शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
3
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
4
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

आमदारांनी विकास निधीतून दत्तक गावांना वगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2016 02:50 IST

ग्रामीण भागाचा विकास व्हावा यासाठी खासदार, आमदारांच्या धर्तीवर जिल्हा परिषदेने दत्तक ग्राम योजना हाती घेतली आहे.

जि.प.सभेत सदस्य आक्रमक : दत्तक गावांसाठी १५ क ोटींची मागणीनागपूर : ग्रामीण भागाचा विकास व्हावा यासाठी खासदार, आमदारांच्या धर्तीवर जिल्हा परिषदेने दत्तक ग्राम योजना हाती घेतली आहे. जि.प.सदस्यांनी गावे दत्तक घेतलेली आहेत. परंतु सदस्यांना मोजकाच विकास निधी मिळतो. त्यामुळे सदस्यांनी जि.प.च्या माध्यमातून दत्तक गावांतील विकास योजनांचे प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविले. परंतु काही आमदारांनी विकास निधीच्या यादीतून सदस्यांच्या दत्तक गावांना कात्री लावली आहे. याचे पडसाद शनिवारी सर्वसाधारण सभेत उमटले. सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत दत्तक गावांच्या विकासासाठी १५ कोटींची मागणी केली. उज्ज्वला बोढारे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. जि.प.च्या ३७ सदस्यांनी गावे दत्तक घेतलेली आहेत. परंतु या सदस्यांना वर्षाला ७ ते ८ लाखांचा विकास निधी मिळतो. यातून दत्तक गावातील विकास कामे शक्य नाही. त्यामुळे दत्तक घेतेल्या हिंगणा तालुक्यातील डेकना(बु.) गावातील विकास कामासाठी निधी प्राप्त व्हावा. यासाठी जि.प.च्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. हा प्रस्ताव नाकारण्यात आला. शासनाकडूनही विशेष निधी मिळत नाही. त्यामुळे सदस्यांनी या गावांचा विकास कसा करावा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सदस्यांना गाव दत्तक घेण्याचा आग्रह नव्हता. त्यांच्या इच्छेवर अवलंबून होते. नियोजन समितीकडे सदस्यांनी दिलेले प्रस्ताव पाठविण्यात आले. परंतु काही आमदारांनी सदस्यांची गावे वगळली आहेत. दत्तक गावांना शासनाकडून स्वतंत्र निधी मिळणार नसल्याची माहिती जि.प.अध्यक्ष निशा सावरकर यांनी दिली. विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे यांनीही दत्तक गावांच्या विकासासाठी शासनाने प्रत्येक सदस्यांना २५ लाख असा एकूण १४.५० कोटींचा निधी उपलब्ध करावा. यासाठी शासनाकडे मागणी करण्याची सूचना केली. चंद्रशेखर चिखले यांनीही दत्तक गावांसाठी निधी देण्याची मागणी केली. सदस्यांनी सुचविलेल्या दत्तक गावातील विकास कामांचे भूमिपूजन करताना सदस्यांना डावलण्यात येते. अशा वातावणात आदर्श ग्राम कसे निर्माण होईल, असा प्रश्न कुंदा आमदरे यांनी उपस्थित केला. कामठी पंचायती समितीत विस्तार अधिकारी गेल्या १२ वर्षापासून ठाण मांडून आहेत. त्यांची बदली होत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. ग्रामीण भागातील शाळांना घरगुती दराने वीज पुरवठा व्हावा, अशी मागणी बोढारे यांनी केली. कृषी ,पशुसंवर्धन, समाजकल्याण व महिला बाल कल्याण विभागातील प्रश्नांवर वादळी चर्चा झाली. उपाध्यक्ष शरद डोणेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापती आशा गायकवाड, समाजल्याण सभापती दीपक गेडाम, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती पुष्पा वाघाडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)