शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
2
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
3
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
4
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
5
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
6
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
7
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
8
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
9
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
10
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
11
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
12
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
13
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
14
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
15
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
16
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
17
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
18
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
19
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
20
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस

मोदी सरकारने देशाला दिशा दिली

By admin | Updated: May 27, 2016 02:44 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रातील भाजप सरकारने गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात विकासाच्या विविध योजना राबविल्या.

निहाल चंद मेघवाल : दोन वर्षांच्या यशस्वी वाटचालीचे अभिनंदननागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रातील भाजप सरकारने गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात विकासाच्या विविध योजना राबविल्या. देशाला विकासाची नवी दिशा दिल्याचा दावा केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री निहाल चंद मेघवाल यांनी गुरुवारी केला. केंद्र सरकारच्या दोन वर्षांच्या यशस्वी वाटचालीनिमित्त भाजपतर्फे शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित अभिनंदन सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, भाजपचे शहर अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, सुधाकर देशमुख, अनिल सोले, विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने, गिरीश व्यास, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर आदी उपस्थित होेते. जनधन योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांची बँकेत खाते उघडून ३६ हजार कोटी जमा केले. नरेगाच्या माध्यमातून गरीब लोकांना ४६ हजार कोटींचा लाभ झाला. प्रधानमंत्री कोष योजना, प्रधानमंत्री विमा योजना, गरिबांना स्वयंपाकाचा गॅस अशा योजना हाती घेतल्या. ग्रामपंचायतींना दोन लाख कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला. काँग्रेसच्या ६० वर्षांच्या राजवटीला भाजपचे पाच वर्षांचे सरकार भारी पडेल. मोदी १० वर्षे पंतप्रधानपदी राहिले तर या देशाला गतवैभव प्राप्त होईल. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर शहराच्या विकासासाठी १८ हजार कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती मेघवाल यांनी दिली. नरेंद्र मोदी व नितीन गडकरी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने गेल्या दोन वर्षांत देशाला प्रगतिपथावर नेले. कामकाजाच्या प्रगतीचा लेखाजोखा जनतेपुढे मांडणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान आहेत. गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नागपूर शहरात विकासाची गंगा आल्याचे सुधाकर कोहळे यांनी प्रास्ताविकातून सांगितले.व्यासपीठावर उपमहापौर सतीश होले, माजी महापौर अर्चना डेहनकर, माया इवनाते, जि.प.चे शिक्षण सभापती उकेश चव्हाण आदी उपस्थित होते. संचालन संदीप जाधव यांनी तर आभार भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी मानले.(प्रतिनिधी)काँग्रेसचे आरोप निराधारमोदी सरकारने गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात विकासाच्या विविध योजना राबविल्या. ग्रामपंचायतींना प्रत्येकी ५० ते ८० लाखांचा निधी उपलब्ध केला. सिंचन व पाणीपुरठ्याच्या योजनांना प्राधान्य दिले. पाच वर्षांनंतर देशाचा विकास झालेला दिसेल. त्यामुळे काँग्रेसने मोदी सरकारवर केलेले आरोप निराधार असल्याचे निहाल चंद मेघवाल यांनी पत्रकारांशी चर्चा करताना सांगितले.