शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

गायब झालेला अहवाल सापडला

By admin | Updated: April 29, 2016 02:55 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्व विभागातून ...

विद्यापीठातील नाणी प्रकरण : आठवडाभरात प्रशासन करणार पोलीस तक्रारनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्व विभागातून वाकाटककालीन नाणी गायब झाल्याच्या प्रकरणात पोलीस तक्रार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात दोन वर्षांपूर्वी नेमलेल्या चौकशी समितीचा गहाळ अहवाल सापडला असून यातून नाणी गायब झाल्याचे स्पष्ट होत आहे. काही प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून प्रशासनाकडून आठवडाभरात पोलीस तक्रार करण्यात येईल, अशी माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली.१९६७ साली पवनारजवळील शेतात सापडलेली दोनशेहून अधिक नाणी विभागात आता नसल्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणली होती. याबाबत तत्कालीन प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांनी चौकशी समिती गठित केली होती. या समितीने अहवाल सादर केला होता. परंतु हे प्रकरण प्रसिद्धीमाध्यमांमध्ये आल्यानंतर हा अहवालच सापडत नव्हता. दरम्यान, विद्यापीठाने पोलीस तक्रार करण्याचा प्रयत्न केला. परंतु विद्यापीठाकडे विभागात नाणी असल्याची नोंद नाही. शिवाय या नाण्यांची किंमत तसेच इतर माहितीदेखील उपलब्ध नाही. त्यामुळे अंतर्गत चौकशी करून ठोस अहवाल सादर झाल्यावरच तक्रार दाखल होईल, असे अंबाझरी पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे ऐनवेळी विद्यापीठाला माघार घ्यावी लागली होती. संबंधित अहवाल हा अनुपकुमार यांच्याकडे असल्याची माहिती कुलगुरूंना मिळाली व त्यांनी यासंदर्भात त्यांना पत्र पाठवून अहवाल देण्याची विनंती केली.अनुपकुमारांनी हा अहवाल कुलगुरूंकडे पाठविला आहे. या अहवालात झालेल्या सर्व प्रकाराची सखोल नोंद असून २१६ नाणी विभागातून गायब झाल्याचे अहवालावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे पोलीस तक्रार करण्याचा आमचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रक्रियेत काही त्रुटी राहू नये यासाठी प्रशासकीय तयारी करण्याची आवश्यकता आहे. विभागप्रमुख डॉ.प्रीती त्रिवेदी यांच्याकडे ती जबाबदारी देण्यात आली आहे. यासाठी साधारणत: आठवडाभर कालावधी लागेल व त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येईल, असे कुलगुरूंनी स्पष्ट केले.अनुपकुमारांकडे अहवाल कसा ?या प्रकरणात अनुपकुमार यांनी २०१४ मध्ये चौकशी समिती नेमली होती. या समितीने १५ जुलै २०१४ रोजी अनुपकुमार यांच्याकडे अहवाल सोपविला होता. त्यानंतर १० आॅक्टोबरपर्यंत अनुपकुमार विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून जबाबदारी सांभाळत होते. त्यानंतर त्यांनी हा अहवाल प्रशासनाकडे देणे अपेक्षित होते. परंतु तसे न करता त्यांनी तो स्वत:जवळ का ठेवला याबाबत विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत अनुपकुमार यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क केला असता, त्यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मी आता विद्यापीठाशी संबंधित नाही, त्यामुळे प्रतिक्रिया देण्याचा प्रश्नच येत नाही, असे ते म्हणाले. परंतु विद्यापीठाशी आता संबंध नाही तर मग त्यांनी इतके दिवस इतक्या महत्त्वाच्या प्रकरणाचा अहवाल स्वत:जवळ कुठल्या कारणामुळे ठेवला याबाबतचे गूढ वाढले आहे. (प्रतिनिधी)