शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

शेतीवर ‘आधुनिक’ दरोडा

By admin | Updated: June 30, 2015 02:58 IST

विदर्भातील शेतकरी अगोदरच अतिवृष्टी, दुष्काळ व नापिकीच्या चक्रव्यूहात फसला आहे. यात अनेक जण कर्जबाजारी झाले आहेत.

जीवन रामावत ल्ल नागपूरविदर्भातील शेतकरी अगोदरच अतिवृष्टी, दुष्काळ व नापिकीच्या चक्रव्यूहात फसला आहे. यात अनेक जण कर्जबाजारी झाले आहेत. शिवाय अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. असे असताना काही मार्केटिंग कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या भोळेभाबडेपणाचा गैरफायदा घेऊ न, त्यांची लाखो रुपयांनी फसवणूक केली आहे. एवढेच नव्हे, तर संबंधित कंपन्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा करू न, स्वत: मालामाल झाल्या आहेत. या घटनांमुळे विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नैराश्य पसरले आहे. शिवाय अनेकांनी आता आम्हीही आत्महत्या करावी का? असा शासन व प्रशासनापुढे सवाल उपस्थित केला आहे. कंपनीच्या उलट्या बोंबा यासंबंधी मेसर्स दिशा ग्रीन हाऊ सेसचे पांडुरंग महाजन यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी शेतकऱ्यांनीच त्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, शेतकऱ्याने स्वत: पॉलीहाऊ स व शेडनेट माझ्या माणसांकडून खोलून घेतले. यासंबंधी आपण बँक व कृषी अधिकाऱ्यांना पत्रसुद्धा दिले आहे. शेतकरी हा योग्य व्यक्ती नाही. त्याने माझ्यासह बँक व शासनाची फसवणूक केली आहे. उलट तोच आमच्यावर आरोप करीत आहे, ते पूर्णत: चुकीचे आहे. शेतकऱ्यानेच आम्हाला काम पूर्ण करू दिले नाही, असेही महाजन म्हणाले. काही शेतकऱ्यांनी आयुष्यभर रक्ताचे पाणी करू न म्हातारपणात पोट भरण्याचे साधन म्हणून दोन-चार एकर शेती जमविली आहे. तसेच काही वडिलोपार्जित शेतीचे जतन करीत आहे. मात्र मार्केटिंग कंपन्यांनी या शेतकऱ्यांच्या शेतीवर डाका टाकून, त्यांच्या सर्व शेती बँकेकडे गहाण केल्या आहेत. त्या कंपन्यांमध्ये नागपुरातील पर्णनेत्र मार्केटिंग कंपनी, नोबल एक्सप्लोकेम लिमिटेड, बायोनिक्स कंपनी व जळगाव येथील दिशा ग्रीन हाऊ सेस कंपनीचा समावेश आहे. या सर्व कंपन्यांनी कुणाला पॉलीहाऊ स, कुणाला शेडनेट तर कुणाला औषधी वनस्पती शेतीच्या नावाखाली लाखो रुपयांनी फसवणूक केल्याच्या तक्रारी ‘लोकमत’कडे प्राप्त झाल्या आहेत. यासाठी संबंधित कंपन्यांनी बँका व कृषी अधिकाऱ्यांशी संगनमत करू न, हा सर्व प्रताप केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आजपर्यंत एकाही कंपनीविरुद्ध कोणतीही कारवाई झालेली नाही. दुसरीकडे त्या मोबल्यात शेतकऱ्यांच्या नशिबी कर्जबाजारीपणा आला आहे. अनेक बँकांनी आता कर्जवसूलीसाठी शेतकऱ्यांमागे तगादा लावला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची भूकतहान हरपून रात्रीची झोपही उडाली आहे. अशा संकटात सापडलेले शेतकरी रोज कधी पोलीस विभाग तर कधी कृषी विभागाचा उंबरठा झिजवित आहे. मात्र त्यांना आजपर्यंत कुठेही न्याय मिळालेला नाही. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीतून भरघोष उत्पन्नाचे आमिष दाखवून या मार्केटिंग कंपन्यांची शेतकऱ्यांची लाखो रुपयांनी फसवणूक केली आहे. विशेष म्हणजे, यासंबंधी शेतकऱ्यांनी देशाचे पंतप्रधानांपासून तर राज्याचे मुख्यमंत्री, कृषिमंत्री, पोलीस विभाग व स्थानिक कृषी अधिकाऱ्यांकडे अनेक लेखी तक्रारी केल्या आहेत. मात्र रोज शेतकरी हिताच्या गप्पा मारणाऱ्या कुणीही आजपर्यंत या शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिलेला नाही.