शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनच्या काळात मोबाईलच ठरतोय विरंगुळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 00:52 IST

मोबाईलमुळे सर्व जग एका छोट्याशा चौकटीत तर आलेच आहे, सोबतच सोशल डिस्टन्सिंगच्या या काळात मनोरंजनाची सर्व साधने रद्द असल्याने मोबाईल हाच एक मोठा विरंगुळा ठरत आहे.

ठळक मुद्दे बहुतांश नागरिक ऑनलाईन, खर्चही वाढला युजर्सचा ताण वाढल्याने नेटवर्क झाले स्लो

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या धसक्यामुळे संपूर्ण देश लॉकडाऊनचा सामना करत आहे. अशा काळात वेळ कसा घालवावा, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यात भारतात मोबाईल युजर्सची संख्या सर्वात जास्त असून, मनोरंजनाचे सर्वात प्रमुख साधन म्हणूनही मोबाईलचा वापर भारतात मोठ्या संख्येने केला जातो. मोबाईलमुळे सर्व जग एका छोट्याशा चौकटीत तर आलेच आहे, सोबतच सोशल डिस्टन्सिंगच्या या काळात मनोरंजनाची सर्व साधने रद्द असल्याने मोबाईल हाच एक मोठा विरंगुळा ठरत आहे.चीन, इटली, स्पेन, अमेरिका, फ्रान्स, इराण, जर्मनी पाठोपाठ भारतातही कोरोना विषाणूचा प्रकोप वाढला आहे. दिवसेंदिवस संक्रमित रुग्णांची संख्या प्रचंड वाढते आहे. गेल्या दोन आठवड्यांत हजाराहून अधिक नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून, संशयितांची संख्याही प्रचंड वाढली आहे. आजवर २९ नागरिकांचा मृत्यूही याच आजाराने झाला आहे. एकट्या महाराष्ट्रात संक्रमितांची संख्या २२५च्या वर झाली आहे. नागपुरात तर संक्रमितांची संख्या १६ झाली आहे. या धसक्यामुळेच सामाजिक विलगीकरणाकरिता २४ मार्चपासून देशभरात २१ दिवसाचा लॉकडाऊन पुकारला आहे. संपूर्ण बाजारपेठा, संचारव्यवस्था बंद असल्याने आणि संचारबंदीही असल्याने घरात वेळ घालवायचा कसा, हा मोठा यक्ष प्रश्न आहे. कोणी कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत तर कुणी पुस्तके वाचून ज्ञानार्जन करत आहेत. विद्यार्थी वर्ग आगामी परीक्षांच्या तयारीत आहे. तरीदेखील वेळ निघता निघत नसल्याने मोबाईल हाच आधार झाला आहे. बरेच लोक कधी नव्हे अशा व्यक्तींना, नातलगांना फोन करून कुशल-मंगल विचारत आहेत. त्यामुळे, दर महिन्यापेक्षा ज्यादा खर्च होत असल्याचेही दिसून येत आहे. देशात रिलायन्स जिओ, एअरटेल, बीएचएनएल, व्होडाफोन, आयडिया सारख्या टेलिकॉम कंपन्या कार्यरत आहेत. जवळपास प्रत्येकाजवळच कोणत्या ना कोणत्या कंपन्यांचे प्रिपेड अथवा पोस्टपेड प्लॅन आहेत. या काळात प्रत्येकाजवळच वेळ असल्याने मोबाईलवर संवादाचा काळही प्रचंड वाढला आहे. शिवाय, व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम, टिष्ट्वटरसारख्या सोशल माध्यमांवर आॅनलाईन राहण्याचा काळही वाढला आहे. नागरिकांच्या आॅनलाईनमुळे नेटवर्कवरील भार वाढला आणि त्यामुळे नेटवर्क स्लो झाल्याचेही दिसून येत आहे. बऱ्याच कंपन्यांनी लॉकडाऊनची ही स्थिती बघता ग्राहकांना आधीच सचेत केले असल्याने, अनेकांनी आॅनलाईनद्वारेच आपले प्लान रिन्यू करून ठेवले आहेत.फोन बंद पडणार नाहीत! कोरोनाचे संक्रमण होऊ नये म्हणून नागरिकांना घरातच कैद ठेवण्याच्या हेतूने लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. अशा काळात मोबाईल हा विरंगुळ्याचा महत्त्वाचा माध्यम म्हणून त्याबाबत टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया (ट्राय)ने सर्वच टेलिकॉम कंपन्यांना प्रिपेड रिचार्जची व्हॅलिडिटी वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. व्हॅलिडीटी संपल्यावर नागरिक ती वाढविण्यासाठी बाहेर पडतील आणि बाजार बंद असल्याने, ते शक्य होणार नाही. हा अंदाज घेऊनच ट्रायने या सूचना प्रसारित केल्या आहेत. त्यामुळे, या काळात ज्यांच्या प्रिपेडची व्हॅलिडिटी संपणार आहे, त्यांची व्हॅलिडिटी आपोआपच वाढणार असून, विरंगुळ्याचे साधन असलेला मोबाईल या काळात बंद पडणार नाही, हे जवळपास स्पष्ट झाले आहे.पोस्टपेड ग्राहकांनाही मिळेल सवलत! याच काळात पोस्टपेड ग्राहकांना बिल भरण्यासाठी त्रास होऊ शकतो. लॉकडाऊनमुळे सर्वच टेलिकॉम कंपन्यांचे सर्वच स्टोअर बंद असल्याने, ज्यांना थेट बिल भरायची सवय आहे, त्यांना ते भरता येणार नाही. अशा वेळी आॅनलाईन बिल भरण्याचा पर्याय आहे. मात्र, ज्यांना या पर्यायाची सवय नाही त्यांच्यासाठी कंपन्यांकडून वाढीव मुदत दिली जाण्याची शक्यता ट्रायच्या दिशानिर्देशावरून स्पष्ट होत आहे. भारतात ९० टक्के ग्राहक प्रिपेडचे तर दहा टक्के ग्राहक पोस्टपेडचे आहेत, हे विशेष.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMobileमोबाइल