम कंपन्या, बँका अशी जनतेची संपत्ती मोदींनी आपल्या दोन खास उद्योगपती मित्रांच्या घशात घातली आहे, अशी टीका राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी रविवारी येथे केली. गेली सात वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आहेत. ही देशाच्या दृष्टीने घातक बाब ठरली असून, उद्योग, कृषी, शिक्षण, रोजगार, महागाई, जीडीपी, आंतरराष्ट्रीय संबंध, निर्यात अशा सर्वच आघाड्यांवर मोदी सरकार अपयशी ठरले असल्याचेही ते म्हणाले.

मोदी सरकारच्या एकूणच कारभाराचा काँग्रेसतर्फे रविवारी जाहीर निषेध करण्यात आला. यानिमित्त आयोजित पत्रपरिषदेत राऊत यांनी मोदी व भाजपवर निशाणा साधला. राऊत म्हणाले, १०० दिवसात महागाई कमी करू म्हणणाऱ्यांनी महागाई तर कमी केलीच नाही; पण पेट्रोल १०० लिटर, डिझेल ९० रुपये लिटर व एलपीजी गॅस ९०० रुपये केले. खाद्यतेल १८० ते २०० रुपये लिटर केले. गरीब, सर्वसामान्य, नोकरदार तसेच मध्यमवर्गांचेही जगणे अवघड करून टाकले. काळे कृषी कायदे आणून शेतकऱ्यांनाच उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र रचले. नोटाबंदीसारखा अविचारी निर्णय घेऊन देशाला रांगेत उभे केले. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकारने अक्षम्य दुर्लक्ष केले. मनमानी व लहरी पद्धतीने कसलेही नियोजन न करता देश लॉकडाऊन करून टाकला. मोदी सरकारच्या कारभाराला देशातील जनता आता विटलेली आहे.

यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, ग्रामीणचे अध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनीही मोदी सरकारच्या कारभाराचा निषेध केला. पत्रपरिषदेत आमदार राजू पारवे, आमदार अभिजित वंजारी, नाना गावंडे, सुरेश भोयर, अनिल नगरारे आदी उपस्थित होते.

बॉक्स

विरोधी पक्षांच्या सरकारांची अडवणूक

संविधानाला न जुमानणारे मोदी सरकार सीबीआय, ईडी, निवडणूक आयोग, न्यायालये या सर्व स्वायत्त संस्थांमध्ये हस्तक्षेप करून लोकशाही मूल्यांची तत्त्वे पायदळी तुडवत आहेत. विरोधी पक्षांच्या सरकारची अडवणूक केली जात आहे. देशात त्यांच्याशी भेदभाव केला जात आहे, असेही राऊत म्हणाले.