शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
3
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
4
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
5
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
7
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
8
लग्नानंतर घरी कोणालंच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
9
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
10
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
11
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
12
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
13
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
14
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
15
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
16
"सोनम ढाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
17
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
18
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
19
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
20
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...

मोदी करणार दीक्षाभूमीवर ध्यान साधना

By admin | Updated: April 14, 2017 02:58 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूर दौऱ्यावर येत आहेत.

तब्बल साडेतीन तास नागपुरात : भरगच्च कार्यक्रम नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूर दौऱ्यावर येत आहेत. तब्बल साडेतीन तास ते नागपुरात राहतील. यावेळी ते दीक्षाभूमीला भेट देऊन ध्यान साधना करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सकाळी १०.४५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होईल. विमानतळावर राज्यपाल सी. विद्यासागर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे स्वागत करतील. विमानतळावरून पंतप्रधान थेट दीक्षाभूमीसाठी रवाना होतील. सकाळी ११ वाजता दीक्षाभूमीला भेट देतील. दीक्षाभूमीवर ते जवळपास २० मिनिटे घालवतील. यावेळी सर्वप्रथम ते दीक्षाभूमी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर मध्यवर्ती स्मारकात जातील. स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिकलश आणि तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेला अभिवादन करतील. मध्यवर्ती स्मारकामध्येच ते सुमारे पाच मिनिटे ध्यान साधना करणार आहेत. पंतप्रधानांच्या ध्यान साधनेसाठी स्मारक समितीच्यावतीने स्मारकामध्ये विशेष बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. यानंतर स्मारकातील वरच्या ‘डोम’वरून पंतप्रधान दीक्षाभूमी परिसराची पाहणी करतील. यानंतर दीक्षाभूमीच्या व्हीजिट बुकमध्ये ते आपला अभिप्राय लिहितील. (प्रतिनिधी)दीक्षाभूमी स्मारक समितीतर्फे स्वागत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष स्वागत केले जाईल. स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आणि दीक्षाभूमीची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट दिले जाईल. यावेळी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, डॉ. सुधीर फुलझेले, डॉ. राजेंद्र गवई, विजय चिकाटे, एन.आर. सुटे आदी प्रामुख्याने उपस्थित राहतील. दीक्षाभूमीवरील टपाल तिकिटाचे लोकार्पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी ऐतिहासिक धम्म व सामाजिक क्रांती घडवून आणली, ती दीक्षाभूमी आज जगभरातील शोषितांची प्रेरणा भूमी बनली आहे. ही ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेता दीक्षाभूमीवर टपाल तिकीट काढण्यात यावे, अशी आंबेडकरी अनुयायांची मागणी होती. सरकारने ही मागणी पूर्ण केली आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी’ या टपाल तिकिटाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मानकापूर येथील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.