शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

जनतेची संपत्ती मोदींनी आपल्या दोन खास उद्योगपती मित्रांच्या घशात घातली ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पंडित जवाहरलाल नेहरूंपासून डॉ. मनमोहन सिंग यांच्यापर्यंत काँग्रेस सरकारने ७० वर्षात विकासातून देश उभा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पंडित जवाहरलाल नेहरूंपासून डॉ. मनमोहन सिंग यांच्यापर्यंत काँग्रेस सरकारने ७० वर्षात विकासातून देश उभा केला. आज हेच वैभव नरेंद्र मोदी विकत आहेत. रेल्वे, विमानतळ, बंदरे, बीएसएनएल, एलआयसी, पेट्रोलियम कंपन्या, बँका अशी जनतेची संपत्ती मोदींनी आपल्या दोन खास उद्योगपती मित्रांच्या घशात घातली आहे, अशी टीका राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी रविवारी येथे केली. गेली सात वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आहेत. ही देशाच्या दृष्टीने घातक बाब ठरली असून, उद्योग, कृषी, शिक्षण, रोजगार, महागाई, जीडीपी, आंतरराष्ट्रीय संबंध, निर्यात अशा सर्वच आघाड्यांवर मोदी सरकार अपयशी ठरले असल्याचेही ते म्हणाले.

मोदी सरकारच्या एकूणच कारभाराचा काँग्रेसतर्फे रविवारी जाहीर निषेध करण्यात आला. यानिमित्त आयोजित पत्रपरिषदेत राऊत यांनी मोदी व भाजपवर निशाणा साधला. राऊत म्हणाले, १०० दिवसात महागाई कमी करू म्हणणाऱ्यांनी महागाई तर कमी केलीच नाही; पण पेट्रोल १०० लिटर, डिझेल ९० रुपये लिटर व एलपीजी गॅस ९०० रुपये केले. खाद्यतेल १८० ते २०० रुपये लिटर केले. गरीब, सर्वसामान्य, नोकरदार तसेच मध्यमवर्गांचेही जगणे अवघड करून टाकले. काळे कृषी कायदे आणून शेतकऱ्यांनाच उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र रचले. नोटाबंदीसारखा अविचारी निर्णय घेऊन देशाला रांगेत उभे केले. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकारने अक्षम्य दुर्लक्ष केले. मनमानी व लहरी पद्धतीने कसलेही नियोजन न करता देश लॉकडाऊन करून टाकला. मोदी सरकारच्या कारभाराला देशातील जनता आता विटलेली आहे.

यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, ग्रामीणचे अध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनीही मोदी सरकारच्या कारभाराचा निषेध केला. पत्रपरिषदेत आमदार राजू पारवे, आमदार अभिजित वंजारी, नाना गावंडे, सुरेश भोयर, अनिल नगरारे आदी उपस्थित होते.

बॉक्स

विरोधी पक्षांच्या सरकारांची अडवणूक

संविधानाला न जुमानणारे मोदी सरकार सीबीआय, ईडी, निवडणूक आयोग, न्यायालये या सर्व स्वायत्त संस्थांमध्ये हस्तक्षेप करून लोकशाही मूल्यांची तत्त्वे पायदळी तुडवत आहेत. विरोधी पक्षांच्या सरकारची अडवणूक केली जात आहे. देशात त्यांच्याशी भेदभाव केला जात आहे, असेही राऊत म्हणाले.