शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

दारू तस्करीसाठी बुरख्याचा गैरवापर

By admin | Updated: July 8, 2017 02:16 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील दोन महिलांना शुक्रवारी रेल्वे सुरक्षा दलाने दारूची तस्करी करताना रंगेहात अटक करून

रेल्वेस्थानकात कारवाई : चंद्रपूर जिल्ह्यातील महिलांची शक्कल, आरपीएफने पकडले लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील दोन महिलांना शुक्रवारी रेल्वे सुरक्षा दलाने दारूची तस्करी करताना रंगेहात अटक करून त्यांच्याकडून ९५२५ रुपयांच्या २२५ बॉटल्स जप्त केल्या. विशेष म्हणजे यातील दोन्ही महिलांनी दारूची तस्करी करण्यासाठी शंका येऊ नये म्हणून हिंदू असताना बुरखा धारण केला होता. रेल्वे सुरक्षा दलाच्या महिला कॉन्स्टेबल सुषमा ढोमणे, उषा तिग्गा यांना रेल्वेगाडी क्रमांक १२६२२ तामिळनाडू एक्स्प्रेसने दारूची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यांच्या माहितीवरून आरपीएफचे निरीक्षक वीरेंद्र वानखेडे, उपनिरीक्षक कृष्णा नंद राय, होतीलाल मीना, रजनलाल गुर्जर यांची चमू गठित करण्यात आली. या चमूने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत प्लॅटफार्म क्रमांक २ वर तपास सुरू केला. यावेळी तामिळनाडू एक्स्प्रेस प्लॅटफार्मवर उभी असताना इटारसी एण्डकडील भागात कोच क्रमांक एस १२ समोर दोन महिला संशयास्पद स्थितीत उभ्या असलेल्या आढळल्या. त्यातील एका महिलेने बुरखा घातलेला होता. त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपले नाव कंचन विजय सूर्यवंशी (३५) रा. जाकिर हुसैन वॉर्ड, बल्लारशा आणि पूनम बच्छराज सूर्यवंशी (३७) रा. भगतसिंग वॉर्ड बल्लारशा असे सांगितले. त्यांच्या जवळील बॅगची तपासणी केली असता त्यात दारूच्या ९५२५ रुपये किमतीच्या २२५ बॉटल्स आढळल्या. लगेच या दोन महिलांना अटक करून आरपीएफ ठाण्यात आणण्यात आले. येथे कागदोपत्री कारवाई केल्यानंतर या महिलांना मुद्देमालासह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आले. सहसा बुरखा घातलेल्या महिलांना धार्मिक भावनेमुळे कुणी अधिक विचारपूस करीत नाही. नेमका याच बाबीचा फायदा घेऊन यातील आरोपी महिलांनी हिंदू असूनही बुरखा घातला होता. परंतु दारूची तस्करी होणार असल्याची पक्की माहिती असल्यामुळे त्यांची ही शक्कल कामाला आली नाही अन् त्या आरपीएफच्या जाळ्यात अडकल्या. तस्करीसाठी विविध शक्कल चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदीनंतर तस्करांनी आजपर्यंत अनेक शक्कल लढवल्या. यात मिठाईच्या पाकिटातून दारू नेणे, कपडे ठेवण्याच्या खर्ड्यात दारूची तस्करी होत होती. याही क्लृप्त्या पुढे आल्यामुळे नंतर दारूसाठी महिलांचा वापर होऊ लागला. महिला दारू नेत असल्याचे उघड झाल्यामुळे तरुणींचा वापर तस्करीसाठी केल्या गेला. ही बाबही उघड झाल्यामुळे आता चक्क बुरख्याचा गैरवापर झाल्याचे पुढे आले आहे.