शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

कुर्वेंचे मिशन नागपूर सुपरफास्ट

By admin | Updated: May 21, 2015 02:25 IST

नागपूर जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांचा पहिला दिवस आढावा बैठकांमध्ये गेला.

नागपूर : नागपूर जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांचा पहिला दिवस आढावा बैठकांमध्ये गेला. पहिल्या दिवशी त्यांनी कामकाजाची रूपरेषा समजून घेतली आणि पुढल्या काही दिवसांत यात आमुलाग्र बदल घडवून आणण्याचा विश्वास व्यक्त केला.सकाळी ११.०५ मिनिटानी कुर्वे यांनी मावळते जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांच्याकडून जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर दुपारी घरी जाऊन जेवण करण्याच्या वेळेचा अपवाद सोडला तर संपूर्ण दिवस त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज समजून घेण्यात घालविला. कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम त्यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागाच्या प्रमुखांनी भेट घेतली.या भेटीत आतापर्यंत विभागात काय काम चालले याची माहिती विभागप्रमुखांनी त्यांना दिली. यात अतिरिक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखेडे, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) प्रकाश पाटील, नियोजन अधिकारी के.व्ही. फिरके, महसूल, पुरवठा विभाग, निवडणूक विभाग, भूसंपादन, कृषी आणि अन्य खात्याच्या अधिकाऱ्यांचाही समावेश होता.दुपारी त्यांनी मेट्रो रेल्वेच्या भूसंपादनाचा आढावा घेतला. त्यानंतर जिल्ह्यातील जलयुक्त शिवाराची माहिती घेतली. मिहानच्या प्रगतीबाबतही त्यांनी आढावा घेतला व दोन दिवसात यासंदर्भात बैठक घेण्याचे आश्वासन दिले. सायंकाळी केंद्राच्या जलस्वराज्य योजनेचीही त्यांनी बैठक घेतली.तत्पूर्वी त्यांना मिहानसंदर्भात बाबा डवरे भेटले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी संघटनेने भेट घेतली. कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी लवकरच स्वतंत्र भेट घेण्याचे आश्वासन कुर्वे यांनी कर्मचारी संघटनेला दिले. त्यानंतर मावळते जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांच्या निरोप समारंभालाही काही काळ ते उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधून पुढील कामकाजाची दिशा त्यांच्यापुढे मांडली. (प्रतिनिधी)पारदर्शक प्रशासनावर भरआज पहिला दिवस असल्याने आपण कामकाज समजून घेऊ. पुढच्या काळात पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासनावर भर देऊ, कृष्णा यांनी त्यांच्या कार्यकाळात ज्या चांगल्या योजना सुरू केल्या आहेत त्या सुरू ठेवू व नवीन काही योजना हाती घेऊ. विविध विभागप्रमुखांशी चर्चा करून पुढील कामकाजाची दिशा ठरवू.सचिन कुर्वे, नवे जिल्हाधिकारी नागपूरधाडसी निर्णय घेतलेजिल्हाधिकारी म्हणून काम करताना फार अल्प कालावधी मिळाला. पण यात मी अनेक धाडसी निर्णय घेतले. हे सर्व निर्णय दूरदृष्टी ठेवून घेतले. त्यांची अंमलबजावणी नवीन जिल्हाधिकाऱ्यांना करायची आहे. जिल्हाधिकारी कार्यालय हे जिल्ह्यातील शक्तिमान कार्यालय असावे असा माझा प्रयत्न होता व त्यादृष्टीने कामकाजालाही सुुरुवात केली होती. जिल्ह्यात नवीन अगरबत्ती प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. त्यातून वारांगनांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न होता.अभिषेक कृष्णा, मावळते जिल्हाधिकारी, नागपूर