शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
3
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
4
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
5
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
6
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
7
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
8
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
9
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
10
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
11
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
12
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
13
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
14
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
15
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
16
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
17
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
18
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
19
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
20
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू

गायब झालेला अहवाल सापडला

By admin | Updated: April 29, 2016 02:55 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्व विभागातून ...

विद्यापीठातील नाणी प्रकरण : आठवडाभरात प्रशासन करणार पोलीस तक्रारनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्व विभागातून वाकाटककालीन नाणी गायब झाल्याच्या प्रकरणात पोलीस तक्रार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात दोन वर्षांपूर्वी नेमलेल्या चौकशी समितीचा गहाळ अहवाल सापडला असून यातून नाणी गायब झाल्याचे स्पष्ट होत आहे. काही प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून प्रशासनाकडून आठवडाभरात पोलीस तक्रार करण्यात येईल, अशी माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली.१९६७ साली पवनारजवळील शेतात सापडलेली दोनशेहून अधिक नाणी विभागात आता नसल्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणली होती. याबाबत तत्कालीन प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांनी चौकशी समिती गठित केली होती. या समितीने अहवाल सादर केला होता. परंतु हे प्रकरण प्रसिद्धीमाध्यमांमध्ये आल्यानंतर हा अहवालच सापडत नव्हता. दरम्यान, विद्यापीठाने पोलीस तक्रार करण्याचा प्रयत्न केला. परंतु विद्यापीठाकडे विभागात नाणी असल्याची नोंद नाही. शिवाय या नाण्यांची किंमत तसेच इतर माहितीदेखील उपलब्ध नाही. त्यामुळे अंतर्गत चौकशी करून ठोस अहवाल सादर झाल्यावरच तक्रार दाखल होईल, असे अंबाझरी पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे ऐनवेळी विद्यापीठाला माघार घ्यावी लागली होती. संबंधित अहवाल हा अनुपकुमार यांच्याकडे असल्याची माहिती कुलगुरूंना मिळाली व त्यांनी यासंदर्भात त्यांना पत्र पाठवून अहवाल देण्याची विनंती केली.अनुपकुमारांनी हा अहवाल कुलगुरूंकडे पाठविला आहे. या अहवालात झालेल्या सर्व प्रकाराची सखोल नोंद असून २१६ नाणी विभागातून गायब झाल्याचे अहवालावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे पोलीस तक्रार करण्याचा आमचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रक्रियेत काही त्रुटी राहू नये यासाठी प्रशासकीय तयारी करण्याची आवश्यकता आहे. विभागप्रमुख डॉ.प्रीती त्रिवेदी यांच्याकडे ती जबाबदारी देण्यात आली आहे. यासाठी साधारणत: आठवडाभर कालावधी लागेल व त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येईल, असे कुलगुरूंनी स्पष्ट केले.अनुपकुमारांकडे अहवाल कसा ?या प्रकरणात अनुपकुमार यांनी २०१४ मध्ये चौकशी समिती नेमली होती. या समितीने १५ जुलै २०१४ रोजी अनुपकुमार यांच्याकडे अहवाल सोपविला होता. त्यानंतर १० आॅक्टोबरपर्यंत अनुपकुमार विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून जबाबदारी सांभाळत होते. त्यानंतर त्यांनी हा अहवाल प्रशासनाकडे देणे अपेक्षित होते. परंतु तसे न करता त्यांनी तो स्वत:जवळ का ठेवला याबाबत विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत अनुपकुमार यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क केला असता, त्यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मी आता विद्यापीठाशी संबंधित नाही, त्यामुळे प्रतिक्रिया देण्याचा प्रश्नच येत नाही, असे ते म्हणाले. परंतु विद्यापीठाशी आता संबंध नाही तर मग त्यांनी इतके दिवस इतक्या महत्त्वाच्या प्रकरणाचा अहवाल स्वत:जवळ कुठल्या कारणामुळे ठेवला याबाबतचे गूढ वाढले आहे. (प्रतिनिधी)