शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

मोदी सरकारने देशाला दिशा दिली

By admin | Updated: May 27, 2016 02:44 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रातील भाजप सरकारने गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात विकासाच्या विविध योजना राबविल्या.

निहाल चंद मेघवाल : दोन वर्षांच्या यशस्वी वाटचालीचे अभिनंदननागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रातील भाजप सरकारने गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात विकासाच्या विविध योजना राबविल्या. देशाला विकासाची नवी दिशा दिल्याचा दावा केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री निहाल चंद मेघवाल यांनी गुरुवारी केला. केंद्र सरकारच्या दोन वर्षांच्या यशस्वी वाटचालीनिमित्त भाजपतर्फे शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित अभिनंदन सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, भाजपचे शहर अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, सुधाकर देशमुख, अनिल सोले, विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने, गिरीश व्यास, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर आदी उपस्थित होेते. जनधन योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांची बँकेत खाते उघडून ३६ हजार कोटी जमा केले. नरेगाच्या माध्यमातून गरीब लोकांना ४६ हजार कोटींचा लाभ झाला. प्रधानमंत्री कोष योजना, प्रधानमंत्री विमा योजना, गरिबांना स्वयंपाकाचा गॅस अशा योजना हाती घेतल्या. ग्रामपंचायतींना दोन लाख कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला. काँग्रेसच्या ६० वर्षांच्या राजवटीला भाजपचे पाच वर्षांचे सरकार भारी पडेल. मोदी १० वर्षे पंतप्रधानपदी राहिले तर या देशाला गतवैभव प्राप्त होईल. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर शहराच्या विकासासाठी १८ हजार कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती मेघवाल यांनी दिली. नरेंद्र मोदी व नितीन गडकरी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने गेल्या दोन वर्षांत देशाला प्रगतिपथावर नेले. कामकाजाच्या प्रगतीचा लेखाजोखा जनतेपुढे मांडणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान आहेत. गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नागपूर शहरात विकासाची गंगा आल्याचे सुधाकर कोहळे यांनी प्रास्ताविकातून सांगितले.व्यासपीठावर उपमहापौर सतीश होले, माजी महापौर अर्चना डेहनकर, माया इवनाते, जि.प.चे शिक्षण सभापती उकेश चव्हाण आदी उपस्थित होते. संचालन संदीप जाधव यांनी तर आभार भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी मानले.(प्रतिनिधी)काँग्रेसचे आरोप निराधारमोदी सरकारने गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात विकासाच्या विविध योजना राबविल्या. ग्रामपंचायतींना प्रत्येकी ५० ते ८० लाखांचा निधी उपलब्ध केला. सिंचन व पाणीपुरठ्याच्या योजनांना प्राधान्य दिले. पाच वर्षांनंतर देशाचा विकास झालेला दिसेल. त्यामुळे काँग्रेसने मोदी सरकारवर केलेले आरोप निराधार असल्याचे निहाल चंद मेघवाल यांनी पत्रकारांशी चर्चा करताना सांगितले.