शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
4
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
5
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
6
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
7
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
8
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
9
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
10
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
11
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
12
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
13
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
14
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
15
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
16
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
17
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
18
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
19
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
20
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

प्रथमच निर्वाचित १३० सदस्यांसाठी ‘आमदार निवास’ आकर्षण

By admin | Updated: November 21, 2014 00:49 IST

राज्य विधानसभेच्या निवडणुकीत १३० आमदार प्रथमच विधानसभेवर निर्वाचित झाले असून ते हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूरमधील आमदार निवासात प्रथमच ‘आमदार’ म्हणून थांबतील.

नागपूर : राज्य विधानसभेच्या निवडणुकीत १३० आमदार प्रथमच विधानसभेवर निर्वाचित झाले असून ते हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूरमधील आमदार निवासात प्रथमच ‘आमदार’ म्हणून थांबतील. दरवर्षी नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या तुलनेत राज्यातील सत्तांतरानंतर होणारे हिवाळी अधिवेशन सर्वार्थाने वेगळे आहे. जुन्या आणि नवीन सदस्यांचा अनोखा मेळ या अधिवेशनाच्या निमित्ताने पाहायला मिळेल. १३० नवीन सदस्यांसह १५ वर्षांपासून आमदार म्हणून अधिवेशनात हजेरी राहणारे देवेंद्र फडणवीस सुद्धा मुख्यमंत्री म्हणून नवीनच आहेत. अध्यक्ष, मंत्री यांच्यासह विरोधी पक्ष नेतेही या अधिवेशनात नवीनच असणार आहे. विश्वासदर्शक ठरावासाठी मुंबईत विशेष अधिवेशन झाले. पण त्यात इतर कामकाज झाले नव्हते. त्यामुळे खरे अधिवेशन हेच ठरणार आहे. नवीन निर्वाचित झालेल्या सदस्यांना विधिमंडळाच्या कामकाजासोबतच आमदार निवास, विधानभवन आणि परिसराबाबतही उत्सुकता आहे.अधिवेशनासाठी आलेल्या विधिमंडळाच्या सदस्यांच्या निवासाची व्यवस्था आमदार निवासात केली जाते. यावेळी १३० नवे चेहरे आमदार म्हणून तेथे असतील. नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर १२ पैकी पाच आमदार प्रथमच निर्वाचित झाले आहेत. त्यात सुधाकर कोहळे (दक्षिण नागपूर) डॉ. मिलिंद माने (उत्तर नागपूर), समीर मेघे (हिंगणा),डी.एम. रेड्डी (रामटेक) आणि आशिष देशमुख (काटोल) यांचा समावेश आहे. प्रत्येक आमदारांसाठी आमदार निवासात सर्व सुविधा युक्त स्वतंत्र खोलीची व्यवस्था केली जाते. अनेक जण आमदार निवासात न थांबता इतरत्र थांबतात. मात्र त्यांच्या खोलीत कार्यकर्ते व त्यांचा कर्मचारी वर्ग मुक्कामाला असतो.दरम्यान ८ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनासाठी आमदार निवास सज्ज ठेवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सुरक्षा व्यवस्थेपासून तर विद्युत, पाणीपुरवठा, स्वच्छता यावर भर दिला जात आहे. देखभाल दुरुस्तीची कामे सुरू असून रंगरंगोटीही केली जात आहे. सध्या अधिवेशन सुुरू होण्यास दोन आठवड्याचा अवधी आहे. शिल्लक काम या काळात पूर्ण होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)