शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

आदर्श गाव दत्तक योजनेकडे आमदारांनी फिरवली पाठ

By admin | Updated: October 8, 2015 02:37 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही आदर्श गाव दत्तक योजना जाहीर केली आहे.

नागपूर जिल्ह्यातील वास्तव : तीन आमदारांचाच पुढाकार आनंद डेकाटे नागपूरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही आदर्श गाव दत्तक योजना जाहीर केली आहे. परंतु मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गृहजिल्हा असलेल्या नागपूर जिल्ह्यातील बहुतांश आमदारांनीच या योजनेकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. नागपुरातील केवळ तीन आमदारांनी आतापर्यंत गाव दत्तक घेतले आहे. नागपूर शहरात सहा आणि ग्रामीण भागात सहा असे एकूण १२ विधानसभेचे मतदारसंघ आहेत. परंतु यापैकी केवळ दोनच आमदारांनी आतापर्यंत ज्या गावांचा विकास करणार आहेत, त्या गावांची निवड केली असून त्याबाबतचे अधिकृत पत्र जिल्हा नियोजन विभागाकडे सादर केले आहे. आदर्श गाव दत्तक घेण्यात नागपूर जिल्ह्यातून सर्वप्रथम पुढाकार घेतला तो काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी. त्यांनी नरखेड तालुक्यातील थुगावदेव या गावाची निवड केली आहे. थुगावदेवला ते आदर्श गाव करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. तर हिंगणा विधानसभा मतदारसंघातील आमदार समीर मेघे यांनी हिंगणा तालुक्यातील अडेगाव या गावाला दत्तक घेतले आहे. तसेच पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले आ. अनिल सोले यांनी सुद्धा भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील रोंगा हे गाव दत्तक घेतले. नागपूर शहरातील आमदारांना नजीकच्या गावाची निवड करावयाची आहे. परंतु आ. सुधाकर देशमुख (पश्चिम), आ. डॉ. मिलिंद माने (उत्तर), आ. कृष्णा खोपडे (पूर्व), आ. विकास कुंभारे (मध्य) आ. सुधाकर कोहळे (दक्षिण) यांनी अजूनपर्यंत एकाही गावाची निवड केलेली नाही. तसचे ग्रामीण भागातील आमदार सुनील केदार (सावनेर), आ. सुधीर पारवे (उमरेड), आ. मल्लिकार्जुन रेड्डी (रामटेक) यांनीही अजूनपर्यंत एकाही गावाला दत्तक घेतलेले नाही. याशिवाय विधान परिषदेचे सदस्य आ. प्रा. जोगेंद्र कवाडे, आ. राजेंद्र मुळक, आ. प्रकाश गजभिये, आ. नागो गाणार यांनीसुद्धा अजूनपर्यंत एकाही गावाला दत्तक घेतलेले नाही.